शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

तीन पंचायत समितींसाठी शांततेत मतदान

By admin | Updated: November 23, 2014 23:10 IST

जिल्ह्यात तीन पंचायत समितींसाठी रविवारी शांततेत निवडणूक पार पडली. तिवसा, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे पंचायत समितींमधील २० गणांंसाठी रविवार मतदान घेण्यात आले.

तिवसा/धामणगाव/चांदूररेल्वे : जिल्ह्यात तीन पंचायत समितींसाठी रविवारी शांततेत निवडणूक पार पडली. तिवसा, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे पंचायत समितींमधील २० गणांंसाठी रविवार मतदान घेण्यात आले. एकूण ११३ उमेदवार निवडणूक रिंंगणात होते. मतमोजणी सोमवार २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. रविवारी सकाळी ७़३० वाजता ११४ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरूवात झाली. देवगाव, वरूड बगाजी, शेंदुरजना खुर्द या सर्कलमध्ये ९़३० वाजेपर्यंत केवळ तीन टक्के मतदान झाले होते़ रविवार हा आठवड्यातील बाजाराचा दिवस असल्यामुळे दुपारी साडेतीन वाजतानंतर मतदानाला वेग आला़ दुपारी साडेतीनवाजता पर्यंत जुना धामणगाव सर्कलमधील १२ हजार ८९० मतदारांपैकी ५ हजार ७६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या दरम्यान ४४़७२ टक्के मतदान झाले होते़ दुपारी ४ वाजता या भागातील १७ मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली़ अंजनसिंगी सर्कलमध्ये ११ हजार ६४७ मतदारांपैकी ६ हजार ७४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बाजाराच्या दिवसामुळे सकाळी मजूर शेतात गेले असल्याने पाच वाजता १५ मतदान केंद्रांवर मतदारांची रीघ दिसून आली़ दुपारी साडेतीन वाजतापर्यंत ५७़९५ टक्के मतदान झाले.मंगरूळ दस्तगीर या गणात ५ हजार ७३४ मतदारांनी तर वरूड बगाजी सर्कल मध्ये ५ हजार ९२१, देवगाव- ४ हजार ९३७, चिंचोली-६ हजार ४५, तळेगाव दशासर ५ हजार १३८, शेदुरजना खुर्द ५ हजार ८२८ मतदारांनी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला होता़ सायंकाळी साडेपाचपर्यंत आठ सर्कलमधील सरासरी ६० टक्के मतदान झाले़तिवसा पंचायत समितीच्या सहा गणांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. सर्वाधिक उमेदवार तिवसा गणात होते. तिवसा पंचायत समितीत तिवसा, वरखेड, मारडा, कुऱ्हा, मोझरी, व वऱ्हा या सहा गणांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यात १०३ मतदान केंद्र होते. निवडणुकीत १०३ मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी २४ नोव्हेंबरला येथील अप्पर वर्धा मनोरंजन सभागृहात सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. चांदूररेल्वे पंचायत समितीच्या सहा गणांसाठी ३७ उमेदवार रिंंगणात होते. त्यामध्ये आमला गणात ६२ टक्के, सातेफळ गणात ६१.३६, घुईखेड गणात ६४, राजुरा गणात ५६.८२, पळसखेड गणात ५३.६१ तर मालखेड गणात ६१.२५ टक्के मतदान झाले. तालुक्याची मतदानाची सरासरी टक्केवारी ५९.८४ टक्के आहे.तिवसा येथे ६०.५४ टक्के मतदान झाले. राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी कुऱ्हा येथील मतदान केंद्रांना भेटी दिल्या आहेत. या निवडणुकीत मतदार चिठ्ठी वाटप न झाल्याने टक्केवारी कमी राहिली.