शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कापूस खरेदी केंद्रांसाठी नोव्हेंबरची प्रतीक्षा

By admin | Updated: October 15, 2015 00:26 IST

पावसाने पाठ फिरविल्यामुळे यंदा शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असताना शासनाकडून कापसाला किती दर निश्चित केले जाईल,

वेचणीला सुरुवात : दिवाळीनंतर शासकीय खरेदी केंद्र उघडणारलोकमत विशेषजितेंद्र दखने अमरावतीपावसाने पाठ फिरविल्यामुळे यंदा शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असताना शासनाकडून कापसाला किती दर निश्चित केले जाईल, याबाबत शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यात सध्या कापुस वेचणीला सुरुवात झाली आहे. मात्र पणन व सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरु होण्यासाठी शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.सोयाबीननंतर कापूस उत्पादनात अमरावती जिल्हा अग्रेसर आहे. परंतु पावसामुळे पाठ फिरविल्यामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कापसाचा खरेदी दर किती राहिल, याबाबत शासनाने कोणतीही घोषणा केली नसली तरी सध्या केंद्राच्या हमी भावाने खासगी कापूस केंद्रावर ४१५० रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी होत आहे.येथे होती कापुस खरेदी केंद्रजिल्ह्यात कापुस खरेदी साठी पणन विभागाने अमरावती, अचलपूर, वरूड, तिवसा, चांदुर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, आदी ठिकाणी तर सीसीआयचे कापुस खरेदी केंद्र धामणगाव रेल्वे, चांदुररेल्वे, मोर्शी आणि रोशनखेडा या चार ठिकाणी कापुस खरेदी केंद्र सुरू केली होती.गतवर्षी ९ हजार गाठीचे उत्पादन पणन महासंघाव्दारा सात कापुस खरेदी केंद्रावर सुमारे ४४ हजार २८३ क्विंटलची कापूस खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी ९ हजार ३६९ कापुस गाठीचे उत्पादन पणन महामंडळाने केले आहे. यावेळी कापुसाला प्रतवारीनुसार ३९५० ते ४०५० रूपयाने भाव देण्यात आला.उत्पादनात होणार घटमागील वर्षी जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ६६५ हेक्टरवर कापसाचे पेरणी क्षेत्र होते. हंगामाच्या समाप्तीनंतर कापूस उत्पादन पाहिजे तशी भर पडली नसल्याचे चित्र दिसून आले. यंदाच्या हंगामात १ लाख ८६ हजार ६६५ हेक्टरवर कापसाचे पेरणीक्षेत्र आहे. तसेच दुष्काळ, कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पणन व सीसीआयने आतापर्यंत जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीसाठी खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. परंतु ते झाले नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठपुरावा करु. -सुनील वऱ्हाडे, सभापती, बाजार समितीकापूस वेचणीला सुरुवात झाली. काही शेतकऱ्यांच्या घरात कापूस जमा झाला आहे. मात्र शासनाकडून पणनला कापूस खरेदीसंबंधीचे आदेश नाहीत. संचालक मंडळाची ९ नोव्हेबर रोजी बैठक होत आहे. त्यामध्ये यावर निर्णय होण्याची अपेक्षा आहे.-छाया दंडाळे, संचालक पणन महासंघ.उत्पादनात घट होणार असल्याने कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कापसाला ४ हजार ५० रुपये हमी भाव केंद्र सरकार ने दिला होता. दरवर्षी उत्पादन खर्च वाढत असल्याने शासनाने किमान ६ हजार रुपये हमीभाव कापसाला जाहीर करावा.-अमीत अढाऊ, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनासध्या जिल्ह्यात कपाशी पिकांचे पिक चांगले आहे. परतीचा पाऊ सही पोषक झाला आहे. मात्र रस शोषण करण्याची किडीचा प्रादुर्भाव पिकावर झाला आहे. सध्या जरी उत्पन्न बऱ्यापैकी होण्याची शक्यता असली, तरी वातावरणातील बदल लक्षात घेता उत्पन्नाबाबत निश्चित सांगता येणार नाही.-दतात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.