शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

काही वेळाकरिता तापमान गाठणार ५० डिग्रीचा उच्चांक विदर्भवासी होरपळणार : हवामान खात्याचा अंदाज

By admin | Updated: April 16, 2016 00:14 IST

जागतिक तापमानाच्या प्रभावाने यंदा विदर्भातील एखाद्या ठिकाणचे तापमान थोड्या वेळापुरते ५० डिग्रीवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

वैभव बाबरेकर अमरावतीजागतिक तापमानाच्या प्रभावाने यंदा विदर्भातील एखाद्या ठिकाणचे तापमान थोड्या वेळापुरते ५० डिग्रीवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तापमानाने ५० डिग्रीचा उच्चांक गाठला तर विदर्भवासी अक्षरश: होरपळून निघण्याची शक्यता आहे.दरवर्षी उन्हाळ्यातील तीव्र झळांमुळे नागरिकांच्या जिवाची लाही लाही होते. मात्र, यंदा तापमान सर्वात उच्चांक गाठणार असल्याच्या अंदाजाने हाहाकार माजण्याची शक्यता आहे. थोडावेळापुरते का होईना जर तापमानाने ५० डिग्रीचा उच्चांक गाठला तर नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण होणार आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते सद्यस्थितीत हिमालयावरील पश्चिमी विक्षेप दूर सरकत असून त्यामुळे काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. पंजाब आणि अंतर्गत कर्नाटकच्या दिड किलोमिटरवर चक्राकार वारे आहेत. अन्य कोणतीही कमी दाबाची प्रणाली नसल्यामुळे पावसाची शक्यता नाही. मात्र, कमाल तापमान येत्या दोन ते तीन दिवसांत २ डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असून किमान तापमान हळूहळू वाढणार आहे. पुढील आठवड्यातील १५ ते २३ एप्रिल दरम्यान कमाल तापमान ४३ ते ४४ डिग्रीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. एखाद्या दिवसाकरिता तापमान ४६ डिग्रीवर जाऊ शकते. २०१६ हे वर्ष सर्वाधिक उष्ण राहण्याची शक्यता आहे. विदर्भात एखाद्या ठिकाणचे तापमान ५० डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.आगी, वणवा, प्रदूषणाचा सर्वाधिक प्रभावजागतिक तापमान वाढत असल्यामुळे यंदाचे वर्ष सर्वाधिक उष्ण राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याचा आहे. दिवस हा १३ तासांचा असल्यामुळे सकाळपासून उन्हाचा प्रभाव जाणवायला लागतोे. उन्हाळ्यात सूर्याची किरणे लंब रुपाने थेट पडत असल्यामुळे उन्हाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळते. त्यातच वाहनांचे प्रदूषण व औद्योगिक प्रदूषणामुळे तापमानात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत लागणाऱ्या आगी, वणवा, शेतीचे धुरे पेटविणे आदींच्या प्रभावाने तापमानात प्रचंड वाढ होत असल्याचे मत हवामान तज्ज्ञांचे आहे. जागतिक तापमानवाढीच्या परिणामामुळे यंदाचे वर्ष सर्वाधिक उष्णतेचे असल्याचा अंदाज पुणे येथील वेध शाळेने दिला आहे. त्यामुळे यंदा विदर्भात एखाद्या ठिकाणचे तापमान थोड्या अवधीकरिता ५० डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. - अनिल बंड,हवामान तज्ज्ञ, श्री शिवाजी कृषि महाविद्यालय