शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

काही वेळाकरिता तापमान गाठणार ५० डिग्रीचा उच्चांक विदर्भवासी होरपळणार : हवामान खात्याचा अंदाज

By admin | Updated: April 16, 2016 00:14 IST

जागतिक तापमानाच्या प्रभावाने यंदा विदर्भातील एखाद्या ठिकाणचे तापमान थोड्या वेळापुरते ५० डिग्रीवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

वैभव बाबरेकर अमरावतीजागतिक तापमानाच्या प्रभावाने यंदा विदर्भातील एखाद्या ठिकाणचे तापमान थोड्या वेळापुरते ५० डिग्रीवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तापमानाने ५० डिग्रीचा उच्चांक गाठला तर विदर्भवासी अक्षरश: होरपळून निघण्याची शक्यता आहे.दरवर्षी उन्हाळ्यातील तीव्र झळांमुळे नागरिकांच्या जिवाची लाही लाही होते. मात्र, यंदा तापमान सर्वात उच्चांक गाठणार असल्याच्या अंदाजाने हाहाकार माजण्याची शक्यता आहे. थोडावेळापुरते का होईना जर तापमानाने ५० डिग्रीचा उच्चांक गाठला तर नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण होणार आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते सद्यस्थितीत हिमालयावरील पश्चिमी विक्षेप दूर सरकत असून त्यामुळे काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. पंजाब आणि अंतर्गत कर्नाटकच्या दिड किलोमिटरवर चक्राकार वारे आहेत. अन्य कोणतीही कमी दाबाची प्रणाली नसल्यामुळे पावसाची शक्यता नाही. मात्र, कमाल तापमान येत्या दोन ते तीन दिवसांत २ डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असून किमान तापमान हळूहळू वाढणार आहे. पुढील आठवड्यातील १५ ते २३ एप्रिल दरम्यान कमाल तापमान ४३ ते ४४ डिग्रीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. एखाद्या दिवसाकरिता तापमान ४६ डिग्रीवर जाऊ शकते. २०१६ हे वर्ष सर्वाधिक उष्ण राहण्याची शक्यता आहे. विदर्भात एखाद्या ठिकाणचे तापमान ५० डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.आगी, वणवा, प्रदूषणाचा सर्वाधिक प्रभावजागतिक तापमान वाढत असल्यामुळे यंदाचे वर्ष सर्वाधिक उष्ण राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याचा आहे. दिवस हा १३ तासांचा असल्यामुळे सकाळपासून उन्हाचा प्रभाव जाणवायला लागतोे. उन्हाळ्यात सूर्याची किरणे लंब रुपाने थेट पडत असल्यामुळे उन्हाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळते. त्यातच वाहनांचे प्रदूषण व औद्योगिक प्रदूषणामुळे तापमानात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत लागणाऱ्या आगी, वणवा, शेतीचे धुरे पेटविणे आदींच्या प्रभावाने तापमानात प्रचंड वाढ होत असल्याचे मत हवामान तज्ज्ञांचे आहे. जागतिक तापमानवाढीच्या परिणामामुळे यंदाचे वर्ष सर्वाधिक उष्णतेचे असल्याचा अंदाज पुणे येथील वेध शाळेने दिला आहे. त्यामुळे यंदा विदर्भात एखाद्या ठिकाणचे तापमान थोड्या अवधीकरिता ५० डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. - अनिल बंड,हवामान तज्ज्ञ, श्री शिवाजी कृषि महाविद्यालय