शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासांत विदर्भात हलका पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:16 IST

येत्या ४८ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सोबतच ४१ ते ४४ डिग्री सेल्सीअस तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उन्ह-पावसाचा खेळ रंगण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येत्या ४८ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सोबतच ४१ ते ४४ डिग्री सेल्सीअस तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उन्ह-पावसाचा खेळ रंगण्याची शक्यता आहे.श्री शिवाजी कृषि महाविद्यालयातील हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या अंदाजानुसार, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भावर कमी दाबाची द्रोणीय स्थिती १.५ किमी उंचीवर आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश सीमेवर चक्राकार वारे आहेत. दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र असून, ते पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे देशाला त्यापासून धोका नसल्याचे मत बंड यांनी मांडले आहे. तथापि, या स्थितीमुळे पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात तापमान ४४ डिग्रीपर्यंत पोहोचेल तसेच १७ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. १७ ते २० मे दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.परतवाड्यात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पाऊस बरसलापरतवाडा : प्रचंड उकाड्यानंतर बुधवारी दुपारी २.३० वाजता शहरातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. विजा कडाडल्या आणि वादळी वारा सुटल्याने बाजार समितीध्ये आणलेला माल ओला होण्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच धावपळ केली.अचलपूर नाका ते जयस्तंभ, अंजनगाव स्टॉप, बाजार समिती, परिषद, मिल कॉलनी स्टॉप आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जोराचा वारा सुटल्याने सर्वत्र धुराळा उडाला होता. बाजार समितीच्या पटांगणात दोनशेवर ट्रॅक्टरमध्ये शेतकºयांनी आणलेली तूर झाकण्यासाठी एकच पळापळ झाली. बाजार समितीने तात्काळ आपल्या गोदामातून शेतकऱ्यांना ताडपत्र उपलब्ध करून दिल्या. २० मिनिटांनी पाऊस थांबला.धारणीत वाऱ्यासह पावसाचे आगमनधारणी : तालुक्यात बुधवारी जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. भवई पूजेला पावसाचा मान मिळाल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.तालुक्यात बुधवारी आदिवासी बांधवांची भवई पूजा होती. यानंतर आदिवासी बांधवांच्या नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षात पीक चांगले पिकण्यासाठी व वर्ष सुखसमृद्धीचे जाण्याकरिता भवई पूजा केली जाते. या पूजेला संपूर्ण गावकरी गावाबाहेरील त्यांच्या देवतांना साकडे घालून पूजाअर्चा करतात व तेथेच भोजनाचा आस्वाद घेऊन मनोमीलन करतात. भरपूर पावसाच्या आगमनाकरिता आदिवासी बांधव ही पूजा करतात, अशी आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे. आज वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने भवई पूजेला पावसाच्या आगमनाचा मान मिळाल्याच्या आनंदाने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.