शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

गावस्तरीय ग्राम दक्षता समित्या निष्क्रिय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाला गावपातळीवर नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजनेच्या दृष्टीने ग्राम दक्षता समितींची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या समित्या ...

अमरावती : कोरोनाला गावपातळीवर नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजनेच्या दृष्टीने ग्राम दक्षता समितींची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या समित्या बहुतांश गावांत निष्क्रिय असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. त्यामुळे गावागावांतील कोरोना संदर्भातील उपाययोजना योग्य प्रमाणात राबविल्या जात नाही. भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन पुन्हा एकदा या समित्या ॲक्टिव्ह करणे गरजेचे वाटू लागले आहे.

शासनादेशाचे आणि सूचनांचे काटेकोर पालन व्हावे, ग्रामीण भागात कोरोना संक्रमण थांबविण्याच्या दृष्टीने गावपातळीवर ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. सरपंच समितीचे अध्यक्ष आणि पोलीस पाटील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी व गावातील काही जणांची समितीत नियुक्ती करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील कोरोना काळात या समित्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करून चांगली कामगिरी केली. त्याची दखल घेत समित्यांना शासनाच्या सूचनेप्रमाणे दंडीत करण्याचे अधिकार दिले. त्यातून अनेक जणांवर कारवाईसुध्दा करण्यात आली. त्यामुळे समितीचा चांगला जोम गावोगावी बसला होता. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे समित्यांना मरगळ आली. त्यातच मध्यंतरी जिल्ह्यातील ५०० हून अधिक गावात निवडणुकीचे वातावरण होते. सत्ता बदल झाल्याने गाव कारभारी बदलले. दररोज झपाट्याने कोरोना बाधिताची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शासनाने नवीन नियमावली लागू केली. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र ग्राम दक्षता समिती निष्क्रिय झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाहेर गावाहून, बाहेरच्या राज्यातून, परदेशातून येणाऱ्यांवर तेवढा वॉच राहिलेला नाही. आरोग्य विभाग, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका काम करीत असल्याने ग्राम दक्षता समित्यांचे पदाधिकारी निवांत आहेत. मात्र, अद्याप समितीतील पदाधिकारी व सदस्यांनाही वाटणारा धोका ओळखून आता समितीने नव्या दमाने कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी पुन्हा सक्रिय होण्याची गरज आहे.

बॉक्स

नवीन पदाधिकाऱ्यांनी घ्यावा पुढाकार

जिल्ह्यातील पाचशेहून अधिक गावातील नवीन सरपंच निवडी मध्यंतरी झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गावाच्या कारभाराची सूत्रे गेली आहेत. गावचे सरपंच ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष असतात. त्यामुळे आता नवीन कारभाऱ्यांनी गावाच्या सुरक्षिततेसाठी कोरोनाला गावाच्या वेशीबाहेर रोखण्यासाठी पुढाकार घेऊन ग्राम दक्षता समिती ॲक्टिव्ह करणे गरजेचे झाले आहे.