शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

पशुगणनेला मुहूर्ताची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:56 IST

केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देटॅब नसल्याचा फटका : मुदतवाढ मिळाली, पुढे काय ?

आॅनलाईन लोकमतअमरावती : केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच आॅक्टोबरमध्ये पशुगणना पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्यासाठी टॅब उपलब्ध न आल्याने ती रखडली. केंद्राने पशुगणनेला मुदतवाढ दिली असली तरी पुढील तारीख जाहीर केलेली नाही.राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. २० वी पशुगणना १७ जुलै २०१७ पासून करण्याचे आदेश दिले. त्यासाठी यावर्षी प्रथमच केंद्र शासनामार्फत योजनेंतर्गत ही गणना टॅबद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये प्रगणक व पर्यवेक्षक जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणार असून उर्वरित नियंत्रक राज्य पशुसंवर्धन विभागाचे राहतील. पशुगणनेची माहिती बिनचूक व तातडीने प्राप्त करणे पशुसंवर्धन विभागाला शक्य होणार होते. या टॅबद्वारे पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती आणि कृती कार्यक्रमांचा अंतर्भावही करण्यात येणार होता. परंतु टॅब उपलब्ध नसल्याने पशुगणना रखडली आहे. केंद्र शासनाकडून टॅब उपलब्ध होणार होते. मात्र या निर्णयात बदल करून राज्यांनी टॅब खरेदी करावी, असे निर्देश देण्यात आले होते. पूर्वी पशुगणना एका प्रगणकावरुन केली जात होती. यात पशुगणनेसाठी अधिक कालावधी लागत असे. १९ आॅक्टोबरपर्यंत पशुगणना करण्याचे आदेश होते. मात्र, टॅब उपलब्ध न झाल्याने गणनेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. परंतु नोव्हेंबर महिना संपत आला तरी पुढील तारीख जाहीर न झाल्याने २० वी पशुगणना नक्की कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.पशुगणनेसंदर्भात वरिष्ठ स्तरावर कारवाई सुरू आहे. याबाबत शासनाकडून अद्याप सूचना आल्या नाहीत. वरिष्ठांकडून पशुगणनेबाबत सूचना मिळताच ही प्रक्रिया नियमानुसार राबविली जाईल.- विजय भोजने,उपायुक्त पशुसंवर्धन विभाग