शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

बियाणे, खतांच्या विक्रीवर ६२ भरारी पथकांचा वॉच

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 23, 2023 16:46 IST

खरिपाची लगबग, शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर ६२ कक्ष स्थापित.

गजानन मोहोड/अमरावती: खरीप हंगाम दीड महिन्यांवर आल्याने कृषी विभागाची लगबग सुरु झालेली आहे. हंगामासाठी कृषी निविष्ठामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याकरिता पश्चिम विदर्भात यंदा कृषी निविष्ठा विक्रीवर ६२ भरारी पथकांचा वॉच राहणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई होण्यासाठी तालुकास्तरावर ६२ तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे यांनी दिली.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या तयारीचा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार २८ एप्रिल रोजी पश्चिम विदर्भाचा आढावा घेणार आहे. यासाठी कृषी विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. पेरणी काळात शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत मिळाव्यात, त्यांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी गुणनियंत्रण विभागाची महत्त्वाची भूमिका असते. यासाठी १७१ गुण नियंत्रण निरीक्षक यांच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे.शेतकऱ्यांना बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खते वेळेत व योग्य भावाने उपलब्ध व्हावीत, यासाठी अमरावती जिल्ह्यात १५, यवतमाळ १७, अकोला ८, वाशिम ७, बुलडाणा १४ व विभागस्तरावर १ असे एकूण ६२ भरारी पथकांचे गठण करण्यात आल्याची माहिती कृषी सहसंचालकांनी दिली. याशिवाय शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या एकच टोल फ्री १८०० २३३ ४००० हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ५६ समित्या

पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या कृषी विषयक तक्रारी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर ५६ तक्रार निवारण समित्यांचे गठण करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १४, यवतमाळ १६, अकोला ७, वाशिम ६ व बुलडाणा जिल्ह्यात १३ आहेत. याशिवाय ६२ निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात आल्याचे कृषी सहसंचालकानी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Amravatiअमरावती