शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

प्रभाग रचना : दुधाने पोळले, ताकही फुंकून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार सरकारने आपल्याकडे घेतले. त्यामुळे तीन सदस्यीय प्रभागानुसारच निवडणूक होण्याची शक्यता जास्त आहे. तरीही काही नगरसेवक दोन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होईल, अशी आशा लावून बसले आहेत. परंतु, यात काही तथ्य नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रभाग रचनेच्या आदेशाने राजकारण हळूहळू तापू लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीस अनुसरून प्रभाग रचना करावी, असे आदेश नगर विकास विभागाने महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. ११ एप्रिल रोजी ते आदेश आले होते. मात्र, पुढे १४ ते १७ एप्रिल या कालावधीत सुट्या आल्याने १८ एप्रिलपासून प्रभागरचना प्रक्रियेला वेग येणार आहे. याआधीची प्रभाग रचना ‘लीक’ झाल्याने महापालिका आयुक्तांची थेट बदलीच झाली. दोघांचे निलंबनही झाले. त्यामुळे दुधाने ओठ पोळलेले प्रशासन आता ताकही फुंकून पिण्याच्या मानसिकतेत आहे. दरम्यान, राज्यातील निवडणूक होऊ घातलेल्या महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम झाली आहे. ओबीसी आरक्षण नसल्याने राज्य सरकारने विधिमंडळात नवीन विधेयकाद्वारे कायदा पारित केला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर २१ एप्रिलला सुनावणी होणार आहे. १८ ते २१ दरम्यान राज्य निवडणूक आयोग व नगरविकास विभागाच्या नव्या आदेशाकडेदेखील प्रशासनाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन २१ पर्यंत ‘आस्ते कदम’च्या भूमिकेत आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या गाईड लाईननुसार प्रभाग रचनेचे प्रारूप तयार होणार असल्याने इच्छुकांसाठी बाब आनंददायी आहे. 

...असे आहेत आदेश महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार, १९४९मधील अधिनियमानुसार, ज्या महापालिकांची मुदत संपली व संपणार आहे, त्यांना आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जनगणनेनुसार प्रभाग रचना करावी लागेल. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या २८ डिसेंबर २०२१ व २७ जानेवारी २०२२  रोजीच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घ्यावा.  त्यानुसार, तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे. 

निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसारचनिवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार सरकारने आपल्याकडे घेतले. त्यामुळे तीन सदस्यीय प्रभागानुसारच निवडणूक होण्याची शक्यता जास्त आहे. तरीही काही नगरसेवक दोन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होईल, अशी आशा लावून बसले आहेत. परंतु, यात काही तथ्य नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रभाग रचनेच्या आदेशाने राजकारण हळूहळू तापू लागले आहे.

राज्य सरकारकडून अधिकाराची अंमलबजावणी राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात विशेष कायदा पारित केला. राज्यातील १८ महापालिकांसाठी तयार केलेली प्रारूप प्रभाग रचना रद्द केली. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे  घेतले. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने  कोणतीही कारवाई केली नव्हती. आता या अधिकाराची अंमलबजावणी सुरू केली.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग