शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वॅगन कारखाना निविदेत अडकला

By admin | Updated: June 27, 2015 00:20 IST

बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना निविदा प्रक्रियेत अडकला आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : प्रकल्पग्रस्त्यांच्या जमिनी ताब्यातअमरावती : बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना निविदा प्रक्रियेत अडकला आहे. गत आठ महिन्यांपासून निविदा प्रक्रिया राबविली जात असल्याने ती केंव्हा पूर्ण होणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण यापूर्वीच करण्यात आले आहे.माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेला रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना तांत्रीक अडचणीतून बाहेर पडलेला नाही. मोठा गाजावाजा करुन या प्रकल्पाची प्रसिद्धी घेणारे नेते हल्ली कोठे गायब झालेत, हे कळेनासे झाले आहे. गत नऊ महिन्यांपासून या प्रकल्पाला निविदा प्रक्रियेतून बाहेर काढण्याचे सौजन्य दाखविले जात नसल्याने बेरोजगारांमध्ये संतापाची लाट पसरल्याचे दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची पायाभरणी करणार अशी माहिती पुढे आली होती. परंतु जून महिना संपायला आला असला तरी निविदा प्रक्रियाच आटोपली नसल्याची वास्तविकता आहे. रेल्वे विभागाने हा कारखाना निर्माण करण्याची जबाबदारी पटना येथील रेल्वेच्या बांधकाम विभागाकडे सोपविली आहे. या कारखान्याच्या निर्मितीसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने खास करुन उपअभियंता मोहन नाडगे यांची नियुक्त ी केली आहे. हा कारखाना बडनेरा येथील पाचबंगला परिसरात साकारला जाणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या कारखान्याचे भूमिपूजन होईल, असे संकेत रेल्वे विभागाने दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी पेरणीपासून वंचित राहावे लागले अशी ओरड प्रकल्पग्रस्तांची आहे. दोन वर्षांपूर्वीच या कारखान्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असताना निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी एक ते दीड वर्षे लागत असतील तर हा कारखाना निर्माण करायला १० वर्ष लागतील काय? असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकरी तैयब अली सैयद कादर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)६४ शेतकऱ्यांची ७८ हेक्टर जमीन ताब्यातप्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यासाठी ५४ शेतकऱ्यांची ७८ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. १५ कोटी ३२ लाख रुपये प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात आला आहे. या प्रकल्पात २३ घरे तर १०९ लोकसंख्या बाधीत होणार आहे.वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या भूमिपूजनाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावे, यासाठी त्यांना पत्र देण्यात आले आहे. पटना येथील रेल्वेच्या बांधकाम विभागाकडे या कारखान्याची निर्मिती, निविदा प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी सोपविली आहे. किमान तीन निविदा येणे अपेक्षित आहे. काही तांत्रीक अडचणी आल्या असतील तर त्या त्वरेने सोडविल्या जातील.- आनंदराव अडसूळ, खासदार.रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे या निविदा प्रक्रियेला उशीर होत आहे. परंतु पुढील महिन्यात ती पूर्ण होईल, असे संकेत आहेत. पटना रेल्वे बांधकाम विभागाकडे या कारखान्याच्या निर्मितीची जबाबदारी आहे.- मोहन नाडगे, उपअभियंता, रेल्वे.