शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

महापालिकेत वेतनाची बोंबाबोंब

By admin | Updated: May 29, 2014 23:34 IST

महापालिकेचा कारभार ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपया’ या म्हणीनुसार चालत असल्याने मागील तीन महिन्यांचे कर्मचार्‍यांना वेतन मिळाले नाही. उत्पन्न घसरल्याने कर्मचार्‍यांच्या वेतनाची बोंबाबोंब सुरू झाली आहे.

कर्मचारी तीन महिन्यांपासून प्रतीक्षेत : शुक्रवारी लेखणीबंद आंदोलनअमरावती : महापालिकेचा कारभार ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपया’ या म्हणीनुसार चालत असल्याने मागील तीन महिन्यांचे कर्मचार्‍यांना वेतन मिळाले नाही. उत्पन्न घसरल्याने कर्मचार्‍यांच्या वेतनाची बोंबाबोंब सुरू झाली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ भूमिकेमुळे कर्मचार्‍यांना वेतन मिळत नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला असून ३0 मे रोजी लेखणीबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. एलबीटी, बाजार परवाना, मालमत्ता कर आदी विभागातून येणारे उत्पन्न अचानक घसरल्याने महापालिकेचा आर्थिक डोलारा कसा सांभाळावा, हा प्रश्न अधिकार्‍यांपुढे निर्माण झाला आहे. अशातच एलबीटी भरण्याचे व्यावसायिकांनी टाळायला सुरुवात केल्याने एप्रिल महिन्याच्या एलबीटी उत्पन्नात एक कोटी रूपयाची तफावत निर्माण झाली आहे. प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असलेल्या एलबीटीचे उत्पन्न माघारत असल्याने प्रशासकीय अधिकारी हैराण झाले आहे. मात्र खर्च काही केल्याविना कमी होत नाही, असे चित्र आहे. महापालिकेला दरमहा १0 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र उत्पन्न सात ते साडेसात कोटींवर थांबले आहेत. दरमहा तीन कोटी रूपयांची पोकळी कशी भरून काढावी, या बाबीने प्रशासन चिंतातूर झाले आहे. पुरवठादार, कंत्राटदार, प्रशासकीय खर्च, कर्मचार्‍यांच्या वेतनाची जुळवाजुळव कशी करायची याचे नियोजन करीत असताना जनतेच्या मुलभूत सोयीसुविधांचा पुरवठा करतानाही कसरत करावी लागत आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे वेतन थकित राहिल्याने कर्मचारी संघटनांनी संपाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. यात पहिला टप्पा म्हणून शुक्रवारी लेखनी बंद आंदोलन केले जाणार आहे. प्रशासनाने त्वरीत वेतनाची व्यवस्था केली नाही तर बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा महापालिका कर्मचारी संघटनेने दिला आहे. पुरवठादार व कंत्राटदाराचे १0 कोटी, साफसफाई कंत्राटदार ९ कोटी वीज देयकांचे एक कोटी रूपये थकित आहेत. एलबीटी उत्पन्न घसरल्याचा पहिला फटका कर्मचार्‍यांच्या वेतनावर बसला आहे. तर दुसरीकडे थकीत रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदार, पुरवठादार लेखाविभागाच्या पायर्‍या झिजवतानाचे दिसून येते. तिजोरीत ठणठणाट अशी स्थिती असल्याने वेतनासाठी रक्कम कोठून आणावी, हा प्रश्न अधिकार्‍यांसमोर निर्माण झाला आहे. किमान मार्च, एप्रिलचे वेतन अदा करावे, ही न्यायीक मागणी कर्मचारी संघटनांनी उचलून धरल्याने प्रशासनविरुद्ध कर्मचारी असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.