शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

कापूस खरेदी केंद्रांसाठी नोव्हेंबरची प्रतीक्षा

By admin | Updated: October 15, 2015 00:26 IST

पावसाने पाठ फिरविल्यामुळे यंदा शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असताना शासनाकडून कापसाला किती दर निश्चित केले जाईल,

वेचणीला सुरुवात : दिवाळीनंतर शासकीय खरेदी केंद्र उघडणारलोकमत विशेषजितेंद्र दखने अमरावतीपावसाने पाठ फिरविल्यामुळे यंदा शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असताना शासनाकडून कापसाला किती दर निश्चित केले जाईल, याबाबत शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यात सध्या कापुस वेचणीला सुरुवात झाली आहे. मात्र पणन व सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरु होण्यासाठी शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.सोयाबीननंतर कापूस उत्पादनात अमरावती जिल्हा अग्रेसर आहे. परंतु पावसामुळे पाठ फिरविल्यामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कापसाचा खरेदी दर किती राहिल, याबाबत शासनाने कोणतीही घोषणा केली नसली तरी सध्या केंद्राच्या हमी भावाने खासगी कापूस केंद्रावर ४१५० रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी होत आहे.येथे होती कापुस खरेदी केंद्रजिल्ह्यात कापुस खरेदी साठी पणन विभागाने अमरावती, अचलपूर, वरूड, तिवसा, चांदुर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, आदी ठिकाणी तर सीसीआयचे कापुस खरेदी केंद्र धामणगाव रेल्वे, चांदुररेल्वे, मोर्शी आणि रोशनखेडा या चार ठिकाणी कापुस खरेदी केंद्र सुरू केली होती.गतवर्षी ९ हजार गाठीचे उत्पादन पणन महासंघाव्दारा सात कापुस खरेदी केंद्रावर सुमारे ४४ हजार २८३ क्विंटलची कापूस खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी ९ हजार ३६९ कापुस गाठीचे उत्पादन पणन महामंडळाने केले आहे. यावेळी कापुसाला प्रतवारीनुसार ३९५० ते ४०५० रूपयाने भाव देण्यात आला.उत्पादनात होणार घटमागील वर्षी जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ६६५ हेक्टरवर कापसाचे पेरणी क्षेत्र होते. हंगामाच्या समाप्तीनंतर कापूस उत्पादन पाहिजे तशी भर पडली नसल्याचे चित्र दिसून आले. यंदाच्या हंगामात १ लाख ८६ हजार ६६५ हेक्टरवर कापसाचे पेरणीक्षेत्र आहे. तसेच दुष्काळ, कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पणन व सीसीआयने आतापर्यंत जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीसाठी खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. परंतु ते झाले नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठपुरावा करु. -सुनील वऱ्हाडे, सभापती, बाजार समितीकापूस वेचणीला सुरुवात झाली. काही शेतकऱ्यांच्या घरात कापूस जमा झाला आहे. मात्र शासनाकडून पणनला कापूस खरेदीसंबंधीचे आदेश नाहीत. संचालक मंडळाची ९ नोव्हेबर रोजी बैठक होत आहे. त्यामध्ये यावर निर्णय होण्याची अपेक्षा आहे.-छाया दंडाळे, संचालक पणन महासंघ.उत्पादनात घट होणार असल्याने कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कापसाला ४ हजार ५० रुपये हमी भाव केंद्र सरकार ने दिला होता. दरवर्षी उत्पादन खर्च वाढत असल्याने शासनाने किमान ६ हजार रुपये हमीभाव कापसाला जाहीर करावा.-अमीत अढाऊ, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनासध्या जिल्ह्यात कपाशी पिकांचे पिक चांगले आहे. परतीचा पाऊ सही पोषक झाला आहे. मात्र रस शोषण करण्याची किडीचा प्रादुर्भाव पिकावर झाला आहे. सध्या जरी उत्पन्न बऱ्यापैकी होण्याची शक्यता असली, तरी वातावरणातील बदल लक्षात घेता उत्पन्नाबाबत निश्चित सांगता येणार नाही.-दतात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.