शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यापूर्वीच तालुक्यात पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:22 IST

पान २ ची बॉटम चांदूर रेल्वे : उन्हाळा लागायला अजून एक महिना बाकी असताना तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणीप्रश्न बिकट ...

पान २ ची बॉटम

चांदूर रेल्वे : उन्हाळा लागायला अजून एक महिना बाकी असताना तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणीप्रश्न बिकट झाला आहे. कुठे नैसर्गिक पाणीटंचाई, तर कुठे कृत्रिमरीत्या पाणीटंचाई भेडसावत असल्याच्या विविध समस्या तालुक्याभरातून आलेल्या ग्रामस्थांनी आणि पंचायत समिती सदस्यांनी मांडल्या. पंचायत समितीतर्फे गुरुवारी स्थानिक तहसील कार्यलयाच्या सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली.

आढावा सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रताप अडसड उपस्थित होते. पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, उपसभापती प्रतिभा डांगे, सदस्य श्रद्धा वऱ्हाडे, तहसीलदार राजेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर आदी उपस्थित होते. तालुक्यातील सावंगा मग्रापूर येथे दरवर्षी मोठी पाणीटंचाई असते. तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या जातात. परंतु, अजूनही कायमस्वरूपी उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याचे मत उपसभापती प्रतिभा डांगे यांनी मांडले. याच विषयावर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. पंचायत समिती सदस्य श्रद्धा वऱ्हाडे यांनी धनोडी गावातील पाण्याचा प्रश्न मांडला. त्यासाठी ग्रामसेवक जबाबदार असल्याचे सांगितले. राजना, अमदोरी, निमला, बागापूर, सुपलवाडा, वाई, इस्माईलपूर या गावांतही पाणीटंचाई जाणवत असल्याचे वऱ्हाडे म्हणाल्या. सभापती देशमुख यांनी पळसखेड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाणीप्रश्न उपस्थित केला. याशिवाय दहेगाव, धानोरा म्हाली, सोनारा, मालखेड, सावंगा विठोबा, चिरोडी या गावांतील विहीर अधिग्रहण आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर आमदार प्रताप अडसड यांनी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. बैठकीला पाणीपुरवठा उपअभियंता के.बी. खासबागे, विस्तार अधिकारी मीना म्हसतकर, बालविकास अधिकारी वैशाली ढगे, पशुसंवर्धन अधिकारी रमेश राऊत यांच्यासह संजय पुनसे, विवेक चौधरी, गजानन जुनघरे, जगदीश कथलकर, हेमंत जाधव, अमोल देशमुख उपस्थित होते.

बॉक्स

मागील अंकावरून पुढे

तालुक्यातील अनेक गावांत दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. त्यासाठी लोकांना आंदोलने करावी लागतात. टँकरवारी होते, मात्र शाश्वत उपाययोजना केली जात नाहीत. दरवर्षी तात्पुरत्या उपाययोजनांसाठी कोट्यवधी खर्च केली जातात. विहिरींचे अधिग्रहण केले जाते. मात्र, ज्या गावात पाणीपुरवठ्याची उत्तम सोय आहे, तिकडे लक्ष दिले जात नसल्याचे प्रातिनिधिक मत बैठकीदरम्यान व्यक्त करण्यात आले. बैठकींचा रतीब घालण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

------------