शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

विद्यापीठ दीक्षांत समारंभात भारतीय संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:40 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा २० डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ३५ वा दीक्षांत समारंभात ब्रिटिशकालीन संस्कृतीच्या पोषाखाऐवजी आता भारतीय परंपरेचा पोषाख परिधान केला जाणार आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने बुधवारी या प्रस्तावाला एकमताने मान्यता प्रदान केली.

ठळक मुद्देव्यवस्थापनाचा निर्णय : परिधानात होणार बदल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा २० डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ३५ वा दीक्षांत समारंभात ब्रिटिशकालीन संस्कृतीच्या पोषाखाऐवजी आता भारतीय परंपरेचा पोषाख परिधान केला जाणार आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने बुधवारी या प्रस्तावाला एकमताने मान्यता प्रदान केली.विद्यापीठाचा दीक्षांत समारंभात वर्षांनुवर्षे कुलपती, दीक्षात समारंभाचे पाहुणे, कुलगुरू, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता आदींना काळा गाऊन, काळी तिरकी सपाट टोपी असा ब्रिटीशकालीन पोषाख परिधान करूनच समारंभात उपस्थित राहावे लागत होते. मात्र, आता इंग्रजी जुलमी सत्तेच्या काळातील गुलामी मानसिकतेचे प्रतीक असलेला हा पोषाख आता हद्दपार करण्यात आला आहे. येत्या दीक्षांत समारंभात भारतीय परंपरेचा पोषाख परीधान केला जाणार आहे. व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार आता दीक्षांत समारंभात पुरुषांसाठी आॅफ व्हाईट रंगाचा जोधपुरी व चामडी काळे बूट तर स्त्रियासाठी आॅफ व्हाईट साडी व काळी जुती असा परिधान असेल. पदविकांक्षी तसेच मंचावरील मान्यवरांना व पदाविकांक्षी ना भगवा, गुलाबी, हिरवा आदी ११ विविध रंगांचे स्कार्फ संवर्ग निहाय देण्यात येणार आहे.मागील दीक्षांत समारंभ १४ फेब्रुवारी २०१८ रोजी पार पडला. या दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी परीधान बदलाची बदलाची सूचना केली होती. मात्र, परिधान बदलासाठी आवश्यक कार्यवाही करायला वेळ अपुरा असल्याने पुढील दीक्षांत समारंभापासून हा बदल करण्यात येईल, असा निर्णय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी दिला होता. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे इंग्रजी, पाश्चिमात्य मानसिकतेचे प्रतिक असलेली ही दीक्षांत समारंभातील ही पद्धत, खूण आता कायमची इतिहासजमा होणार आहे.व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मागील दीक्षांत समारंभात परीधानात बदल करण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, त्यावेळी वेळ अपुरी पडत होती. उशिरा का होईना सदस्यांच्या मागणीनुसार परीधानात बदल करण्यात आला आहे. येत्या दीक्षांत समारंभात त्याअनुषंगाने बदल दिसेल.- डॉ. मुरलीधर चांदेकरकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठबदलत्या काळानुसार दीक्षांत समारंभाच्या परीधानात बदल आवश्यक होता. त्यानुसार कुलगुरू मुलीधर चांदेकर यांनी परीधान बदलाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आत पूर्णत: भारतीय संस्कृतीचा दीक्षांत समारंभ होईल.- प्रा. दिनेश सूर्यवंशीव्यवस्थापन परिषद सदस्य