शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

शहरातील पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 22:41 IST

मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने शहरातील बहुतांश जलस्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याची मदार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आली आहे. त्याचवेळी पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे आता शहरातही पाणीप्रश्न पेटला आहे. अमृत योजनेच्या भरवशावर बढाया मारणारे मजीप्रा प्रशासन सुरळीत पाणीपुरवठ्यात मात्र अपयशी ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.

ठळक मुद्देमागणीत दुपटीने वाढ : नियमित पाणीपुरवठ्यात मजीप्रा अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने शहरातील बहुतांश जलस्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याची मदार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आली आहे. त्याचवेळी पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे आता शहरातही पाणीप्रश्न पेटला आहे. अमृत योजनेच्या भरवशावर बढाया मारणारे मजीप्रा प्रशासन सुरळीत पाणीपुरवठ्यात मात्र अपयशी ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. शहरातही पाणी पुरवठ्याची गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. अमृत योजनेची कामे पूर्ण झाल्यावर शहरात सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही मजीप्राने दिली. मात्र, अमृत योजनेची ६० टक्के कामे अद्यापही शिल्लक असल्यामुळे सद्यस्थितीत तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे चिन्हे नाहीत. मजीप्राकडे ९० हजार ५० ग्राहकांची संख्या असून, या सर्व ग्राहकांना १६ पाणी टाक्यावरून सद्यस्थितीत दररोज ११२ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, सद्यस्थितीत विहिरी व बोअरवेल आटल्यामुळे मजीप्राकडे पाण्याची मागणी दुपटीने वाढल्यामुळे ग्राहकांना नियमित पाणी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मजीप्राकडून खालच्या भागात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र, उंच ठिकाणी पाणीटंचाईची झळ ग्राहकांना सोसावी लागत आहे. बडनेरात एकाच जुन्या टाकीवर पाणीपुरवठ्याची मदार असल्यामुळे तेथील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे गोपालनगर, मराठा कॉलनी, शहरालगतच्या काही भागांमध्ये पाणीप्रश्न पेटला आहे.अमृतमधील कामांच्या दिरंगाईमुळे कलहअमृत योजनेतील ६० टक्के कामे अजूनही अपूर्ण असून, ती कामे संथगतीने सुरू आहेत. पाइप लाइन टाकणे, नळ जोडणी करणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या उंच टाक्यासह अन्य अनेक कामे रखडलेली असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.पाणी मिळत नाहीमासोद येथील जलशुद्धीकरण केंद्राची ९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची मर्यादा आहे. मात्र, सद्यस्थितीत ११२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज केला जात आहे. मर्यादेपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत असताना मागणीही दुपटीने वाढली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची मागणी पाहता, ग्राहकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड सुरु झाली आहे.राधानगरातील पाईपलाईन फुटलीअमरावती : राधानगरातील गल्ली क्रमांक २ मध्ये सिमेंट रस्त्यावरील पाईपलाईन फुटल्यामुळे या भागात नळ येतात तेव्हा हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतो. गेल्या आठ दिवसांपासून नागरिक हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत असून, या ठिकाणी काही नागरिकांनी मजीप्राकडे तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेण्यात आलेली नाही. गेल्या आठ दिवसांपासून पाण्याचा अपव्यय होत असून, रस्त्याने पाणी वाहत आहे. एकीकडे एक दिवसआड पाणीपुरवठा, तर दुसरीकडे असा अपव्यय सुरू आहे. संबधित अभियंत्यांनी या भागाची पाहणी करून समस्या निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.शंकरनगरातील विहिरींची पातळी गेली खोलअमरावती : शंकरनगरातील सार्वजनिक व घरगुती विहिरींची पातळी खोल गेली असून, यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी मजीप्राच्या नळाला एक दिवसाआड अवेळी व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. शंकरनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विहिरीवरून अंदाजे १०० च्या वर कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या ठिकाणी राजापेठ उड्डाणपुलाच्या कामासाठी एका कंपनीने स्मशानभूमीलगत खुल्या भूखंडावर चार ते पाच बोअरवेल केल्या आहेत. हजारो लिटर पाण्याचा उपसा केल्यामुळे भूजल पातळी खोल गेली असल्याने परिसरातील बहुतांश खासगी विहिरी आटल्या आहेत.विहिरी व बोअरवेल आटल्याने मजीप्राच्या पाण्याचा वापर अधिक वाढला आहे. पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे मोठा ताण वाढला आहे. पाऊस पडल्यानंतर मागणी कमी होईल. त्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.- किशोर रघुवंशी,उपविभागीय अभियंता, मजीप्रा