शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ दीक्षांत समारंभात भारतीय संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:40 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा २० डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ३५ वा दीक्षांत समारंभात ब्रिटिशकालीन संस्कृतीच्या पोषाखाऐवजी आता भारतीय परंपरेचा पोषाख परिधान केला जाणार आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने बुधवारी या प्रस्तावाला एकमताने मान्यता प्रदान केली.

ठळक मुद्देव्यवस्थापनाचा निर्णय : परिधानात होणार बदल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा २० डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ३५ वा दीक्षांत समारंभात ब्रिटिशकालीन संस्कृतीच्या पोषाखाऐवजी आता भारतीय परंपरेचा पोषाख परिधान केला जाणार आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने बुधवारी या प्रस्तावाला एकमताने मान्यता प्रदान केली.विद्यापीठाचा दीक्षांत समारंभात वर्षांनुवर्षे कुलपती, दीक्षात समारंभाचे पाहुणे, कुलगुरू, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता आदींना काळा गाऊन, काळी तिरकी सपाट टोपी असा ब्रिटीशकालीन पोषाख परिधान करूनच समारंभात उपस्थित राहावे लागत होते. मात्र, आता इंग्रजी जुलमी सत्तेच्या काळातील गुलामी मानसिकतेचे प्रतीक असलेला हा पोषाख आता हद्दपार करण्यात आला आहे. येत्या दीक्षांत समारंभात भारतीय परंपरेचा पोषाख परीधान केला जाणार आहे. व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार आता दीक्षांत समारंभात पुरुषांसाठी आॅफ व्हाईट रंगाचा जोधपुरी व चामडी काळे बूट तर स्त्रियासाठी आॅफ व्हाईट साडी व काळी जुती असा परिधान असेल. पदविकांक्षी तसेच मंचावरील मान्यवरांना व पदाविकांक्षी ना भगवा, गुलाबी, हिरवा आदी ११ विविध रंगांचे स्कार्फ संवर्ग निहाय देण्यात येणार आहे.मागील दीक्षांत समारंभ १४ फेब्रुवारी २०१८ रोजी पार पडला. या दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी परीधान बदलाची बदलाची सूचना केली होती. मात्र, परिधान बदलासाठी आवश्यक कार्यवाही करायला वेळ अपुरा असल्याने पुढील दीक्षांत समारंभापासून हा बदल करण्यात येईल, असा निर्णय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी दिला होता. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे इंग्रजी, पाश्चिमात्य मानसिकतेचे प्रतिक असलेली ही दीक्षांत समारंभातील ही पद्धत, खूण आता कायमची इतिहासजमा होणार आहे.व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मागील दीक्षांत समारंभात परीधानात बदल करण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, त्यावेळी वेळ अपुरी पडत होती. उशिरा का होईना सदस्यांच्या मागणीनुसार परीधानात बदल करण्यात आला आहे. येत्या दीक्षांत समारंभात त्याअनुषंगाने बदल दिसेल.- डॉ. मुरलीधर चांदेकरकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठबदलत्या काळानुसार दीक्षांत समारंभाच्या परीधानात बदल आवश्यक होता. त्यानुसार कुलगुरू मुलीधर चांदेकर यांनी परीधान बदलाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आत पूर्णत: भारतीय संस्कृतीचा दीक्षांत समारंभ होईल.- प्रा. दिनेश सूर्यवंशीव्यवस्थापन परिषद सदस्य