शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

शहरातील पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 22:41 IST

मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने शहरातील बहुतांश जलस्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याची मदार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आली आहे. त्याचवेळी पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे आता शहरातही पाणीप्रश्न पेटला आहे. अमृत योजनेच्या भरवशावर बढाया मारणारे मजीप्रा प्रशासन सुरळीत पाणीपुरवठ्यात मात्र अपयशी ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.

ठळक मुद्देमागणीत दुपटीने वाढ : नियमित पाणीपुरवठ्यात मजीप्रा अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने शहरातील बहुतांश जलस्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याची मदार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आली आहे. त्याचवेळी पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे आता शहरातही पाणीप्रश्न पेटला आहे. अमृत योजनेच्या भरवशावर बढाया मारणारे मजीप्रा प्रशासन सुरळीत पाणीपुरवठ्यात मात्र अपयशी ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. शहरातही पाणी पुरवठ्याची गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. अमृत योजनेची कामे पूर्ण झाल्यावर शहरात सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही मजीप्राने दिली. मात्र, अमृत योजनेची ६० टक्के कामे अद्यापही शिल्लक असल्यामुळे सद्यस्थितीत तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे चिन्हे नाहीत. मजीप्राकडे ९० हजार ५० ग्राहकांची संख्या असून, या सर्व ग्राहकांना १६ पाणी टाक्यावरून सद्यस्थितीत दररोज ११२ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, सद्यस्थितीत विहिरी व बोअरवेल आटल्यामुळे मजीप्राकडे पाण्याची मागणी दुपटीने वाढल्यामुळे ग्राहकांना नियमित पाणी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मजीप्राकडून खालच्या भागात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र, उंच ठिकाणी पाणीटंचाईची झळ ग्राहकांना सोसावी लागत आहे. बडनेरात एकाच जुन्या टाकीवर पाणीपुरवठ्याची मदार असल्यामुळे तेथील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे गोपालनगर, मराठा कॉलनी, शहरालगतच्या काही भागांमध्ये पाणीप्रश्न पेटला आहे.अमृतमधील कामांच्या दिरंगाईमुळे कलहअमृत योजनेतील ६० टक्के कामे अजूनही अपूर्ण असून, ती कामे संथगतीने सुरू आहेत. पाइप लाइन टाकणे, नळ जोडणी करणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या उंच टाक्यासह अन्य अनेक कामे रखडलेली असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.पाणी मिळत नाहीमासोद येथील जलशुद्धीकरण केंद्राची ९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची मर्यादा आहे. मात्र, सद्यस्थितीत ११२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज केला जात आहे. मर्यादेपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत असताना मागणीही दुपटीने वाढली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची मागणी पाहता, ग्राहकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड सुरु झाली आहे.राधानगरातील पाईपलाईन फुटलीअमरावती : राधानगरातील गल्ली क्रमांक २ मध्ये सिमेंट रस्त्यावरील पाईपलाईन फुटल्यामुळे या भागात नळ येतात तेव्हा हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतो. गेल्या आठ दिवसांपासून नागरिक हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत असून, या ठिकाणी काही नागरिकांनी मजीप्राकडे तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेण्यात आलेली नाही. गेल्या आठ दिवसांपासून पाण्याचा अपव्यय होत असून, रस्त्याने पाणी वाहत आहे. एकीकडे एक दिवसआड पाणीपुरवठा, तर दुसरीकडे असा अपव्यय सुरू आहे. संबधित अभियंत्यांनी या भागाची पाहणी करून समस्या निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.शंकरनगरातील विहिरींची पातळी गेली खोलअमरावती : शंकरनगरातील सार्वजनिक व घरगुती विहिरींची पातळी खोल गेली असून, यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी मजीप्राच्या नळाला एक दिवसाआड अवेळी व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. शंकरनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विहिरीवरून अंदाजे १०० च्या वर कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या ठिकाणी राजापेठ उड्डाणपुलाच्या कामासाठी एका कंपनीने स्मशानभूमीलगत खुल्या भूखंडावर चार ते पाच बोअरवेल केल्या आहेत. हजारो लिटर पाण्याचा उपसा केल्यामुळे भूजल पातळी खोल गेली असल्याने परिसरातील बहुतांश खासगी विहिरी आटल्या आहेत.विहिरी व बोअरवेल आटल्याने मजीप्राच्या पाण्याचा वापर अधिक वाढला आहे. पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे मोठा ताण वाढला आहे. पाऊस पडल्यानंतर मागणी कमी होईल. त्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.- किशोर रघुवंशी,उपविभागीय अभियंता, मजीप्रा