शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:13 IST

परंपरेनुसार जिल्ह्यातील खरिपाची पेरणी साधारणत: २५ जूनपर्यंत आटोपते, मात्र मागील पाच वर्षांत मान्सूनचे आगमनच जून अखेरपर्यंत झालेले नाही.

ठळक मुद्देखरिपाची तयारी पेरणीला गरज १०० मिलीमीटर पावसाचीशिवारांमध्ये लगबगतुरळक पेरण्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परंपरेनुसार जिल्ह्यातील खरिपाची पेरणी साधारणत: २५ जूनपर्यंत आटोपते, मात्र मागील पाच वर्षांत मान्सूनचे आगमनच जून अखेरपर्यंत झालेले नाही. त्यामुळे सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांची लगबग सुरू आहे. सध्या सरंक्षित संरक्षणाची सुविधा असलेल्या पाच ते सात हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. किमान १०० मिमी पाऊस होईस्तोवर पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.यंदा सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ ने वर्तविला. मात्र, गत पाच वर्षांत भाकितांनीच वाट लावल्याने दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७० मिमी पाऊस पडला. मात्र, हा पाऊस पूर्वमान्सून असल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम मिळाल्याने शिवारात लगबग वाढली आहे. यंदाच्या खरिपात पेरणी साधण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.गतवर्षी जिल्ह्यात दुष्काळस्थिती राहिली. अपुºया पावसाने सोयाबीनची वाट लावली. बोंडअळीने कपाशी उद्धवस्त झाली. तुरीला हमीभाव नाही, नाफेडच्या केंद्रांवर तूर विकली तर दोन महिन्यापासून चुकारे नाहीत. अनुदान आता जाहीर झाले. बोंडअळी नुकसानीची भरपाई २० टक्केच मिळाली. शेतकरी अडचणीत असताना बँकांद्वारा कर्जवाटपही नसल्याने बी-बियाण्यांची खरेदी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत.जिल्ह्याची हवामान स्थितीमान्सूनची उत्तर सीमा अकोला, अमरावती गोंदिया अशीच आहे. पूर्व-पश्चिम शियर दोन उत्तरेकडे सरकत असल्यामुळे दोन दिवसांत मान्सून राज्याच्या उर्वरित भागात पोहचण्यासाठी स्थिती अनुकूल बनण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. २४ जूनपर्यंत विदर्भात हलका ते मध्यम, २६ जूनपर्यंत बहुतांशी ठिकाणी गडगडाटासह मुसळधार, तसेच २८ जूनपर्यंत बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.