शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

बाहेरगावांहून आलेल्या व्यक्तींवर राहणार ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार, १५ एप्रिलपर्यंत गर्दी किंवा लोकांचा समुह एकत्र जमू न देण्याबाबतच्या दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. यानुसार शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षण, मेळावे आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : १५ एप्रिलपर्यंत तलाठी, ग्रामसेवक ठेवणार नोंद

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बाहेरगावाहून गावात येणाºया व्यक्तींची तलाठी व ग्रामसेवकामार्फत १५ एप्रिलपर्यंत नोंद ठेवण्यात येणार आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी खबरदारीचा उपाय म्हणून याविषयीचे आदेश सर्व तहसीलदार व बीडीओंना शुक्रवारी दिले.आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार, १५ एप्रिलपर्यंत गर्दी किंवा लोकांचा समुह एकत्र जमू न देण्याबाबतच्या दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. यानुसार शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षण, मेळावे आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आढावा बैठकही आता शक्यतो व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा दूरध्वनीवर घेण्यात याव्यात, याविषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिकेचे आयुक्त, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी शाळांमध्ये स्वच्छतेसंबंधी काळजीबाबत संबंधितांना कळवावे तसेच लोकांची अनावश्यक गर्दी जमू नये यासाठी काळजी घेण्याचे निर्देश सर्व शासकीय विभागप्रमुखांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.महापालिका आयुक्तांची बैठकमहापालिका आयुक्त आयुक्त संजय निपाणे यांनी गुरुवारी सायंकाळी पाचही सहायक आयुक्त, शहर अभियंता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन कोरोना प्रादुर्भाव शहरात होऊ नये, यासंबंधी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सूचना दिल्या. या अनुषंगाने महापालिकेची सर्व आरोग्य केंदे्र, उपकेंद्रांची स्वच्छता करण्यात आलेली आहे व आरोग्य अधिकाºयांना मास्क पुरविण्यात आल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले.‘क्वॉरंंटाइन’साठी वृद्धाश्रमाचे अधिग्रहणकोरोनाग्रस्त भागातून (क्वॉरंटाईन) एकाच वेळी अनेक व्यक्ती शहरात दाखल झाल्यास त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यासाठी व्यवस्थेचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्हीसीदरम्यान दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत वलगावनजीक संत गाडगेबाबा वृद्धाश्रमाची पाहणी केली. मोकळी जागा, पाण्याची व्यवस्था असल्याने ६४ खोल्यांचे हे वृद्धाश्रम शुक्रवारी जिल्हाधिकाºयांनी अधिग्रहीत केले.‘आयसोलेशन’ कक्ष म्हणजे काय?जेव्हा विशिष्ट आजाराचे लक्षण असलेल्या व्यक्तीला उपचाराची गरज असते व दुसऱ्याला हा आजार होऊ नये, यासाठी स्वतंत्र कक्षात तिच्यावर उपचार केले जातात, याला ‘आयसोलेशन’ कक्ष म्हणतात. जिल्हा सामान्य रुग्णालयातील या कक्षात पाच बेड व डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालय (पीडीएमसी) येथे चार बेडची व्यवस्था करण्यात आल्याचे सीएस डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.‘अट्टा’ला मागितली प्रवाशांची माहितीअमरावती जिल्हा टूर्स अँड ट्रॅव्हल असोशिएशन (अट्टा) च्या पदाधिकाºयांची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकाºयांनी बोलाविली. यामध्ये अमरावती येथून परदेशात गेलेल्या व परदेशातून गत १५ दिवसांत जिल्ह्यात आलेल्या सर्व प्रवाशांची माहिती मागविण्यात आली. कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान झालेले आहे. याचा बुकिंग खर्च व परतावा मिळू शकत नसल्याने राज्य शासनाने तो द्यावा आणि यासाठी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. बैठकीला आरडीसी नितीन व्यवहारे, संघटनेचे अध्यक्ष भूषण कोल्हे, उमेश उमप आदी उपस्थित होते.‘क्वॉरंटाइन’ कक्ष म्हणजे काय?विशिष्ट रोगाचा प्रादुर्भाव आहे व एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात १०० ते २०० व्यक्ती आल्या आहेत. त्यामुळे ती व्यक्ती आजारी नसली तरी तिला १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. या कक्षाला ‘क्वारंटाइन’ कक्ष म्हणतात. जिल्ह्यात यासाठी वलगावजवळच्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील ६४ खोल्या शुक्रवारी अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना