शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

पाचशेच्या नव्या नोटेची प्रतीक्षाच

By admin | Updated: November 12, 2016 00:09 IST

दुसऱ्या दिवशीही पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बँकांना प्राप्त न झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच गोेची झाली.

बँका हाऊसफुल्ल : एटीएमवर उसळली गर्दी अमरावती : दुसऱ्या दिवशीही पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बँकांना प्राप्त न झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच गोेची झाली. मात्र, दोन हजाराच्या नवीन करन्सीचे वाटप विविध बँकानी केले. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांसह को-आॅपरेटिव्ह बँकांमध्येही शुक्रवारी गर्दी उसळली. हजार-पाचशेच्या नोटा मंगळवारी मध्यरात्रीपासून चलनातून बाद झाल्याने सर्व आर्थिक व्यवहार काही काळापुरते ठप्प झाले आहे. एका दिवसांत एटीएममधून दोन हजार रूपयेच काढता येत असल्यामुळे व बँकेतून एका व्यक्तीला केवळ चार हजारांच्याच नोटा बदलून मिळत असल्याने मोठ्या व्यापाऱ्यांचीही हवा निघाली आहे. अनेक किरकोळ व्यापारी जुन्या पाचशे रुपयांचा नोटा स्वीकारायला नकार देत असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शंभर, पन्नासच्या नोटांना दोन दिवसांत अचानक महत्त्व प्राप्त झाले असून या नोटांचे चलन वाढले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यतील सर्व बँकांमध्ये जुन्या पाचशे व हजारांच्या नोेटा परत करुन नवीन चलनाची किंवा शंभर, पन्नास व दहा रूपये मिळविण्यासाठी बँकेत नागरिकांची रांग पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी तर नागरिक व बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वादविवाद झालेत. शुक्रवारी शहरातील अनेक एटीएम मशीन बंद होत्या. तर अनेक एटीएम मशीनमध्ये दोन हजारांची नवीन करन्सी न पोहोचल्याने शंभरच्या नोटांवरच काम भागवावे लागले. वाढती गर्दी पाहता श्याम टॉकीज चौकातील स्टेट बँकेची मुख्य शाखा निर्धारित वेळेपेक्षा १५मिनिट आधी बंद करण्यात आली. पोस्टाला मिळाला नाही २० लाखांचा विड्रॉलचलनातून अचानक पाचशे व हजारांच्या नोटा बाद झाल्याने याचा फटका सर्व शासकीय कार्यालयांच्या आर्थिक व्यवहारालाही बसला आहे. गुरुवारी एसबीआयच्या मुख्य शाखेकडे मुख्य डाकघराने २० लक्ष रुपयांचा विड्रॉल टाकला होेता. पण, गुरुवारी दिवसभर हा विड्रॉल मिळाला नाही. शुक्रवारी बँकेने हा विड्रॉल स्वीकारला. पण चार वाजेपर्यंत पोस्टाला पैसे प्राप्त न झाल्याने जून्या चलनावरच कारभार चालवावा लागला. अशीच परिस्थिीती जिल्हाभरातील पोस्टाच्या विविध शाखांची होती. विड्रॉलचे पैसे मोजण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. अ‍ॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांची उर्मट वागणूकस्थानिक राठीनगर येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडून अपमानस्पद व उर्मट वागणूक मिळाली. दुपारी ३.३० वाजता दरम्यान गर्दी कमी असतांनाही पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहक गेले असताना बॅकेचे खातेदार नसल्याने तुम्हाला नोटा मिळणार नाहीत, असे म्हणून ग्राहकांशी वाद घातला. शाखा व्यवस्थापकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तंबी ग्राहकांनी दिल्यानंतर ग्राहकांना नोटा बदलून देण्यात आल्यात. शुक्रवारीही नवीन नोट पोहोचलीच नाहीअमरावती : पण बँकेत आतमध्ये उपस्थित ग्राहकांना रात्री उशिरापर्यंत नोटा बदलून दिल्या. दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पाचशेची नवीन नोट दाखल न झाल्याने नागरिकांची निराशाच झाली. एसबीआयच्या मुख्य शाखेत दुसऱ्या दिवशीही चार वाजेपर्यंत नवीन पाचशे रूपयांच्या नोटा आरबीआयकडून प्राप्त न झाल्याचे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगतिले. काही लोकांना दोेन हजार रुपयांच्या नोटा मिळताच त्यांनी सेल्फीचा आनंदही लुटला.