शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मेळघाटातील आदिवासींचा स्वेच्छा पुनर्वसन प्रक्रियेत सहभाग

By admin | Updated: May 18, 2016 00:10 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावे स्वेच्छेने पुनर्वसनासाठी पुढे येत असल्याने जंगलातील वन्यप्राण्यांना आता मोकळा श्वास घेणे सोईचे होणार आहे.

वन्यपशु घेणार मोकळा श्वास : अंबाबरवामध्ये वाहताहेत बदलाचे वारे चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावे स्वेच्छेने पुनर्वसनासाठी पुढे येत असल्याने जंगलातील वन्यप्राण्यांना आता मोकळा श्वास घेणे सोईचे होणार आहे. त्यांना जंगलात मुक्त संचार करता येणार आहे.अकोट वन्यजीव विभागांतर्गत अंबाबरवा अभयारण्य आहे. १७ एप्रिल १९९७ रोजी अंबाबरवा जंगल परिसराला अभयारण्याच्या दर्जा देण्यात आला होता. सन २००० मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तर २००६ अतिसरंक्षित गाभाक्षेत्रात समावेश करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका व अकोला जिल्ह्यातील काही भाग मिळून अंबाबरवा अभयारण्याचे क्षेत्र आहे. या जंगलात वाघ, बिबट, रानकुत्रा, तडस, अस्वल, कोल्हा, गवा, सांबर भेडकी, ससा, उदमांजर हे प्राणी आहेत. मोर, हरोळी, नाचन, स्वर्गीय नर्तक, टकाचोर, पिंगळा, रातवा यांचासह २०० चे वर पक्षी असून फुलपाखरे व इतर कीटकांसह येथील जैवविविधता समृध्द आहे.अंबाबरवा गावाने याच माध्यमातून एक नवा पायंडा पडण्याचा प्रयत्न केला. स्वेच्छा पुनर्वसन हा प्रयोग आता मेळघाटसारख्या भागात रुजला आहे. अंबाबरवाचे पुनर्वसन ३ नोव्हेंबर १०१२ च्या शासन निर्णयाच्या विकल्प १ नुसार होत आहे. १० मे २०१५ रोजी प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी अचनक भेट देऊन पुनर्वसनाची भूमिका स्पष्ट कली. २८ एप्रिल २०१६ ला अंबाबरवा गावात अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी बैठक घेतली. सम २००८ पासून पुनवर्सन रखडलेले असताना ही बैठक मोलाची ठरली. ३ मे २०१६ रोजी गावातील संपूर्ण २९८ लाभार्थ्यांना बँकेचे पासबुक देण्यात आले. आदिवासी समुदायातील लोकांना अंबाबरवा सारख्या दुर्गम गावातून अकोटला येणे गैरेसोयीचे होते. म्हणून पहिल्यांदाच गावातच थेट बँक आॅफ इंडियाची चमू पोहोचली. बँकेच्या चमूतील व्यवस्थापक कुमार व रोखपाल सांगळूदकर यांनी गावातील लोकांना थेट पैसेवाटप केले. प्रमाणपत्र व पासबुक वाटप पंचायत समिती सभापती पांडुरंग हागे, जिल्हा परिषद सदस्य, वासुदेव गावंडे, भाजप तालुका अध्यक्ष सुधीर दातीर, सदस्य नलिनी गावंडे, माजी सभापती घामोडे, उपाध्यक्ष हागे, सहाय्यक वनसरंक्षक विनोद डेहनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी काझी यांनी केले. ग्रामस्थांनी ऐच्छिक पुनवर्सन योजनंतर्गत लवकरच गाव सोडणार असल्याचे सांगितले आहे. आजवर कोहा, कुंड, बोरी, वैराट, चुर्णी, धारगड, बारुखेडा, अमोना, नागरतास, गुल्लरघाट, सोमठाणा (बु.), सोमठाणा (खु.), केलपाणी व चुनखडी एकूण १५ गावांचे पुनवर्सन झालेले आहे. अंबाबरवा अभयारण्यातील रोहिनखिडकी गाव सुध्दा आता ऐच्छिक पुनर्वसन प्रक्रियेत येण्यास इच्छूक आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना आता जंगलात मुक्त संचार करता येणार आहे.