शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वडगावची वाट बिकटच, कामाला सुरुवात केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST

सेमाडोह ते रायपूर मार्गावरील पूल वाहून जाण्याची भीती (फोटो कॅप्शन : सेमाडोह रायपूर मार्गावरील कुवापाटी खापरा नदीपात्रात वाहून आलेले ...

सेमाडोह ते रायपूर मार्गावरील पूल वाहून जाण्याची भीती

(फोटो कॅप्शन : सेमाडोह रायपूर मार्गावरील कुवापाटी खापरा नदीपात्रात वाहून आलेले वृक्ष आणि अनेक ठिकाणी अर्धवट राहिलेला रस्ता)

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे- परतवाडा : २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीचा तडाखा मेळघाटातील अतिदुर्गम भागाला सर्वाधिक बसला. सेमाडोह येथून जाणारे सर्वच मार्ग क्षतिग्रस्त झाले आहे. ग्रामीण भागात आदिवासी पाड्यांना जोडणारे मार्ग बंद असल्याचे प्रशासनाचे सर्वेक्षण सुरू असून, प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरुवात होईल, हे मात्र लालफितीत अडकले आहे.

ढगफुटीमुळे सेमाडोह येथे तीनशे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परिसरातून वाहणाऱ्या सिपना, खुर्शी, खंडू, या प्रमुख नद्यांसह नाल्यांना महापूर आला. काही ठिकाणी अर्धा किलोमीटरपर्यंत असे दीड किलोमीटरपेक्षा अधिक डोंगर कोसळले. परिणामी मार्गच बंद झाल्याने आदिवासी पाडे संपर्कहीन झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने परतवाडा ते धारणी मार्गावरील सेमाडोहच्या खचलेल्या भूतखोरा पुलावरील काम करून आंतरराज्य मार्ग सुरळीत केला. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत रस्ते, त्यावर पडलेला मलबा हटविण्याच्या कामाव्यतिरिक्त प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याचे संतापजनक चित्र आहे.

बॉक्स

आरोग्य यंत्रणेला प्रथम प्राधान्याची गरज

सेमाडोह, माखला, चुनखडी या मार्गावर दीड किलोमीटरचा डोंगर कोसळला. लहान-मोठे पूल खचलेला रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. आठ दिवसांचा कालावधी होऊनही मलबा हटविण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. परंतु त्यासाठी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणा किंवा पदाधिकाऱ्यांनी तत्काळ तुटलेला संपर्क जोडून आरोग्य यंत्रणेला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे.

बॉक्स

सेमाडोह-रायपूर मार्गावरील पुलांना धोका

सेमाडोह, रायपूर मार्गावर खापरा नदी व कुवापाटी नदी मार्गावरील पूल धोकादायक ठरले आहे. नदीतून भव्य वृक्ष वादळी पावसात वाहून आल्याने पुलांच्या कठड्यावर अडकून पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील मुलांना धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी सहा मीटर रुंदीचा मार्ग तीन मीटर रुंद झाल्याने खचलेल्या रस्त्यावरून जीवघेणी कसरत करीत वाहन काढावी लागत असल्याचे रायपूरचे उपसरपंच सानू धांडे यांनी सांगितले.

कोट

सेमाडोह ते रायपूर मार्गावरील आठ किलोमीटरचा रस्ता नादुरुस्त झाला आहे. गुलाम कठड्याला वृक्ष अडकल्याने वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सर्वेक्षणासोबतच काम करणे गरजेचे आहे.

- सानू भुऱ्या धांडे,

उपसरपंच, रायपूर