शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

बियाणे, खतांच्या विक्रीवर ६२ भरारी पथकांचा वॉच

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 23, 2023 16:46 IST

खरिपाची लगबग, शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर ६२ कक्ष स्थापित.

गजानन मोहोड/अमरावती: खरीप हंगाम दीड महिन्यांवर आल्याने कृषी विभागाची लगबग सुरु झालेली आहे. हंगामासाठी कृषी निविष्ठामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याकरिता पश्चिम विदर्भात यंदा कृषी निविष्ठा विक्रीवर ६२ भरारी पथकांचा वॉच राहणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई होण्यासाठी तालुकास्तरावर ६२ तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे यांनी दिली.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या तयारीचा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार २८ एप्रिल रोजी पश्चिम विदर्भाचा आढावा घेणार आहे. यासाठी कृषी विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. पेरणी काळात शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत मिळाव्यात, त्यांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी गुणनियंत्रण विभागाची महत्त्वाची भूमिका असते. यासाठी १७१ गुण नियंत्रण निरीक्षक यांच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे.शेतकऱ्यांना बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खते वेळेत व योग्य भावाने उपलब्ध व्हावीत, यासाठी अमरावती जिल्ह्यात १५, यवतमाळ १७, अकोला ८, वाशिम ७, बुलडाणा १४ व विभागस्तरावर १ असे एकूण ६२ भरारी पथकांचे गठण करण्यात आल्याची माहिती कृषी सहसंचालकांनी दिली. याशिवाय शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या एकच टोल फ्री १८०० २३३ ४००० हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ५६ समित्या

पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या कृषी विषयक तक्रारी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर ५६ तक्रार निवारण समित्यांचे गठण करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १४, यवतमाळ १६, अकोला ७, वाशिम ६ व बुलडाणा जिल्ह्यात १३ आहेत. याशिवाय ६२ निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात आल्याचे कृषी सहसंचालकानी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Amravatiअमरावती