शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात ‘जलदाह’! एप्रिलमध्ये स्थिती गंभीर

By admin | Updated: April 12, 2016 00:06 IST

विभागातील अन्य चार जिल्ह्यांच्या तुलनेत भीषणता नसली तरी जिल्ह्यात एप्रिलअखेर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.

गावागावांत पायपीट : लघुप्र्रकल्प कोरडे, मजीप्राला मर्यादा अमरावती : विभागातील अन्य चार जिल्ह्यांच्या तुलनेत भीषणता नसली तरी जिल्ह्यात एप्रिलअखेर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळला असताना दुष्काळात तेरावा महिना म्हणून जिल्ह्यातील जलसंकटही गडद होऊ लागले आहे. पारा ४३-४४ डिग्री सेल्सियसच्या घरात असताना भर उन्हात हजारो नागरिकांना पायपीट करीत ‘जलदाह’ सोसावा लागत आहे. मागील महिन्यात राज्य शासनाने जिल्ह्यातील १९६७ गावांत टंचाई जाहीर केली. तद्वतच उपाययोजनाही जाहीर केल्यात. तथापि यातील अनेक उपाययोजना कागदावरच राहिल्याने मे महिन्यात जिल्ह्यातील जलसंकट तीव्र होण्याचे दु:चिन्ह आहे. उन्हाच्या झळा जसजशा तीव्र होतील तसातशी सिंचनप्रकल्पातील जलसाठ्यात घसरण होत जाईल व जलसंकटात भर पडेल, असे सध्याचे चित्र आहे. गेल्या ५ -६ वर्षापासून सततची नापिकी, अत्यल्प पाऊस आणि भरीसभर कोसळणारे सुलतानी संकट यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. बहुतांश ग्रामस्थांना घोटभर पाण्यासाठी मैलाचे अंतर गाठावे लागते. चिखलदऱ्याला फटकाअमरावती : चिखलदरा तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस भयाण होत आहे. तलाव कोरडे पडल्याने मे महिन्यात अधिक भयावह स्थिति होणार आहे. तूर्तास तालक्यातील खडिमल, पाचडोंगरी, कोयलारी, मोथाखेडा, आवागड, तारुबांधा, कुलंगणा, भांद्री, ढोमणबर्डा, कालपाणी व पस्तलाई या गावात शासकीय टॅँकरने पेयजलचा पुरवठा होत आहे. लघुप्रकल्पांमध्ये लघुत्तम जलसाठा असल्याने एप्रिलच्या शेवटी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठे जलसंकट उदभवणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचना तहसीलदार, तलाठ्यांनी सतर्क राहावे, टॅँकर फेऱ्यांच्या नोंदी ठेवाव्यात., ग्रामपातळीवर बैठका घेऊन आढावा घ्यावा., पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, टंचाईची स्थिति लक्षात घेता अधिकचे नियोजन करावे, पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी, टंचाईग्रस्त गावांत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. १० कोटींचा आराखडा तरीही पायपीट अमरावती जिल्हापरिषदेने सुमारे ७०८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी विविध उपाययोजनांचा सुमारे १० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यात सिंचनविहिरी, नळयाजेना, कुपनलिका, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, टॅँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा, विहिरी अधिग्रहित करणे या उपाययोजनांचा समावेश आहे. तथापि अनेक गावात गावकऱ्यांची पेयजलासाठी पायपीट सुरु आहे. शहरातही केवळ दोन तास पाणीपुरवठा जिल्ह्यात सर्वदूर पाणीटंचाई जाणवत असताना अप्पर वर्धातील जलसाठ्यात झालेली घसरण पाहता शहरवासियांना मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत. मजीप्राकडून तुर्तास केवळ दोन तास पाणी पुरवठा केला जातो. त्याही पाण्याचा दाब कमी असल्याने पेयजलाची साठवण होत नाही. महापालिकाक्षेत्रात मजीप्राच्या ग्राहक संख्येच्या तुलनेत ग्राहकांना १२० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असताना अनेक भागात पेयजल पोहोचत नाही. मे महिन्यात स्थिती गंभीर एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानाने ४३ अंशाचा आकडा गाठल्यामुळे चैत्र, वैशाखात पाणीटंचाईची दाहकता वाढणार आहे. तुर्तास चिखलदरा तालुक्यातच टॅँकरने पाणीपुरवठा होत असला तरी एप्रिलच्या शेवटी व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टॅँकर्सची संख्या वाढणार आहे.