शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सेनापतीविरुद्ध रयत

By admin | Updated: July 22, 2016 00:04 IST

छत्रपतींचे स्वराज्य. रयतेला जराही त्रास झाला तर याद राखा- हा राज्यकारभार हाकताना पाळला जाणारा काटेकोर कटाक्ष.

अमरावती : छत्रपतींचे स्वराज्य. रयतेला जराही त्रास झाला तर याद राखा- हा राज्यकारभार हाकताना पाळला जाणारा काटेकोर कटाक्ष. अचानक एक बाका प्रसंग उद्भवतो. एक मस्तवाल गुंड रयतेला घोड्याच्या टापांखाली अन् टांग्याच्या चाकांखाली चिरडत निघतोे. काही अबालवृद्ध क्षणात मृत्यू पावतात. रयत संतापते. भालाधारी, तलवारधारी अश्वारूढ रक्षकांनाही न जुमानणाऱ्या त्या खुन्याला पाठलाग करून रयतच धरते. स्वराज्यातील रक्षकही मागोमाग पोहोचतात. एव्हाना वायुगतीच्या अश्वस्वार हेरांनी निरोप कळविला असल्याने त्या प्रांताचा सेनापतीही भाले, तलवारी, बंदुकी आणि तोफधारी सैनिकांच्या लवाजम्यासह घटनास्थळी धडकतो. प्रांताचा तो सेनाप्रमुखच. त्याचा दरारा केवढा. तो येताच रयत आश्वस्त होणार, हेच सर्वांना अपेक्षित. जनजीवन पूर्ववत करणे हे त्याचे कर्तव्यही! पण अचंबित घडते. त्या सेनापतीला बघून रयत लालबुंद होते. अखेर रयतेवरच भाले-तलवारी उगारल्या जातात. मुस्कटदाबीचे आदेश सुटतात. रात्रभर सैन्याच्या गराड्यात मर्दुमकी दाखविणारा हा सेनापती पहाट होऊ लागताच मुख्यालयाच्या दिशेने पळत सुटतो. सुर्याच्या उजेडात रयतेच्या भेदक नजरांशी सामना करण्याचे बळ त्याच्या अंगी उरलेलेच नसते. लोकांच्या मनातील आग आपल्याला खाक करू शकेल, अशी धडकीही त्याला भरलेली असते. राजधानीतील सल्लागारांपर्यंत खबरबात पोहोचते. सेनापतीविरुद्धचा जनाक्रोश कळतो. सेनापतीला पुन्हा घटनास्थळी न जाण्याचा सल्ला देऊन त्या प्रांताच्या महसूल प्रमुखाला तेथे धाडले जाते. सेनापतीच खरा दोषी. त्याची राजवट जुलूमी. स्वराज्याच्या सेवेतून त्याला बडतर्फ करा, अशी मागणी रयतेकडून रेटली जाते. काही वेळाने निर्णय येतो- चार भालाधारी सैनिकांचे निलंबन केल्याचा. जुलूमी सेनापतीनेच हा हुकूम जारी केलेला असतो. 'हे राज्य रयतेचे' असे अभिमानी बोल चौफेर गुंजणाऱ्या स्वराज्यात असे घडले असते काय? लोकभावनेचा उद्रेक होईस्तोवर त्या सेनापतीची कार्यप्रणाली अशी निरंकुश ठेवली गेली असती काय? मस्तवालांची गैरकृत्ये प्रांतभर अशी सरेआम घडेस्तोवर कायदा लाचार झाला असता काय? सेनापतीविरुद्ध भडकलेल्या लोकसंतापानंतरही सेनापतीला अभय दिले गेले असते काय? इतिहासाच्या कसोटीवर तपासले तर उत्तर मिळेल- नाही! स्वच्छ प्रशासन आणि लोककल्याणकारी राज्यकारभारासाठी ज्या राजाचे नाव जगभर नव्या उत्कंठेने तरारून उमलले आहे, त्याच राजा शिवछत्रपतींच्या नावावर देवेंद्र फडणवीसांच्या सरकारचाही राज्यकारभार सुरू आहे. अर्थात् फडणवीस सरकारलाही छत्रपतींच्या आदर्श शासनकौशल्यांचा अंमल करावयाची प्रामाणिक इच्छा आहे. ही तुलना त्याच कारणापायी. अमरावती जिल्ह््यातील चांदुरबाजार-खरवाडी येथे जे घडले त्यावरून येथील कायदा सुव्यवस्थेचे अधिष्ठान किती तकलादू आहे, याची प्रचिती आली. गोवंश हत्याबंदीचा कायदा अलिकडेच करण्यात आला. शासन संवेदनशील आहे, म्हणूनच हा कायदा आला. तथापि, अमरावती जिल्ह््यात प्रशासनाच्यावतीने या कायद्याची राजरोसपणे कत्तल केली जाते. अटकेतील आरोपीने दिलेल्या बयानानुसार दर आठवड्याला दोन ट्रक गाय-बैल अवैध कत्तलींसाठी तो अमरावतीत आणायचा. त्याचा तो नियमित व्यवसाय. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या हद्दीतील मोर्शीपासून तर अमरावतीपर्यंतच्या पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना कसे विकत घ्यायचे, याबाबत चालकने हुकूमत मिळविली होती. म्हणूनच चांदुरात ट्रक अडविण्यासाठी काही तरुण नेताजी चौकात उभे असल्याची कुणकुण लागूनही चालकाने आडमार्गाने ट्रक नेण्याचे धैर्य केले. कत्तलीच्याच व्यवसायाशी जुळला असल्याने माणसांच्या शरीरांची ट्रकच्या धडकेने तोडमोड करताना त्या निर्दयी चालकाला जरेही हळवेपणा वाटला नाही. पकडला गेला म्हणून सत्य रेकॉर्डवर आले. अमरावती हे गोवंश मांसव्यापाराचे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय केंद्र होते. अरबदेशांमध्ये अमरावतीतून मांस पाठविले जाई. गोवंशबंदी कायद्यापासून हा व्यापार प्रभावित झाला असला तरी बंद झालेला नाही. हल्ली शहरात किमान शंभर आणि ग्रामीण भागात ४०० गोवंशांची कत्तल केली जाते. हैद्राबाद, विजयवाडा, गुंटूर अशा शहरांमध्ये मांस पाठविले जाते. गोवंशहत्या थांबविण्यासाठी बजरंग दल, विश्वहिंदू परिषद, गोरक्षण समिती, पशुपालन समिती यांचा बेंबीच्या देठापासूनचा लढा अव्याहतपणे सुरूच आहे. अमरावतीकरांनी एकत्रित येऊन तयार असलेला अधिकृत कत्तलखाना कार्यान्वित होऊ दिला नाही. गोवंशांवर प्रेम करणाऱ्या भगवान कृष्णांची सासुरवाडी असलेला हा जिल्हा प्राणीप्रेमाबाबत जितका संवेदनशील आहे, एसपी लखमी गौतम तितकेच याविषयी बोथट आहेत. अलिकडे बहुतांश अवैध कत्तलखाने ग्रामीण भागातील शेतांमध्ये स्थानांतरीत झाले आहेत.