शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणच वाचवू शकते पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:42 IST

जिल्ह्यातील ९० टक्के क्षेत्र हे जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या मोसमी पावसावर अवलंबून असते. पाऊस हल्ली बेभरवशाचा झाला आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचे प्रत्येक थेंब उपयोगात आणणे महत्त्वाचे ठरते. निसर्गाच्या लहरीपणावर बंधन घालणे शेतकऱ्यांना शक्य नाही.

ठळक मुद्देकोरडवाहू शेतीसाठी आवश्यक : पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ९० टक्के क्षेत्र हे जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या मोसमी पावसावर अवलंबून असते. पाऊस हल्ली बेभरवशाचा झाला आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचे प्रत्येक थेंब उपयोगात आणणे महत्त्वाचे ठरते. निसर्गाच्या लहरीपणावर बंधन घालणे शेतकऱ्यांना शक्य नाही. परंतु आवश्यकता नसताना आलेले आगाऊ पावसाचे पाणी शेतातच साठवणे व गरजेच्या वेळी उपयोगात आणणे शक्य होऊ शकते. अतिवृष्टीमुळे होणारी मातीची धूप थांबविण्यासाठी व एका पाण्याअभावी वाया जाणारे पीक वाचविण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण अगदी महत्त्वाचे ठरते.गत दोन, तीन वर्षांपासून पाऊस अनियमित व लहरीपणामुळे पिकांची उत्पादकता बेभरवशाची झाली आहे. साधारणपणे बहुतेक पिकाला त्यांच्या पूर्ण वाढीकरिता ४०० ते ५०० मिमी पाणी लागते. जिल्ह्याची पावसाची सरासरी ८५० मिमी आहे. तरीही पिकाची उत्पादन क्षमता अधिक राहत नाही. एका पावसामुळे पिके हातचे गेल्याचे दरवर्षी निदर्शनात येते.मोसमी वाऱ्याबरोबर येणारे पाऊस हे अनियमित व लहरी आहे. आवश्यकता नसताना पाऊस खूप येतो व गरज असते तेव्हा पडत नाही. जिल्ह्यात पारंपरिक शेती पद्धतीत अवेळी आलेला व जास्त झालेला पाऊस साठवून ठेवून गरज पडेल तेव्हा वापरायची काहीही पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे निसर्गाच्या पावसावरच शेती व्यवसाय अवलंबून राहत होता. आवश्यकता नसताना आलेला पाऊस साठवून ठेवणे शेतकऱ्याच्या हाती आहे व हाच कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढविण्याचा एकमेव तोडगा आहे.काय आहे मूलस्थानी जलसंधारण ?पावसाच्या पाण्यामुळे होणारी मातीची धूप थांबविणे, अधिकाधिक पाणी शेतातच जिरावे यासाठी शेताच्या उताराला आडवी पेरणी, पट्टापीक पद्धतीने पेरणी, पावसाळ्यात उघाडीच्या दिवसांत पिकांची आंतरमशागत व उताराला आडव्या खोल सरी आदी प्रकारात पावसाचे पाणी शेतातच अधिक प्रमाणात जिरावे यासाठी केलेले उपाय, यामधून पिकाची उत्पादकता वाढते याला मूलस्थानी जलसंधारण म्हणतात.पिकांच्या ओळीमध्ये खोलसरीपेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी दोन ओळीनंतर डवऱ्याच्या सहाय्याने सरी काढल्या जातात. अशा सरीत पावसाचे पाणी अडवून शेतातच मुरते व जास्तीचे पाणी शेतातून बाहेर काढता येते.समपातळीत शेतीपिकाची पेरणी किंवा लागवड शेताच्या उताराला आडव्या दिशेने समपातळीत केल्यास पावसाचे पाणी सरीच्या किंवा पिकांच्या सर्व भागावर सारख्या प्रमाणात रुजण्यास मदत होते. वाहून जाणाऱ्या मातीचे संवर्धन होऊन पोत टिकून राहतो. कुंटूर पद्धतीने शेती करण्यासाठी शेतातील उताराच्या मधोमध गवत किंवा मातीचा एखादा बांध काढणे महत्त्वाचे ठरते.उतारास आडवी खोल सरीपिकाच्या आंतर मशागतीच्या वेळी कोळपणीला फासेच्या वरच्या बाजूला दोरी बांधून शेतात एक किंवा दोन ओळीनंतर खोल सरी पाडल्या जातात. पावसाचे पाणी खोल सरीत अडवून त्यात जिरविण्यात येते. त्यामुळे आर्द्रता कायम राहते.पट्टा पीक पद्धतज्यावेळेस आडवी पीक पद्धती जमिनीवरून वाहणारे पाण्याचे लोट अडविण्यास अपुरे पडतात. अशा वेळेस सलग एक पीक पद्धत न वापरता पट्टा पद्धतीने शेतात दोन प्रकारची पिके उतारास आडवी पेरावी.मातीची बांध बंदिस्तीशेत जमिनीचा उतार ९० ते १०० मीटरपेक्षा अधिक असल्यास शेतात मातीचे बांध टाकून उताराची लांबी कमी करावी. ज्यामुळे पावसाच्या पाण्याचे लोट कमी प्रमाणात निघून त्याद्वारे मातीची धूपही कमी करता येते. जोराचा पाऊस आल्यास बांध फुटू नये म्हणून अडविण्यात आलेले जास्तीचे पाणी नियंत्रित पद्धतीने बाहेर काढावे.रसायनांमुळे मातीचे सुपीक गुणधर्म नष्टशेत जमिनीत अधिक प्रमाणात रासायनिक खतांचा उपयोग केल्याने मातीत नैसर्गिकरीत्या असलेल्या पिकांसाठी पोषक तत्व नष्ट होतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्या पाठोपाठ त्याचे दुष्परिणामसुद्धा येतात. सेंद्रिय व नैसर्गिक पालापाचोळ्यापासून तयार तसेच शेणखत यांचा वापर केल्यास चांगले परिणाम येवू शकतात.