शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

४८ तासांत विदर्भात हलका पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:16 IST

येत्या ४८ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सोबतच ४१ ते ४४ डिग्री सेल्सीअस तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उन्ह-पावसाचा खेळ रंगण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येत्या ४८ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सोबतच ४१ ते ४४ डिग्री सेल्सीअस तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उन्ह-पावसाचा खेळ रंगण्याची शक्यता आहे.श्री शिवाजी कृषि महाविद्यालयातील हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या अंदाजानुसार, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भावर कमी दाबाची द्रोणीय स्थिती १.५ किमी उंचीवर आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश सीमेवर चक्राकार वारे आहेत. दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र असून, ते पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे देशाला त्यापासून धोका नसल्याचे मत बंड यांनी मांडले आहे. तथापि, या स्थितीमुळे पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात तापमान ४४ डिग्रीपर्यंत पोहोचेल तसेच १७ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. १७ ते २० मे दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.परतवाड्यात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पाऊस बरसलापरतवाडा : प्रचंड उकाड्यानंतर बुधवारी दुपारी २.३० वाजता शहरातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. विजा कडाडल्या आणि वादळी वारा सुटल्याने बाजार समितीध्ये आणलेला माल ओला होण्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच धावपळ केली.अचलपूर नाका ते जयस्तंभ, अंजनगाव स्टॉप, बाजार समिती, परिषद, मिल कॉलनी स्टॉप आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जोराचा वारा सुटल्याने सर्वत्र धुराळा उडाला होता. बाजार समितीच्या पटांगणात दोनशेवर ट्रॅक्टरमध्ये शेतकºयांनी आणलेली तूर झाकण्यासाठी एकच पळापळ झाली. बाजार समितीने तात्काळ आपल्या गोदामातून शेतकऱ्यांना ताडपत्र उपलब्ध करून दिल्या. २० मिनिटांनी पाऊस थांबला.धारणीत वाऱ्यासह पावसाचे आगमनधारणी : तालुक्यात बुधवारी जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. भवई पूजेला पावसाचा मान मिळाल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.तालुक्यात बुधवारी आदिवासी बांधवांची भवई पूजा होती. यानंतर आदिवासी बांधवांच्या नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षात पीक चांगले पिकण्यासाठी व वर्ष सुखसमृद्धीचे जाण्याकरिता भवई पूजा केली जाते. या पूजेला संपूर्ण गावकरी गावाबाहेरील त्यांच्या देवतांना साकडे घालून पूजाअर्चा करतात व तेथेच भोजनाचा आस्वाद घेऊन मनोमीलन करतात. भरपूर पावसाच्या आगमनाकरिता आदिवासी बांधव ही पूजा करतात, अशी आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे. आज वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने भवई पूजेला पावसाच्या आगमनाचा मान मिळाल्याच्या आनंदाने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.