शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

शहरातील पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 22:41 IST

मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने शहरातील बहुतांश जलस्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याची मदार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आली आहे. त्याचवेळी पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे आता शहरातही पाणीप्रश्न पेटला आहे. अमृत योजनेच्या भरवशावर बढाया मारणारे मजीप्रा प्रशासन सुरळीत पाणीपुरवठ्यात मात्र अपयशी ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.

ठळक मुद्देमागणीत दुपटीने वाढ : नियमित पाणीपुरवठ्यात मजीप्रा अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने शहरातील बहुतांश जलस्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याची मदार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आली आहे. त्याचवेळी पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे आता शहरातही पाणीप्रश्न पेटला आहे. अमृत योजनेच्या भरवशावर बढाया मारणारे मजीप्रा प्रशासन सुरळीत पाणीपुरवठ्यात मात्र अपयशी ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. शहरातही पाणी पुरवठ्याची गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. अमृत योजनेची कामे पूर्ण झाल्यावर शहरात सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही मजीप्राने दिली. मात्र, अमृत योजनेची ६० टक्के कामे अद्यापही शिल्लक असल्यामुळे सद्यस्थितीत तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे चिन्हे नाहीत. मजीप्राकडे ९० हजार ५० ग्राहकांची संख्या असून, या सर्व ग्राहकांना १६ पाणी टाक्यावरून सद्यस्थितीत दररोज ११२ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, सद्यस्थितीत विहिरी व बोअरवेल आटल्यामुळे मजीप्राकडे पाण्याची मागणी दुपटीने वाढल्यामुळे ग्राहकांना नियमित पाणी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मजीप्राकडून खालच्या भागात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र, उंच ठिकाणी पाणीटंचाईची झळ ग्राहकांना सोसावी लागत आहे. बडनेरात एकाच जुन्या टाकीवर पाणीपुरवठ्याची मदार असल्यामुळे तेथील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे गोपालनगर, मराठा कॉलनी, शहरालगतच्या काही भागांमध्ये पाणीप्रश्न पेटला आहे.अमृतमधील कामांच्या दिरंगाईमुळे कलहअमृत योजनेतील ६० टक्के कामे अजूनही अपूर्ण असून, ती कामे संथगतीने सुरू आहेत. पाइप लाइन टाकणे, नळ जोडणी करणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या उंच टाक्यासह अन्य अनेक कामे रखडलेली असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.पाणी मिळत नाहीमासोद येथील जलशुद्धीकरण केंद्राची ९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची मर्यादा आहे. मात्र, सद्यस्थितीत ११२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज केला जात आहे. मर्यादेपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत असताना मागणीही दुपटीने वाढली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची मागणी पाहता, ग्राहकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड सुरु झाली आहे.राधानगरातील पाईपलाईन फुटलीअमरावती : राधानगरातील गल्ली क्रमांक २ मध्ये सिमेंट रस्त्यावरील पाईपलाईन फुटल्यामुळे या भागात नळ येतात तेव्हा हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतो. गेल्या आठ दिवसांपासून नागरिक हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत असून, या ठिकाणी काही नागरिकांनी मजीप्राकडे तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेण्यात आलेली नाही. गेल्या आठ दिवसांपासून पाण्याचा अपव्यय होत असून, रस्त्याने पाणी वाहत आहे. एकीकडे एक दिवसआड पाणीपुरवठा, तर दुसरीकडे असा अपव्यय सुरू आहे. संबधित अभियंत्यांनी या भागाची पाहणी करून समस्या निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.शंकरनगरातील विहिरींची पातळी गेली खोलअमरावती : शंकरनगरातील सार्वजनिक व घरगुती विहिरींची पातळी खोल गेली असून, यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी मजीप्राच्या नळाला एक दिवसाआड अवेळी व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. शंकरनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विहिरीवरून अंदाजे १०० च्या वर कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या ठिकाणी राजापेठ उड्डाणपुलाच्या कामासाठी एका कंपनीने स्मशानभूमीलगत खुल्या भूखंडावर चार ते पाच बोअरवेल केल्या आहेत. हजारो लिटर पाण्याचा उपसा केल्यामुळे भूजल पातळी खोल गेली असल्याने परिसरातील बहुतांश खासगी विहिरी आटल्या आहेत.विहिरी व बोअरवेल आटल्याने मजीप्राच्या पाण्याचा वापर अधिक वाढला आहे. पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे मोठा ताण वाढला आहे. पाऊस पडल्यानंतर मागणी कमी होईल. त्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.- किशोर रघुवंशी,उपविभागीय अभियंता, मजीप्रा