शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अमरावती जिल्ह्यात पाण्याची समस्या, आमदार राणा अधिकाऱ्यांवर झाले गरम

By उज्वल भालेकर | Updated: June 15, 2024 19:05 IST

आठ दिवसांत पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर जशास तसे उत्तर देऊ

अमरावती : शहराबरोबरच जिल्ह्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही भागांमध्ये आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. शहरातही अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाचे अधिकारी दखल घेत नाहीत. त्यामुळे शनिवारी आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना पाणी प्रश्नासंदर्भात जाब विचारला. आठ दिवसांमध्ये जर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला नाही, तर अधिकारी ज्या भाषेत समजतील, त्यांना त्या भाषेत उत्तर देऊ, असा इशाराच राणा यांनी दिला आहे.

जिल्ह्यात अप्पर वर्धासारखे मोठे धरण असताना देखील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात आला, तर काही गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गतची कामे पूर्ण झालेली नसल्याने नागरिकांच्या घरापर्यंत पाण्याची पाईपलाईन पोहोचलेली नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना देखील कामे अपुरे आहेत. शहरात काही भागांमध्ये रात्री-बेरात्री पाणी सोडण्यात येत असल्याने पाण्यासाठी नागरिकांना आपली झोप खराब करून धावपळ करावी लागते. ते देखील पाणी कमी प्रमाणात मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्याच मागील आठ दिवसांपासून शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे पाण्याची ही गंभीर समस्या लक्षात घेता शनिवारी आमदार रवी राणा तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना पाण्याच्या समस्येवर जाब विचारत धारेवर धरले. अप्पर वर्धा धरणातून अमरावतीकरांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मागील ३० वर्षांपासून बदललेली नसल्याने ती अनेक ठिकाणी लिकेज आहे. ही पाईपलाईन बदलण्यासाठी ९८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याचे रवी राणा म्हणाले. तसेच इतरही जलजीवन मिशनअंतर्गत प्रलंबित कामेही तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या घरापर्यंत नळजोडणी देण्याचे तसेच त्यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे निर्देश आ. राणा यांनी दिले. आठ दिवसांत पाण्याची समस्या निकाली निघाली नाही, तर यानंतरची बैठक शांततेत होणार नाही. अधिकारी जी भाषा समजतात, त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्यात येईल तसेच नागरिकांच्या उद्रेकाचाही सामना अधिकाऱ्यांना करावा लागेल, असा इशारा राणा यांनी दिला.