शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

पहिल्याच पावसात शहरात तुंबले पाणी!

By admin | Updated: June 20, 2015 00:38 IST

गुरूवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा ऊन पडले.

आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा : भुयारी गटारातील पाणी लोकांच्या घरात, नागरिकांची प्रचंड त्रेधा अमरावती : गुरूवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा ऊन पडले. मात्र, सायंकाळी पुन्हा आकाशात ढगांची गर्दी झाली आणि दोन तासपर्यंत धो-धो पाऊस बरसला. पावसाळ्यातील हा पहिलाच दखलपात्र पाऊस होता, असे म्हणण्यास हरकत नाही. या पहिल्याच पावसाने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा पार बोजवारा उडाल्याचे चित्र होते. पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेक नागरिकांचे दैनंदिन उपयोगाच्या वस्तुंचे नुकसान झाले. कित्येकांना रात्रभर घरात तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली. फरशी स्टॉप, धनश्री कॉलनी परिसरात पावसाचे पाणी घरात शिरल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी नगरसेवक राजू महल्ले यांच्याकडे केल्या. शेवटी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने घराशेजारी नाल्या खोदून पाणी बाहेर काढले. शहरातील विविध भागांत अशीच काहीशी परिस्थिती होती. माजी महापौैर वंदना कंगाले यांच्या प्रभागातील आदर्श कॉलनीतही अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. शंकरनगर प्रभागात पावसामुळे एक वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. हे झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला. तर प्रशांतनगरात फ्लॅटची संरक्षण भिंत कोसळल्याने गोंधळ उडाला. ही भिंत आसपासच्या नाल्यांमध्ये कोसळल्याने नाल्या अवरूध्द झाल्या. परिणामी पाणी रस्त्यांवरून वाहू लागले. दरवर्षीच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कुचकामी ठरते. संभाव्य धोक्यांची पूर्वकल्पना असूनही समतोल साधता येत नाही. नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी झाल्यास तसेच ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्यवेळी लावल्यास अशी परिस्थिती उद्भवण्याचा धोका कमी होतो. मात्र, सफाई कंत्राटदारांची मनमानी आणि महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सदैव साफसफाईचा मुद्दा दुर्लक्षित राहतो. याचाच परिणाम यंदा पुन्हा एकदा जाणवला आहे. याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.