शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

दुष्काळात ‘जलदाह’! एप्रिलमध्ये स्थिती गंभीर

By admin | Updated: April 12, 2016 00:06 IST

विभागातील अन्य चार जिल्ह्यांच्या तुलनेत भीषणता नसली तरी जिल्ह्यात एप्रिलअखेर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.

गावागावांत पायपीट : लघुप्र्रकल्प कोरडे, मजीप्राला मर्यादा अमरावती : विभागातील अन्य चार जिल्ह्यांच्या तुलनेत भीषणता नसली तरी जिल्ह्यात एप्रिलअखेर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळला असताना दुष्काळात तेरावा महिना म्हणून जिल्ह्यातील जलसंकटही गडद होऊ लागले आहे. पारा ४३-४४ डिग्री सेल्सियसच्या घरात असताना भर उन्हात हजारो नागरिकांना पायपीट करीत ‘जलदाह’ सोसावा लागत आहे. मागील महिन्यात राज्य शासनाने जिल्ह्यातील १९६७ गावांत टंचाई जाहीर केली. तद्वतच उपाययोजनाही जाहीर केल्यात. तथापि यातील अनेक उपाययोजना कागदावरच राहिल्याने मे महिन्यात जिल्ह्यातील जलसंकट तीव्र होण्याचे दु:चिन्ह आहे. उन्हाच्या झळा जसजशा तीव्र होतील तसातशी सिंचनप्रकल्पातील जलसाठ्यात घसरण होत जाईल व जलसंकटात भर पडेल, असे सध्याचे चित्र आहे. गेल्या ५ -६ वर्षापासून सततची नापिकी, अत्यल्प पाऊस आणि भरीसभर कोसळणारे सुलतानी संकट यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. बहुतांश ग्रामस्थांना घोटभर पाण्यासाठी मैलाचे अंतर गाठावे लागते. चिखलदऱ्याला फटकाअमरावती : चिखलदरा तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस भयाण होत आहे. तलाव कोरडे पडल्याने मे महिन्यात अधिक भयावह स्थिति होणार आहे. तूर्तास तालक्यातील खडिमल, पाचडोंगरी, कोयलारी, मोथाखेडा, आवागड, तारुबांधा, कुलंगणा, भांद्री, ढोमणबर्डा, कालपाणी व पस्तलाई या गावात शासकीय टॅँकरने पेयजलचा पुरवठा होत आहे. लघुप्रकल्पांमध्ये लघुत्तम जलसाठा असल्याने एप्रिलच्या शेवटी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठे जलसंकट उदभवणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचना तहसीलदार, तलाठ्यांनी सतर्क राहावे, टॅँकर फेऱ्यांच्या नोंदी ठेवाव्यात., ग्रामपातळीवर बैठका घेऊन आढावा घ्यावा., पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, टंचाईची स्थिति लक्षात घेता अधिकचे नियोजन करावे, पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी, टंचाईग्रस्त गावांत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. १० कोटींचा आराखडा तरीही पायपीट अमरावती जिल्हापरिषदेने सुमारे ७०८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी विविध उपाययोजनांचा सुमारे १० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यात सिंचनविहिरी, नळयाजेना, कुपनलिका, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, टॅँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा, विहिरी अधिग्रहित करणे या उपाययोजनांचा समावेश आहे. तथापि अनेक गावात गावकऱ्यांची पेयजलासाठी पायपीट सुरु आहे. शहरातही केवळ दोन तास पाणीपुरवठा जिल्ह्यात सर्वदूर पाणीटंचाई जाणवत असताना अप्पर वर्धातील जलसाठ्यात झालेली घसरण पाहता शहरवासियांना मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत. मजीप्राकडून तुर्तास केवळ दोन तास पाणी पुरवठा केला जातो. त्याही पाण्याचा दाब कमी असल्याने पेयजलाची साठवण होत नाही. महापालिकाक्षेत्रात मजीप्राच्या ग्राहक संख्येच्या तुलनेत ग्राहकांना १२० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असताना अनेक भागात पेयजल पोहोचत नाही. मे महिन्यात स्थिती गंभीर एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानाने ४३ अंशाचा आकडा गाठल्यामुळे चैत्र, वैशाखात पाणीटंचाईची दाहकता वाढणार आहे. तुर्तास चिखलदरा तालुक्यातच टॅँकरने पाणीपुरवठा होत असला तरी एप्रिलच्या शेवटी व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टॅँकर्सची संख्या वाढणार आहे.