शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

पाचशेच्या नव्या नोटेची प्रतीक्षाच

By admin | Updated: November 12, 2016 00:09 IST

दुसऱ्या दिवशीही पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बँकांना प्राप्त न झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच गोेची झाली.

बँका हाऊसफुल्ल : एटीएमवर उसळली गर्दी अमरावती : दुसऱ्या दिवशीही पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बँकांना प्राप्त न झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच गोेची झाली. मात्र, दोन हजाराच्या नवीन करन्सीचे वाटप विविध बँकानी केले. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांसह को-आॅपरेटिव्ह बँकांमध्येही शुक्रवारी गर्दी उसळली. हजार-पाचशेच्या नोटा मंगळवारी मध्यरात्रीपासून चलनातून बाद झाल्याने सर्व आर्थिक व्यवहार काही काळापुरते ठप्प झाले आहे. एका दिवसांत एटीएममधून दोन हजार रूपयेच काढता येत असल्यामुळे व बँकेतून एका व्यक्तीला केवळ चार हजारांच्याच नोटा बदलून मिळत असल्याने मोठ्या व्यापाऱ्यांचीही हवा निघाली आहे. अनेक किरकोळ व्यापारी जुन्या पाचशे रुपयांचा नोटा स्वीकारायला नकार देत असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शंभर, पन्नासच्या नोटांना दोन दिवसांत अचानक महत्त्व प्राप्त झाले असून या नोटांचे चलन वाढले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यतील सर्व बँकांमध्ये जुन्या पाचशे व हजारांच्या नोेटा परत करुन नवीन चलनाची किंवा शंभर, पन्नास व दहा रूपये मिळविण्यासाठी बँकेत नागरिकांची रांग पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी तर नागरिक व बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वादविवाद झालेत. शुक्रवारी शहरातील अनेक एटीएम मशीन बंद होत्या. तर अनेक एटीएम मशीनमध्ये दोन हजारांची नवीन करन्सी न पोहोचल्याने शंभरच्या नोटांवरच काम भागवावे लागले. वाढती गर्दी पाहता श्याम टॉकीज चौकातील स्टेट बँकेची मुख्य शाखा निर्धारित वेळेपेक्षा १५मिनिट आधी बंद करण्यात आली. पोस्टाला मिळाला नाही २० लाखांचा विड्रॉलचलनातून अचानक पाचशे व हजारांच्या नोटा बाद झाल्याने याचा फटका सर्व शासकीय कार्यालयांच्या आर्थिक व्यवहारालाही बसला आहे. गुरुवारी एसबीआयच्या मुख्य शाखेकडे मुख्य डाकघराने २० लक्ष रुपयांचा विड्रॉल टाकला होेता. पण, गुरुवारी दिवसभर हा विड्रॉल मिळाला नाही. शुक्रवारी बँकेने हा विड्रॉल स्वीकारला. पण चार वाजेपर्यंत पोस्टाला पैसे प्राप्त न झाल्याने जून्या चलनावरच कारभार चालवावा लागला. अशीच परिस्थिीती जिल्हाभरातील पोस्टाच्या विविध शाखांची होती. विड्रॉलचे पैसे मोजण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. अ‍ॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांची उर्मट वागणूकस्थानिक राठीनगर येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडून अपमानस्पद व उर्मट वागणूक मिळाली. दुपारी ३.३० वाजता दरम्यान गर्दी कमी असतांनाही पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहक गेले असताना बॅकेचे खातेदार नसल्याने तुम्हाला नोटा मिळणार नाहीत, असे म्हणून ग्राहकांशी वाद घातला. शाखा व्यवस्थापकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तंबी ग्राहकांनी दिल्यानंतर ग्राहकांना नोटा बदलून देण्यात आल्यात. शुक्रवारीही नवीन नोट पोहोचलीच नाहीअमरावती : पण बँकेत आतमध्ये उपस्थित ग्राहकांना रात्री उशिरापर्यंत नोटा बदलून दिल्या. दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पाचशेची नवीन नोट दाखल न झाल्याने नागरिकांची निराशाच झाली. एसबीआयच्या मुख्य शाखेत दुसऱ्या दिवशीही चार वाजेपर्यंत नवीन पाचशे रूपयांच्या नोटा आरबीआयकडून प्राप्त न झाल्याचे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगतिले. काही लोकांना दोेन हजार रुपयांच्या नोटा मिळताच त्यांनी सेल्फीचा आनंदही लुटला.