शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पहिल्याच पावसात शहरात तुंबले पाणी!

By admin | Updated: June 20, 2015 00:38 IST

गुरूवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा ऊन पडले.

आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा : भुयारी गटारातील पाणी लोकांच्या घरात, नागरिकांची प्रचंड त्रेधा अमरावती : गुरूवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा ऊन पडले. मात्र, सायंकाळी पुन्हा आकाशात ढगांची गर्दी झाली आणि दोन तासपर्यंत धो-धो पाऊस बरसला. पावसाळ्यातील हा पहिलाच दखलपात्र पाऊस होता, असे म्हणण्यास हरकत नाही. या पहिल्याच पावसाने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा पार बोजवारा उडाल्याचे चित्र होते. पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेक नागरिकांचे दैनंदिन उपयोगाच्या वस्तुंचे नुकसान झाले. कित्येकांना रात्रभर घरात तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली. फरशी स्टॉप, धनश्री कॉलनी परिसरात पावसाचे पाणी घरात शिरल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी नगरसेवक राजू महल्ले यांच्याकडे केल्या. शेवटी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने घराशेजारी नाल्या खोदून पाणी बाहेर काढले. शहरातील विविध भागांत अशीच काहीशी परिस्थिती होती. माजी महापौैर वंदना कंगाले यांच्या प्रभागातील आदर्श कॉलनीतही अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. शंकरनगर प्रभागात पावसामुळे एक वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. हे झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला. तर प्रशांतनगरात फ्लॅटची संरक्षण भिंत कोसळल्याने गोंधळ उडाला. ही भिंत आसपासच्या नाल्यांमध्ये कोसळल्याने नाल्या अवरूध्द झाल्या. परिणामी पाणी रस्त्यांवरून वाहू लागले. दरवर्षीच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कुचकामी ठरते. संभाव्य धोक्यांची पूर्वकल्पना असूनही समतोल साधता येत नाही. नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी झाल्यास तसेच ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्यवेळी लावल्यास अशी परिस्थिती उद्भवण्याचा धोका कमी होतो. मात्र, सफाई कंत्राटदारांची मनमानी आणि महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सदैव साफसफाईचा मुद्दा दुर्लक्षित राहतो. याचाच परिणाम यंदा पुन्हा एकदा जाणवला आहे. याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.