शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
5
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
6
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
8
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
9
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
10
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
11
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
12
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
13
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
14
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
15
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
16
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
17
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
18
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
19
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
20
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!

विद्यापीठात हिवाळी अन् उन्हाळी परीक्षा शुल्क माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:41 AM

राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१८-२०१९ या चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देदुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना लाभ : प्राचार्य, महाविद्यालयीन प्रमुखांना विद्यापीठाकडून पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१८-२०१९ या चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना यंदा हिवाळी व उन्हाळी परीक्षा शुल्क माफ केले आहे. या आशयाचे पत्र विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन विभागाने प्राचार्यांना पाठविले आहे.विद्यापीठ प्रशासनाने ९ जानेवारी २०१९ रोजी प्राचार्य, शैक्षणिक संस्था प्रमुखांना दुष्काळी तालुक्यातील परीक्षा शुल्क माफीसंदर्भातील गुंतागुंत सोडविली आहे. हिवाळी-२०१८ आणि उन्हाळी-२०१९ या दोन्ही परीक्षांचे शुल्क विद्यार्थ्यांना देण्याची गरज असणार नाही.प्राचार्यांनीसुद्धा शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुुल्कमाफीचा लाभ मिळणेसाठी योग्य ती कार्यवाही करण्याचा सूचना दिल्या आहेत. यात विद्यापीठ प्रशासनाने शालेय शिक्षण, महसूल व वनविभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्णयाचा आधार घेतला आहे.प्राचार्यांनी दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेण्याबाबतची कार्यवाही करू नये, असे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. विद्यापीठाने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.विद्यार्थ्यांना सादर करावे लागणार अर्जदुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या कागदपत्रांसह प्राचार्यांकडे परीक्षा शुल्कमाफीसाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना दुष्काळी गावाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र आदी महत्त्वाची कागदपत्रे महाविद्यालयांकडे सादर करावी लागणार आहेत. त्याकरिता १० जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करणे अनिवार्य केले होते. मात्र, विद्यापीठाने ९ जानेवारी रोजी प्राचार्यांना याबाबत पत्र पाठविले असताना, दुसऱ्या दिवशी म्हणजे १० जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना दुष्काळी परीक्षा शुल्क माफीसंदर्भात अर्ज सादर करण्यासाठी कसे कळविले जाणार, असा नवा गुंता निर्माण झाला आहे. त्यामुळे दुष्काळी परीक्षा शुल्कमाफीच्या लाभासाठी अर्ज सादर करण्याची मुदतवाढीची मागणी आता पुढे आली आहे.शासन मार्गदर्शक तत्त्वानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळावा, यासाठी प्राचार्यांना कार्यवाहीसाठी पत्र पाठविले आहे. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. दुष्काळी परीक्षा शुल्कमाफीतून एकही पात्र विद्यार्थी वगळणार नाही.- हेमंत देशमुखसंचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :universityविद्यापीठ