शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात पाण्याची समस्या, आमदार राणा अधिकाऱ्यांवर झाले गरम

By उज्वल भालेकर | Updated: June 15, 2024 19:05 IST

आठ दिवसांत पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर जशास तसे उत्तर देऊ

अमरावती : शहराबरोबरच जिल्ह्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही भागांमध्ये आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. शहरातही अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाचे अधिकारी दखल घेत नाहीत. त्यामुळे शनिवारी आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना पाणी प्रश्नासंदर्भात जाब विचारला. आठ दिवसांमध्ये जर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला नाही, तर अधिकारी ज्या भाषेत समजतील, त्यांना त्या भाषेत उत्तर देऊ, असा इशाराच राणा यांनी दिला आहे.

जिल्ह्यात अप्पर वर्धासारखे मोठे धरण असताना देखील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात आला, तर काही गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गतची कामे पूर्ण झालेली नसल्याने नागरिकांच्या घरापर्यंत पाण्याची पाईपलाईन पोहोचलेली नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना देखील कामे अपुरे आहेत. शहरात काही भागांमध्ये रात्री-बेरात्री पाणी सोडण्यात येत असल्याने पाण्यासाठी नागरिकांना आपली झोप खराब करून धावपळ करावी लागते. ते देखील पाणी कमी प्रमाणात मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्याच मागील आठ दिवसांपासून शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे पाण्याची ही गंभीर समस्या लक्षात घेता शनिवारी आमदार रवी राणा तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना पाण्याच्या समस्येवर जाब विचारत धारेवर धरले. अप्पर वर्धा धरणातून अमरावतीकरांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मागील ३० वर्षांपासून बदललेली नसल्याने ती अनेक ठिकाणी लिकेज आहे. ही पाईपलाईन बदलण्यासाठी ९८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याचे रवी राणा म्हणाले. तसेच इतरही जलजीवन मिशनअंतर्गत प्रलंबित कामेही तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या घरापर्यंत नळजोडणी देण्याचे तसेच त्यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे निर्देश आ. राणा यांनी दिले. आठ दिवसांत पाण्याची समस्या निकाली निघाली नाही, तर यानंतरची बैठक शांततेत होणार नाही. अधिकारी जी भाषा समजतात, त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्यात येईल तसेच नागरिकांच्या उद्रेकाचाही सामना अधिकाऱ्यांना करावा लागेल, असा इशारा राणा यांनी दिला.