शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

मेळघाटातील आदिवासींचा स्वेच्छा पुनर्वसन प्रक्रियेत सहभाग

By admin | Updated: May 18, 2016 00:10 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावे स्वेच्छेने पुनर्वसनासाठी पुढे येत असल्याने जंगलातील वन्यप्राण्यांना आता मोकळा श्वास घेणे सोईचे होणार आहे.

वन्यपशु घेणार मोकळा श्वास : अंबाबरवामध्ये वाहताहेत बदलाचे वारे चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावे स्वेच्छेने पुनर्वसनासाठी पुढे येत असल्याने जंगलातील वन्यप्राण्यांना आता मोकळा श्वास घेणे सोईचे होणार आहे. त्यांना जंगलात मुक्त संचार करता येणार आहे.अकोट वन्यजीव विभागांतर्गत अंबाबरवा अभयारण्य आहे. १७ एप्रिल १९९७ रोजी अंबाबरवा जंगल परिसराला अभयारण्याच्या दर्जा देण्यात आला होता. सन २००० मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तर २००६ अतिसरंक्षित गाभाक्षेत्रात समावेश करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका व अकोला जिल्ह्यातील काही भाग मिळून अंबाबरवा अभयारण्याचे क्षेत्र आहे. या जंगलात वाघ, बिबट, रानकुत्रा, तडस, अस्वल, कोल्हा, गवा, सांबर भेडकी, ससा, उदमांजर हे प्राणी आहेत. मोर, हरोळी, नाचन, स्वर्गीय नर्तक, टकाचोर, पिंगळा, रातवा यांचासह २०० चे वर पक्षी असून फुलपाखरे व इतर कीटकांसह येथील जैवविविधता समृध्द आहे.अंबाबरवा गावाने याच माध्यमातून एक नवा पायंडा पडण्याचा प्रयत्न केला. स्वेच्छा पुनर्वसन हा प्रयोग आता मेळघाटसारख्या भागात रुजला आहे. अंबाबरवाचे पुनर्वसन ३ नोव्हेंबर १०१२ च्या शासन निर्णयाच्या विकल्प १ नुसार होत आहे. १० मे २०१५ रोजी प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी अचनक भेट देऊन पुनर्वसनाची भूमिका स्पष्ट कली. २८ एप्रिल २०१६ ला अंबाबरवा गावात अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी बैठक घेतली. सम २००८ पासून पुनवर्सन रखडलेले असताना ही बैठक मोलाची ठरली. ३ मे २०१६ रोजी गावातील संपूर्ण २९८ लाभार्थ्यांना बँकेचे पासबुक देण्यात आले. आदिवासी समुदायातील लोकांना अंबाबरवा सारख्या दुर्गम गावातून अकोटला येणे गैरेसोयीचे होते. म्हणून पहिल्यांदाच गावातच थेट बँक आॅफ इंडियाची चमू पोहोचली. बँकेच्या चमूतील व्यवस्थापक कुमार व रोखपाल सांगळूदकर यांनी गावातील लोकांना थेट पैसेवाटप केले. प्रमाणपत्र व पासबुक वाटप पंचायत समिती सभापती पांडुरंग हागे, जिल्हा परिषद सदस्य, वासुदेव गावंडे, भाजप तालुका अध्यक्ष सुधीर दातीर, सदस्य नलिनी गावंडे, माजी सभापती घामोडे, उपाध्यक्ष हागे, सहाय्यक वनसरंक्षक विनोद डेहनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी काझी यांनी केले. ग्रामस्थांनी ऐच्छिक पुनवर्सन योजनंतर्गत लवकरच गाव सोडणार असल्याचे सांगितले आहे. आजवर कोहा, कुंड, बोरी, वैराट, चुर्णी, धारगड, बारुखेडा, अमोना, नागरतास, गुल्लरघाट, सोमठाणा (बु.), सोमठाणा (खु.), केलपाणी व चुनखडी एकूण १५ गावांचे पुनवर्सन झालेले आहे. अंबाबरवा अभयारण्यातील रोहिनखिडकी गाव सुध्दा आता ऐच्छिक पुनर्वसन प्रक्रियेत येण्यास इच्छूक आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना आता जंगलात मुक्त संचार करता येणार आहे.