शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

शैक्षणिक कार्यावर शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेचा ‘वॉच‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:11 IST

अमरावती : कोरोनामुळे अद्यापही शाळा सुरू करण्याचे नियोजन झालेले नाही. या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने ...

अमरावती : कोरोनामुळे अद्यापही शाळा सुरू करण्याचे नियोजन झालेले नाही. या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने गुणवत्ता विकासाचा ध्यास घेऊन स्थानिक स्तरावर शैक्षणिक कृतीबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे की नाही, यावर शिक्षण विभागाची पर्यवेक्षीय यंत्रणा नियंत्रण ठेवणार आहे.

कोरोनामुळे सध्या शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांमधील शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली असली तरी त्यांना ‘वर्क फ्रॉम होम‘ करावे लागणार आहे. ऑनलाइन अध्यापनात जिल्हा परिषदेच्या शाळांनी गुणवत्तेचा टक्का टिकून ठेवला असला तरी त्यात वाढ व्हावी, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या सूचनेप्रमाणे कामकाज करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

बॉक्स

पर्यवेक्षीय यंत्रणा लक्ष ठेवून

शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील शाळाभेटीत ऑनलाइन अध्यापन, शिक्षण विभागाने गुणवत्तेविषयी दिलेल्या उपक्रमांची अंमलबजावणी, विविध योजनांचे लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, कामकाजाचा आढावा आदी मुद्द्यांवर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख लक्ष ठेवतील. त्यानुसार आता सर्वांना काम करावे लागणार आहे.

बॉक्स

अध्यापनाबाबत सूचना

अध्यापनाचे दैनंदिन वेळापत्रक, प्रत्येक वर्गशिक्षकाने पालक बैठक घेणे, एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणे, ऑनलाईन व ऑफलाईन लाभार्थी विद्यार्थी नियोजन करणे, प्रत्येक वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुप करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

बॉक्स

या माध्यमातून शिक्षण

शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना दीक्षा ॲप, स्वाध्याय ॲप आणि शिक्षक मित्र आदींच्या माध्यमातून अध्यापन केले जात आहे.

कोट

कोरोनामुळे ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती आहे. शिक्षक शाळेत नसले तरी त्यांनी घरून मुलांना अध्यापन करणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाच्या सूचनेप्रमाणे पर्यवेक्षीय यंत्रणेकडून यावर लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक स्तरावर याविषयी नियोजन केले आहे.

- ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)