शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

वडगावची वाट बिकटच, कामाला सुरुवात केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST

सेमाडोह ते रायपूर मार्गावरील पूल वाहून जाण्याची भीती (फोटो कॅप्शन : सेमाडोह रायपूर मार्गावरील कुवापाटी खापरा नदीपात्रात वाहून आलेले ...

सेमाडोह ते रायपूर मार्गावरील पूल वाहून जाण्याची भीती

(फोटो कॅप्शन : सेमाडोह रायपूर मार्गावरील कुवापाटी खापरा नदीपात्रात वाहून आलेले वृक्ष आणि अनेक ठिकाणी अर्धवट राहिलेला रस्ता)

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे- परतवाडा : २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीचा तडाखा मेळघाटातील अतिदुर्गम भागाला सर्वाधिक बसला. सेमाडोह येथून जाणारे सर्वच मार्ग क्षतिग्रस्त झाले आहे. ग्रामीण भागात आदिवासी पाड्यांना जोडणारे मार्ग बंद असल्याचे प्रशासनाचे सर्वेक्षण सुरू असून, प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरुवात होईल, हे मात्र लालफितीत अडकले आहे.

ढगफुटीमुळे सेमाडोह येथे तीनशे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परिसरातून वाहणाऱ्या सिपना, खुर्शी, खंडू, या प्रमुख नद्यांसह नाल्यांना महापूर आला. काही ठिकाणी अर्धा किलोमीटरपर्यंत असे दीड किलोमीटरपेक्षा अधिक डोंगर कोसळले. परिणामी मार्गच बंद झाल्याने आदिवासी पाडे संपर्कहीन झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने परतवाडा ते धारणी मार्गावरील सेमाडोहच्या खचलेल्या भूतखोरा पुलावरील काम करून आंतरराज्य मार्ग सुरळीत केला. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत रस्ते, त्यावर पडलेला मलबा हटविण्याच्या कामाव्यतिरिक्त प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याचे संतापजनक चित्र आहे.

बॉक्स

आरोग्य यंत्रणेला प्रथम प्राधान्याची गरज

सेमाडोह, माखला, चुनखडी या मार्गावर दीड किलोमीटरचा डोंगर कोसळला. लहान-मोठे पूल खचलेला रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. आठ दिवसांचा कालावधी होऊनही मलबा हटविण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. परंतु त्यासाठी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणा किंवा पदाधिकाऱ्यांनी तत्काळ तुटलेला संपर्क जोडून आरोग्य यंत्रणेला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे.

बॉक्स

सेमाडोह-रायपूर मार्गावरील पुलांना धोका

सेमाडोह, रायपूर मार्गावर खापरा नदी व कुवापाटी नदी मार्गावरील पूल धोकादायक ठरले आहे. नदीतून भव्य वृक्ष वादळी पावसात वाहून आल्याने पुलांच्या कठड्यावर अडकून पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील मुलांना धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी सहा मीटर रुंदीचा मार्ग तीन मीटर रुंद झाल्याने खचलेल्या रस्त्यावरून जीवघेणी कसरत करीत वाहन काढावी लागत असल्याचे रायपूरचे उपसरपंच सानू धांडे यांनी सांगितले.

कोट

सेमाडोह ते रायपूर मार्गावरील आठ किलोमीटरचा रस्ता नादुरुस्त झाला आहे. गुलाम कठड्याला वृक्ष अडकल्याने वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सर्वेक्षणासोबतच काम करणे गरजेचे आहे.

- सानू भुऱ्या धांडे,

उपसरपंच, रायपूर