शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यातील ‘व्हीआयपी’ रस्ता गेला चोरीला

By admin | Updated: March 7, 2016 00:03 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडे जाणारा ‘व्ही.आय.पी’ रस्ता अतिक्रमण आणि अवैध वाहतुकीच्या जाळ्यात चोरीला गेल्याने वाढती वाहतूक पाहता मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

अवैध वाहतूक, वाढते अतिक्रमण : पालिका, वाहतूक विभाग झाले आंधळे बहिरे !नरेंद्र जावरे  परतवाडासार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडे जाणारा ‘व्ही.आय.पी’ रस्ता अतिक्रमण आणि अवैध वाहतुकीच्या जाळ्यात चोरीला गेल्याने वाढती वाहतूक पाहता मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. धारणी मार्गावरील टपाल कार्यालयामागून सा.बां. विभागाच्या विश्रामगृहाकडे रस्ता जातो. या रस्त्यावर होलीक्रॉस मराठी शाळा असून संतोषनगर, गोपालनगर, गौलखेडा कुंभी, मल्हारा, नरसरी हे परतवाडा शहराला लागून असलेली गावे आहेत. दुसरीकडे विश्रामगृहावर सतत जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांचे मुक्काम राहते, व्हीआयपी रस्ता म्हणून त्यांची ओळख आहे. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. पादचाऱ्यासह दुचाकी चालकांना वाढते अतिक्रमण व अवैध वाहतुकीचा थांबा पाहता जीव मुठीत घेऊन वाहने चालवावे लागत आहे. कोण करणार कारवाई ?चिखलदरा थांबा नावाने या चौकाची ओळख असून तेथूनच धारणी वजा विश्रामगृहाकडे जाणारा व्हीआयपी रस्ता आहे. अरुंद असलेल्या या रस्त्यावर हॉलीक्रॉस शाळेपर्यंत हातठेले, पानटपऱ्या, कॅन्टीन, हॉटेलचे अतिक्रमण व त्यामुळे मेळघाटसह परिसरात चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहने दिवसभर रस्त्याच्या दुर्तफा उभ्या राहत आहेत. अगदी चौकात पालिकेने अ‍ॅटो थांबा दिल्याने अतिक्रमण व अवैध वाहतूक करणारे वाहने रस्ता अडवून वाहतुकीस अडथळा करताना दिसून येत आहे. दिवसभर हे चित्र वाहतूक विभाग व पालिका प्रशासनाला दिसत असताना त्यांनी आंधळे व बहिरे झाल्याचे सोंग घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे. धारणीकडे जडवाहतूक करणारे ट्रक व य-जा करणारी जड वाहने दिसल्यावरसुध्दा आॅटोचालकांची मुजोरी प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणारी ठरली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह संपलावाहतुकीचा परतवाडा शहरात चांदूरबाजार नाका, अचलपूर नाका, फिन्ले मिल स्टॉप, बाजार समिती, बसस्थानक, जयस्तंभ चौक, जगदंबा चौक, चिखलदरा, अंजनगाव, बैतूल स्टॉप येथे पहावयास मिळतो. पादचाऱ्यांसह दुचाकीचालकांना जीव मुठीत घेऊन येथून चालावे लागते. याच वाहतूक विभागाने गत महिन्यांत झालेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहात संपूर्ण शहराला नियम शिकविले होते. मात्र सप्ताह संपताच नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे गंभीर चित्र आहे. कुठे गेले अतिक्रमण निर्मूलन पथक ?अचलपूर नगरपालिकेत दिवाळीचे फटाके आणि गोडधोड फराळ झाल्यावर दोन अभियंत्यांची नियुक्ती करीत अतिक्रमण निर्मूलन पथक तयार केले होते. व्हीआयपी रस्त्याप्रमाणे शहरातील इतरही वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण वाढले. परिणामी ते अपघाताला कारणीभूत ठरणारे आहे. त्याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारा ठरणार आहे. विश्राम गृहाकडे जाणाऱ्या गाड्यांचा ताफासुध्दा या वाढलेल्या अतिक्रमण व बेशिस्त वाहतुकीला कारणीभूत ठरतेय.