शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

वऱ्हाडाच्या ट्रकला अपघात, ४० जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:16 IST

लग्न आटोपून वऱ्हाडी घेऊन परतणाऱ्या ट्रकला घटांगनजीक अपघात झाल्याने ४० जण जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

ठळक मुद्देघटांगनजीकची घटना : चालक दारुच्या नशेत, पाच गंभीर, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : लग्न आटोपून वऱ्हाडी घेऊन परतणाऱ्या ट्रकला घटांगनजीक अपघात झाल्याने ४० जण जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी रात्री ९ च्या सुमारास घटांगनजीक ही घटना घडली. चिखलदरा पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमींवर सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.धारणी तालुक्यातील पाथरपूर येथून रविवारी सकाळी ७ वाजता एमएच ०४ एचडी ०४५३ क्रमांकाचा ट्रक ५५ वऱ्हाडींना घेऊन मध्य प्रदेशातील थापोडा येथे गेला. परतीच्या प्रवासात घटांगनजीक भरधाव ट्रक रस्त्याखाली उतरून ३०० फूट अंतरापर्यंत फरफटत गेला आणि उलटला. या अपघातात ४० वºहाडी जखमी झाले. पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिखलदरा पोलिसांनी जयराम भोले भिलावेकर (८०, रा. पाथरपूर) यांच्या फिर्यादीवरून पसार चालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला.नेटवर्क नसल्याने अफवांना ऊतघटांग, सलोना, सेमाडोह या परिसरात कुठलेही मोबाइल नेटवर्क मिळत नाही. रविवारी रात्री झालेल्या अपघाताची माहिती प्रशासनाला देण्यासाठी घटांग येथील काही युवकांनी उंच टेकडीवर जाऊन संवाद साधला. तरीही अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची अफवा पसरली होती. मध्यरात्री सर्व शंका-कुशंकांना विराम मिळाला.रुग्णसेवा अलर्टरविवारी रात्री ८.३० वाजता ट्रक अपघात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले लगेच नजीकच्या सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. त्यानंतर अचलपूर व अमरावती येथे गंभीर रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यात आले अपघात घडताच चिखलदरा पोलीस तथा परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली होती. अधीक्षक डॉक्टर जाकीर स्वत: जखमींची माहिती घेत होते.