शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला ‘युडी’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:46 IST

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला नगरविकास विभागाकडून मिळणाऱ्या प्रशासकीय मान्यतेची आस लागली आहे. मजीप्राकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर नगरविकासच्या निर्णयाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देमजीप्राकडून तांत्रिक मान्यता : बहुप्रतीक्षित प्रकल्पांच्या कार्यान्वयनाने ‘कचरा’प्रश्न निकाली निघणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला नगरविकास विभागाकडून मिळणाऱ्या प्रशासकीय मान्यतेची आस लागली आहे. मजीप्राकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर नगरविकासच्या निर्णयाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाल्याने महापालिका प्रशासनाने त्यासाठी पाठपुरावा चालविला असून, या आठवड्यात नगरविकास विभागही महापालिकेच्या बहुप्रतीक्षित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवी झेंडी देण्याचे संकेत आहेत.महापालिकेच्या आमसभेने मान्यतेची मोहोर उमटविल्यानंतर सुकळीसह तीन ठिकाणच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला डीपीआर नगरविकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. ३८.३७ कोटी रूपये किंमतीचे सविस्तर अंदाजपत्रक व आराखडा तांत्रिक मान्यतेसाठी मजीप्राकडे १५ फेब्रुवारीला पाठविण्यात आला. स्वच्छ महाराष्टÑ अभियान (नागरी)चे राज्य अभियान संचालकाकडून मिळालेल्या आराखड्यास मजीप्राने २५ मे रोजी तांत्रिक मान्यता दिली. तत्पूर्वी निरीनेही प्रकल्प ‘ओके’ ठरविल्याने कार्यान्वयनातील अडथळे दूर सारले गेले असून आता केवळ नगरविकास विभागाच्या प्रशासकीय मान्यतेची तेवढी औपचारिकता शिल्लक आहे. शहरात रोजकाठी निघणारा २०० टन कचरा व सुकळी कंपोस्ट डेपोत साचलेला ५ ते ६ लाख मेट्रीक टन कचºयावर प्रक्रिया करून शास्त्रोक्त विल्हेवाट लावणारा हा प्रकल्प महापालिकेसाठी ‘मैलाचा दगड’ ठरणार आहे. मजीप्राने महापालिकेच्या ३८.३७ कोटी रूपये किमतीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सविस्तर आराखड्यास तांत्रिक मान्यता दिल्याचे मुख्य अभियंता एस. एस. चारथळ यांनी कळविले आहे. तांत्रिक मान्यतेचे पत्र महापालिका प्रशासनाला मिळाले आहे.या अटींवर मिळाली मान्यताप्रकल्पाची निविदा काढण्यापूर्वी मंजूर कामाचे वर्किंग एस्टीमेट तयार करून सक्षम अधिकाºयांची मंजुरी घ्यावी, लॅन्डफिल एरिया हा लॅन्ड डेव्हलपमेंट अथारीटीने आयडेंटीफाय करून महापालिकेस हस्तांतरित केल्याची धारणा पक्की करावी, दरसुचीमध्ये समाविष्ट नसलेल्या बाबीकरिता कोटेशन मागवून दराची खात्री करण्याची अट मजीप्राने टाकली आहे.घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो स्वयंसंतुलित होण्यासाठी आवश्यक तो कर घरपट्टीमध्ये वाढविण्याची जबाबदारी मनपाची राहील. निविदा बोलावण्यापूर्वी प्रकल्पाकरिता आवश्यक जागा महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याची खात्री करावी, अशी सूचना मजीप्राने केली आहे.