शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

१,४०० कोटींचे कर्ज होणार माफ

By admin | Updated: June 25, 2017 00:01 IST

दीड लाखांपर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केली.

दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा : २५ हजार नियमित खातेदारांनाही लाभलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीड लाखांपर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केली. याचा जिल्ह्यातील दोन लाख १२ हजार ५६५ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या सर्व शेतकऱ्यांचे ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेले एक हजार ३९८ कोटी ७८ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. त्याचप्रमाणे नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या २५ हजार ३१२ शेतकऱ्यांना २५ हजार रूपयांच्या मर्यादेत अनुदान मिळणार आहे. आर्थिक कोंडीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ व नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी व शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर कर्जाचा डोंगर झाला. मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, बँका व सावकारांच कर्ज आदीमुळे नैराश्य येऊन, जगावं कसं या विवंचनेत शेतकरी आत्महत्यांत वाढ झाली.२५ हजारांपर्यंत अनुदानअमरावती : संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले. ठिकठिकाणी आंदोलकाचा उद्रेक झाला. अखेर शासनाने नमते घेत आंदोलकांशी चर्चा केली. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीविषयीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना जाहीर केली. त्यानुसार एक एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यातील दोन लाख १२ हजार ५६५ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या शेतकऱ्यांचे एक हजार ३९८ कोटी ७८ लाखांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या किमान २५ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. मात्र कर्जमाफीच्या रकमेत व्याजाचा समावेश आहे किंवा नाही, याविषयी संदिग्धता आहे. दर्यापूर येथील शेतकरी बोडखे यांनी याविषयाचा शासनाने सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.जिल्ह्यातील दीड लाखांपर्यंतचे थकीत कर्जदारजिल्हा बँकेत ५० हजारांपर्यंत २३ हजार ८५७ शेतकरी कर्जदार आहेत. त्यांचे ९९ कोटी ३२ लाखांचे कर्ज थकीत आहे. एक लाखापर्यंत २५ हजार १३३ शेतकऱ्यांचे १२० कोटी ५४ लाख थकीत आहेत, तर दीड लाखांपर्यंत १२ हजार ८१८ शेतकऱ्यांचे ७३ कोटी एक लाख, असे एकूण ६१ हजार ३०८ शेतकऱ्यांचे २९२ कोटी ८७ लाख रुपये थकीत आहेत.राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ५० हजारांपर्यंत ८७ हजार ३६३ शेतकरी कर्जदार आहेत. त्यांचे ६४० कोटी ९४ लाखांचे कर्ज थकीत आहे. एक लाखापर्यंत ४५ हजार १८७ कर्जदार शेतकऱ्यांचे ३३१ कोटी ५२ लाख थकीत आहे, तर दीड लाखांपर्यंत १८ हजार ७५ शेतकऱ्यांचे १३२ कोटी ६१ लाख असे एकूण एक लाख ९ हजार ६२५ शेतकऱ्यांचे ११०५ कोटी सात लाख थकीत आहेत.ग्रामीण बँकांकडे ५० हजारांपर्यंत ५७५ शेतकऱ्यांचे ६ लाखांचे कर्ज थकीत आहेत. एक लाखापर्यंत ५७ शेतकऱ्यांचे २५ लाखांचे कर्ज ३० जून २०१६ पर्यंत असे एकूण ६३२ शेतकऱ्यांचे ८५ लाख थकीत आहेत.मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदानजिल्ह्यात सद्यस्थितीत २५ हजार ११२ शेतकऱ्यांनी नियमित कर्जाचा भरणा करून यंदाच्या खरिपासाठी पुन्हा कर्जाची उचल केली आहे. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार यापैकी जी रक्कम कमी आहे ती अनुदान म्हणून मिळणार आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जदार ७ हजार १८, ग्रामीण बँकांचे १९३ व जिल्हा बँकेचे कर्जदार १७ हजार ९०१ शेतकऱ्यांना या सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे.