शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यापूर्वीच तालुक्यात पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:22 IST

पान २ ची बॉटम चांदूर रेल्वे : उन्हाळा लागायला अजून एक महिना बाकी असताना तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणीप्रश्न बिकट ...

पान २ ची बॉटम

चांदूर रेल्वे : उन्हाळा लागायला अजून एक महिना बाकी असताना तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणीप्रश्न बिकट झाला आहे. कुठे नैसर्गिक पाणीटंचाई, तर कुठे कृत्रिमरीत्या पाणीटंचाई भेडसावत असल्याच्या विविध समस्या तालुक्याभरातून आलेल्या ग्रामस्थांनी आणि पंचायत समिती सदस्यांनी मांडल्या. पंचायत समितीतर्फे गुरुवारी स्थानिक तहसील कार्यलयाच्या सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली.

आढावा सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रताप अडसड उपस्थित होते. पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, उपसभापती प्रतिभा डांगे, सदस्य श्रद्धा वऱ्हाडे, तहसीलदार राजेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर आदी उपस्थित होते. तालुक्यातील सावंगा मग्रापूर येथे दरवर्षी मोठी पाणीटंचाई असते. तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या जातात. परंतु, अजूनही कायमस्वरूपी उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याचे मत उपसभापती प्रतिभा डांगे यांनी मांडले. याच विषयावर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. पंचायत समिती सदस्य श्रद्धा वऱ्हाडे यांनी धनोडी गावातील पाण्याचा प्रश्न मांडला. त्यासाठी ग्रामसेवक जबाबदार असल्याचे सांगितले. राजना, अमदोरी, निमला, बागापूर, सुपलवाडा, वाई, इस्माईलपूर या गावांतही पाणीटंचाई जाणवत असल्याचे वऱ्हाडे म्हणाल्या. सभापती देशमुख यांनी पळसखेड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाणीप्रश्न उपस्थित केला. याशिवाय दहेगाव, धानोरा म्हाली, सोनारा, मालखेड, सावंगा विठोबा, चिरोडी या गावांतील विहीर अधिग्रहण आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर आमदार प्रताप अडसड यांनी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. बैठकीला पाणीपुरवठा उपअभियंता के.बी. खासबागे, विस्तार अधिकारी मीना म्हसतकर, बालविकास अधिकारी वैशाली ढगे, पशुसंवर्धन अधिकारी रमेश राऊत यांच्यासह संजय पुनसे, विवेक चौधरी, गजानन जुनघरे, जगदीश कथलकर, हेमंत जाधव, अमोल देशमुख उपस्थित होते.

बॉक्स

मागील अंकावरून पुढे

तालुक्यातील अनेक गावांत दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. त्यासाठी लोकांना आंदोलने करावी लागतात. टँकरवारी होते, मात्र शाश्वत उपाययोजना केली जात नाहीत. दरवर्षी तात्पुरत्या उपाययोजनांसाठी कोट्यवधी खर्च केली जातात. विहिरींचे अधिग्रहण केले जाते. मात्र, ज्या गावात पाणीपुरवठ्याची उत्तम सोय आहे, तिकडे लक्ष दिले जात नसल्याचे प्रातिनिधिक मत बैठकीदरम्यान व्यक्त करण्यात आले. बैठकींचा रतीब घालण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

------------