शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जमावबंदी शहरात वाहने सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST

सोमवारी अमरावती जिल्ह्यात कलम १४४ अन्वये जमावबंदी कायदा लागू करण्यात आला. कोराना विषाणूपासून वाचण्यासाठी शासन, प्रशासनाकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु, सोमवारी सकाळपासून जमावबंदी कायद्याची नागरिक सर्रास पालमल्ली करताना दिसून आले. अमरावती महानगरातील चौकाचौकांत पोलीस बंदोबस्तासाठी होते. तथापि, पोलिसांचे भय न बाळगता सुसाट वेगाने वाहने दामटली जात असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देवाहनचालकांना तंबी : जिल्ह्याच्या सीमेवर, महत्त्वाच्या चौकात वाहनांची कसून तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता, रविवारी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळला गेला. मात्र, सोमवारपासून जमावबंदी कायदा लागू करण्यात आला असतानाही नागरिक जमावाने एकत्र आले, तर काहींनी वाहनाने शहरात अनावश्यक फेरफटका मारला. पोलिसांनी शहरातील मुख्य चौकांमध्ये अशा वाहनांची तपासणी केली. याशिवाय जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी करून ती पुढे सोडण्यात आली. नागरिकांनी जमावबंदी कायदा गुंडाळल्याचेच दिसून आले.सोमवारी अमरावती जिल्ह्यात कलम १४४ अन्वये जमावबंदी कायदा लागू करण्यात आला. कोराना विषाणूपासून वाचण्यासाठी शासन, प्रशासनाकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु, सोमवारी सकाळपासून जमावबंदी कायद्याची नागरिक सर्रास पालमल्ली करताना दिसून आले. अमरावती महानगरातील चौकाचौकांत पोलीस बंदोबस्तासाठी होते. तथापि, पोलिसांचे भय न बाळगता सुसाट वेगाने वाहने दामटली जात असल्याचे दिसून आले. जमावबंदी लागू झाली असताना आणि पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्याचे निदर्शनात येत असतानाही पोलिसांनी सौम्य भूमिका घेतल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान, राजकमल चौकात दुपारी १२ वाजतानंतर पोलिसांनी ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना थांबवून कोठे, कशाला जाताहेत, याबाबत चौकशी केली. मात्र, कलम १४४ अन्वये जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणाºयाविरुद्ध ठोस कारवाई केलेली नाही. जमावबंदी कायद्याचे उल्लंघन शहरभर करण्यात आल्याचे वास्तव आहे. नागरिक खासगी वाहनांनी मोकळ्या रस्त्यांची मौज लुटण्यासाठी फिरत असल्याचे चित्र होते.जमावबंदी कायद्याचे उल्लंघन होत असेल तर नाईलाजास्तव गुन्हे दाखल करावे लागतील. आयुक्तालयांतर्गत सर्वच ठाण्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत.- संजीवकुमार बावीस्कर, पोलीस आयुक्त,अमरावतीजीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूजिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले. सोमवारपासून पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत, असा हा जमावबंदी कायदा आहे. यात औषध दुकाने, किराणा, दूध, फळे व भाजीपाला या दैनंदिन गरजेच्या वस्तू वगळता, अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास पोलिसांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.सीमेवर वाहनांची तपासणीजिल्ह्याच्या सीमेवरून प्रवेश अथवा जिल्ह्याबाहेर जाणाºया वाहनांची पोलिसांनी तपासणी केली. रविवारी जनता कर्फ्यूदरम्यान सन्नाटा होता. मात्र, सोमवारपासून लागू झालेल्या जमावबंदी कायद्याचे गांभीर्य नागरिकांनी लक्षातच घेतले नाही. सीमेवरून जाणाऱ्या वाहनांमध्ये सहा ते सात प्रवाशांनी प्रवास केला. यात युवक आघाडीवर असल्याचे दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या