शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वडगावची वाट बिकटच, कामाला सुरुवात केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST

सेमाडोह ते रायपूर मार्गावरील पूल वाहून जाण्याची भीती (फोटो कॅप्शन : सेमाडोह रायपूर मार्गावरील कुवापाटी खापरा नदीपात्रात वाहून आलेले ...

सेमाडोह ते रायपूर मार्गावरील पूल वाहून जाण्याची भीती

(फोटो कॅप्शन : सेमाडोह रायपूर मार्गावरील कुवापाटी खापरा नदीपात्रात वाहून आलेले वृक्ष आणि अनेक ठिकाणी अर्धवट राहिलेला रस्ता)

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे- परतवाडा : २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीचा तडाखा मेळघाटातील अतिदुर्गम भागाला सर्वाधिक बसला. सेमाडोह येथून जाणारे सर्वच मार्ग क्षतिग्रस्त झाले आहे. ग्रामीण भागात आदिवासी पाड्यांना जोडणारे मार्ग बंद असल्याचे प्रशासनाचे सर्वेक्षण सुरू असून, प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरुवात होईल, हे मात्र लालफितीत अडकले आहे.

ढगफुटीमुळे सेमाडोह येथे तीनशे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परिसरातून वाहणाऱ्या सिपना, खुर्शी, खंडू, या प्रमुख नद्यांसह नाल्यांना महापूर आला. काही ठिकाणी अर्धा किलोमीटरपर्यंत असे दीड किलोमीटरपेक्षा अधिक डोंगर कोसळले. परिणामी मार्गच बंद झाल्याने आदिवासी पाडे संपर्कहीन झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने परतवाडा ते धारणी मार्गावरील सेमाडोहच्या खचलेल्या भूतखोरा पुलावरील काम करून आंतरराज्य मार्ग सुरळीत केला. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत रस्ते, त्यावर पडलेला मलबा हटविण्याच्या कामाव्यतिरिक्त प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याचे संतापजनक चित्र आहे.

बॉक्स

आरोग्य यंत्रणेला प्रथम प्राधान्याची गरज

सेमाडोह, माखला, चुनखडी या मार्गावर दीड किलोमीटरचा डोंगर कोसळला. लहान-मोठे पूल खचलेला रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. आठ दिवसांचा कालावधी होऊनही मलबा हटविण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. परंतु त्यासाठी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणा किंवा पदाधिकाऱ्यांनी तत्काळ तुटलेला संपर्क जोडून आरोग्य यंत्रणेला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे.

बॉक्स

सेमाडोह-रायपूर मार्गावरील पुलांना धोका

सेमाडोह, रायपूर मार्गावर खापरा नदी व कुवापाटी नदी मार्गावरील पूल धोकादायक ठरले आहे. नदीतून भव्य वृक्ष वादळी पावसात वाहून आल्याने पुलांच्या कठड्यावर अडकून पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील मुलांना धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी सहा मीटर रुंदीचा मार्ग तीन मीटर रुंद झाल्याने खचलेल्या रस्त्यावरून जीवघेणी कसरत करीत वाहन काढावी लागत असल्याचे रायपूरचे उपसरपंच सानू धांडे यांनी सांगितले.

कोट

सेमाडोह ते रायपूर मार्गावरील आठ किलोमीटरचा रस्ता नादुरुस्त झाला आहे. गुलाम कठड्याला वृक्ष अडकल्याने वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सर्वेक्षणासोबतच काम करणे गरजेचे आहे.

- सानू भुऱ्या धांडे,

उपसरपंच, रायपूर