शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

दर्यापुरात उमेदवारांची मारामार

By admin | Updated: June 12, 2014 23:38 IST

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघात दमदार उमेदवारांची मारामार आहे. नवेच्छुकांना त्यामुळे या मतदारसंघात मोठी संधी उपलब्ध आहे. नवागतांमध्ये दावेदारीसाठी सुरू झालेली

गणेश देशमुख - अमरावतीअमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघात दमदार उमेदवारांची मारामार आहे. नवेच्छुकांना त्यामुळे या मतदारसंघात मोठी संधी उपलब्ध आहे. नवागतांमध्ये दावेदारीसाठी सुरू झालेली पराकोटीची चढाओढ नागरिकांसाठी मनोरंजनाचा विषय ठरला आहे. दर्यापूरचे आमदार अभिजित अडसूळ यांचा निवडणुकीपूर्वी त्या मातीशी दुरान्वये संबंध नव्हता. वडिलांच्या खासदारकीमुळे अमरावती जिल्ह्याशी संपर्क आलेल्या अभिजित यांचे वास्तव्य मुंबईत. जसे ते निवडणुकीपूर्वी, तसेच ते निवडणुकीनंतरही! मोदींच्या लाटेचा लाभ त्यांचे पिताश्री आनंदराव अडसूळ यांना झाला; तथापि अभिजित यांना तो कितपत होणार याबाबत काळच काय ते सांगेल. सन २००९ पासून अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात १९९० ते २००९ पर्यंत प्रकाश पाटील भारसाकळे यांनी राज्य केले. ते सतत चार वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. डिसेंबर २००६ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी राणे यांनी फोडलेल्या आमदारांमध्ये भारसाकळे यांचाही समावेश होता. शेवटच्या अडीच वर्षांचा आमदारकीचा त्यांचा कार्यकाळ काँग्रेसच्या तिकिटावरील होता. निसटता विजय त्यांना मिळाला होता. त्यानंतर राखीव मतदारसंघाचे पहिले आमदार अभिजित हे ठरले. दावेदारांच्या चढाओढीचा लाभ आमदार अभिजित अडसूळ यांच्यासाठी जसा मागच्यावेळी लाभाचा मुद्दा होता तसाच तो यावेळीही लाभाचा मुद्दा ठरू शकतो. शिवसेनेच्या या गडात काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची यादी मोठी आहे. श्रीराम नेहर, अमरावतीचे किशोर बोरकर, पक्षाच्या डॉक्टर सेलचे पदाधिकारी असलेले आकोटचे हृदयरोेगतज्ज्ञ कैलास जपसरे, युवक काँग्रेसचे भूषण खंडारे, अचलपूरचे नगराध्यक्ष अरुण वानखडे या सर्वांना संधीची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा स्थानिक चेहरा या मतदारसंघात नाही. लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांच्या नाकात दम आणणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत कौर-राणा यांची दर्यापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी आहे. नवनीत दर्यापुरातून लढल्यास जिल्हाभरात दर्यापूर मतदारसंघ आकर्षणाचा विषय ठरेल. भाजपक्षाकडे या मतदारसंघात चेहरा नाही. सातत्याने मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे भाजपक्षाने तसा प्रयत्नच केला नाही. आज वेगळे लढण्याची वेळ आल्यास भाजपसमोर पेचप्रसंग उभा ठाकेल. भारिप-बहुजन महासंघ या जागेची मागणी करीत आहे. विष्णू कुऱ्हाडे यांची दावेदारी आहे. आरपीआयकडून रामेश्वर अभ्यंकर आणि बळवंत वानखडे ही दोन नावे चर्चेत आहेत. आरपीआयची भूमिका अद्याप निश्चित नाही. मनसेसाठी गोपाल चंदन आणि अविनाश गायगोले हे प्रबळ दावेदार आहेत. लोकसभा निवडणूक लढविणारे गुणवंत देवपारे यांच्या नावाची बसपाकडून अधूनमधून चर्चा होते; तथापि त्यांचा मतदारसंघात संपर्क सुरू झालेला नसल्यामुळे बसपातर्फे दुसरे नाव येण्याची शक्यता अधिक आहे.