शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वडाळीत नवीन बायपासवरून चार मुले हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:18 IST

अमरावती : येथील वडाळी परिसरात सुपर एक्स्प्रेस हायवेच्या नवीन बायपासवरून चार चिमुकली मुले हरविली. मात्र, ती अद्यापही गवसलेली नाहीत. ...

अमरावती : येथील वडाळी परिसरात सुपर एक्स्प्रेस हायवेच्या नवीन बायपासवरून चार चिमुकली मुले हरविली. मात्र, ती अद्यापही गवसलेली नाहीत. ती घटना २३ ऑगस्ट रोजी घडली होती. याबाबत जयसिंह दौलतराव चव्हाण (३३, नवीन बायपास, वडाळी) यांच्याकडून ३० ऑगस्ट रोजी फ्रेजरपुरा पोलिसांना प्राप्त झाली. याबाबत अज्ञातांविरुद्ध कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मुलांबाबत कुठलीही माहिती मिळताच माहीतगारांनी तात्काळ फ्रेजरपुरा पोलीस किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जयसिंह चव्हाण यांची उज्जेर जयसिंह चव्हाण (११) व जयश्री जयसिंह चव्हाण (८) ही दोन मुले तसेच जयसिंह यांची बहीण शशिकला नारायण सूर्यवंशी यांची पवन नारायण सूर्यवंशी (७) व भूरी नारायण सूर्यवंशी (९) ही दोन मुले असे चौघे परिसरात आजूबाजूला खेळत होते. काही वेळाने फिर्यादीची बहीण मुलांना बोलावून आणण्यासाठी गेली असता तिला चारही मुले दिसली नाहीत. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी सर्व ठिकाणी शोध घेतला असता ही मुले आढळली नाहीत. त्यामुळे जयसिंग चव्हाण यांनी फ्रेजरपुरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. चारही बालक मराठी, हिंदी व लोहारी बोली बोलतात.

///////////

येथे साधा संपर्क

ती चारही बालके आढळल्यास फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त व ठाणेदार राहुल आठवले, गुन्हे पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी केले आहे.