शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील आदिवासींचा स्वेच्छा पुनर्वसन प्रक्रियेत सहभाग

By admin | Updated: May 18, 2016 00:10 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावे स्वेच्छेने पुनर्वसनासाठी पुढे येत असल्याने जंगलातील वन्यप्राण्यांना आता मोकळा श्वास घेणे सोईचे होणार आहे.

वन्यपशु घेणार मोकळा श्वास : अंबाबरवामध्ये वाहताहेत बदलाचे वारे चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावे स्वेच्छेने पुनर्वसनासाठी पुढे येत असल्याने जंगलातील वन्यप्राण्यांना आता मोकळा श्वास घेणे सोईचे होणार आहे. त्यांना जंगलात मुक्त संचार करता येणार आहे.अकोट वन्यजीव विभागांतर्गत अंबाबरवा अभयारण्य आहे. १७ एप्रिल १९९७ रोजी अंबाबरवा जंगल परिसराला अभयारण्याच्या दर्जा देण्यात आला होता. सन २००० मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तर २००६ अतिसरंक्षित गाभाक्षेत्रात समावेश करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका व अकोला जिल्ह्यातील काही भाग मिळून अंबाबरवा अभयारण्याचे क्षेत्र आहे. या जंगलात वाघ, बिबट, रानकुत्रा, तडस, अस्वल, कोल्हा, गवा, सांबर भेडकी, ससा, उदमांजर हे प्राणी आहेत. मोर, हरोळी, नाचन, स्वर्गीय नर्तक, टकाचोर, पिंगळा, रातवा यांचासह २०० चे वर पक्षी असून फुलपाखरे व इतर कीटकांसह येथील जैवविविधता समृध्द आहे.अंबाबरवा गावाने याच माध्यमातून एक नवा पायंडा पडण्याचा प्रयत्न केला. स्वेच्छा पुनर्वसन हा प्रयोग आता मेळघाटसारख्या भागात रुजला आहे. अंबाबरवाचे पुनर्वसन ३ नोव्हेंबर १०१२ च्या शासन निर्णयाच्या विकल्प १ नुसार होत आहे. १० मे २०१५ रोजी प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी अचनक भेट देऊन पुनर्वसनाची भूमिका स्पष्ट कली. २८ एप्रिल २०१६ ला अंबाबरवा गावात अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी बैठक घेतली. सम २००८ पासून पुनवर्सन रखडलेले असताना ही बैठक मोलाची ठरली. ३ मे २०१६ रोजी गावातील संपूर्ण २९८ लाभार्थ्यांना बँकेचे पासबुक देण्यात आले. आदिवासी समुदायातील लोकांना अंबाबरवा सारख्या दुर्गम गावातून अकोटला येणे गैरेसोयीचे होते. म्हणून पहिल्यांदाच गावातच थेट बँक आॅफ इंडियाची चमू पोहोचली. बँकेच्या चमूतील व्यवस्थापक कुमार व रोखपाल सांगळूदकर यांनी गावातील लोकांना थेट पैसेवाटप केले. प्रमाणपत्र व पासबुक वाटप पंचायत समिती सभापती पांडुरंग हागे, जिल्हा परिषद सदस्य, वासुदेव गावंडे, भाजप तालुका अध्यक्ष सुधीर दातीर, सदस्य नलिनी गावंडे, माजी सभापती घामोडे, उपाध्यक्ष हागे, सहाय्यक वनसरंक्षक विनोद डेहनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी काझी यांनी केले. ग्रामस्थांनी ऐच्छिक पुनवर्सन योजनंतर्गत लवकरच गाव सोडणार असल्याचे सांगितले आहे. आजवर कोहा, कुंड, बोरी, वैराट, चुर्णी, धारगड, बारुखेडा, अमोना, नागरतास, गुल्लरघाट, सोमठाणा (बु.), सोमठाणा (खु.), केलपाणी व चुनखडी एकूण १५ गावांचे पुनवर्सन झालेले आहे. अंबाबरवा अभयारण्यातील रोहिनखिडकी गाव सुध्दा आता ऐच्छिक पुनर्वसन प्रक्रियेत येण्यास इच्छूक आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना आता जंगलात मुक्त संचार करता येणार आहे.