शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात शहरात तुंबले पाणी!

By admin | Updated: June 20, 2015 00:38 IST

गुरूवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा ऊन पडले.

आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा : भुयारी गटारातील पाणी लोकांच्या घरात, नागरिकांची प्रचंड त्रेधा अमरावती : गुरूवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा ऊन पडले. मात्र, सायंकाळी पुन्हा आकाशात ढगांची गर्दी झाली आणि दोन तासपर्यंत धो-धो पाऊस बरसला. पावसाळ्यातील हा पहिलाच दखलपात्र पाऊस होता, असे म्हणण्यास हरकत नाही. या पहिल्याच पावसाने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा पार बोजवारा उडाल्याचे चित्र होते. पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेक नागरिकांचे दैनंदिन उपयोगाच्या वस्तुंचे नुकसान झाले. कित्येकांना रात्रभर घरात तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली. फरशी स्टॉप, धनश्री कॉलनी परिसरात पावसाचे पाणी घरात शिरल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी नगरसेवक राजू महल्ले यांच्याकडे केल्या. शेवटी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने घराशेजारी नाल्या खोदून पाणी बाहेर काढले. शहरातील विविध भागांत अशीच काहीशी परिस्थिती होती. माजी महापौैर वंदना कंगाले यांच्या प्रभागातील आदर्श कॉलनीतही अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. शंकरनगर प्रभागात पावसामुळे एक वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. हे झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला. तर प्रशांतनगरात फ्लॅटची संरक्षण भिंत कोसळल्याने गोंधळ उडाला. ही भिंत आसपासच्या नाल्यांमध्ये कोसळल्याने नाल्या अवरूध्द झाल्या. परिणामी पाणी रस्त्यांवरून वाहू लागले. दरवर्षीच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कुचकामी ठरते. संभाव्य धोक्यांची पूर्वकल्पना असूनही समतोल साधता येत नाही. नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी झाल्यास तसेच ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्यवेळी लावल्यास अशी परिस्थिती उद्भवण्याचा धोका कमी होतो. मात्र, सफाई कंत्राटदारांची मनमानी आणि महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सदैव साफसफाईचा मुद्दा दुर्लक्षित राहतो. याचाच परिणाम यंदा पुन्हा एकदा जाणवला आहे. याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.