शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील नझूल जमिनी ‘फ्री होल्ड’साठी मान्यता; भोगवटदार वर्ग बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 18:12 IST

विदर्भात लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनी आता 'फ्री होल्ड' (भोगवटदार वर्ग-१) करण्यास शासनाने २ मार्च रोजी मान्यता दिली. यामुळे अमरावती व नागपूर विभागातील किमान ४० हजार पट्टामालकांना याचा लाभ मिळणार आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : विदर्भात लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनी आता 'फ्री होल्ड' (भोगवटदार वर्ग-१) करण्यास शासनाने २ मार्च रोजी मान्यता दिली. यामुळे अमरावती व नागपूर विभागातील किमान ४० हजार पट्टामालकांना याचा लाभ मिळणार आहे. निवासी वापरासाठी जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणातील बाजारमूल्याच्या पाच टक्के, तर व्यावसायिक प्रयोजनासाठी १० टक्के रूपांतरण अधिमूल्याची आकारणी होणार आहे.

या निर्णयामुळे पट्टेमालकांना या जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार जमीन मालकांप्रमाणेच करता येणार आहे. निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक  प्रयोजनासाठी तत्कालीन मध्य प्रांत असलेल्या कायद्यानुसार विदर्भात महसूल विभागाद्वारा मोठ्या प्रमाणात नझूल जमिनी भाडेपट्टयाने दिल्या होत्या. या जमिनी भोगवटदार वर्ग बदलासाठी अभ्यास करून शिफारसी करण्यासाठी महसूल विभागाचे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली २१ डिसेंबर २०१५ रोजी समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार नझूल जमिनी 'फ्रीहोल्ड' करण्यासाठी १२ फेब्रुवारी २०१९ च्या मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी मान्यता दिली. त्या अनुषंगाने अनुसरन करावयाच्या कार्यपद्धतीविषयी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी शनिवारी याविषयीच्या सूचना अमरावती व नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिका-यांना दिल्या.

ही योजना ऐच्छिक स्वरूपाची असून सवलतीचा लाभ घ्यायचा नसेल तर त्या भाडेपट्टेधारकाला जुन्या धोरणानुसार भाडेपट्टा सुरू ठेवता येईल. मात्र, धर्मादाय किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी असलेल्या नझूल जमिनी 'फ्री होल्ड' करता येणार नाही. नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महापालिका यांच्यामार्फत देण्यात आलेल्या नझूल जमिनीच्या भाडेपट्यासाठी हे धोरण लागू करणे, यासाठी आवयक ती कार्यवाही नगरविकास विभागाने करण्याच्या सूचना यामध्ये दिल्या आहेत.  ही आहे विहित कार्यपद्धतीनागपूर व अमरावती विभागातील अशा प्रकारचे भाडेपट्टे 'फ्री होल्ड' करण्यासाठी सर्व प्रकारच्या शर्तभंगांचे नियमितीकरण प्रचलित धोरणानुसार झाल्यानंतर भाडेपट्टेधारकाला जिल्हाधिका-यांकडे अर्ज सादर करावा लागेल. आवश्यक बाबींची पूर्तता झाल्याची खात्री केल्यानंतर जिल्हाधिका-यांद्वारा निर्धारित केलेल्या रूपांतरण अधिमूल्याचा भरणा करून घेऊन भोगवटदार वर्ग बदलाचे आदेश देतील. भाडेपट्याच्या संदर्भात काही शर्तभंग झाल्यास विहित रक्कम भरून नियमाकुल करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी पारित केल्यानंतरच तो नझूल भूखंड 'फ्री होल्ड' करण्यास पात्र समजण्यात येणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती