शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

जमावबंदी शहरात वाहने सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST

सोमवारी अमरावती जिल्ह्यात कलम १४४ अन्वये जमावबंदी कायदा लागू करण्यात आला. कोराना विषाणूपासून वाचण्यासाठी शासन, प्रशासनाकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु, सोमवारी सकाळपासून जमावबंदी कायद्याची नागरिक सर्रास पालमल्ली करताना दिसून आले. अमरावती महानगरातील चौकाचौकांत पोलीस बंदोबस्तासाठी होते. तथापि, पोलिसांचे भय न बाळगता सुसाट वेगाने वाहने दामटली जात असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देवाहनचालकांना तंबी : जिल्ह्याच्या सीमेवर, महत्त्वाच्या चौकात वाहनांची कसून तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता, रविवारी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळला गेला. मात्र, सोमवारपासून जमावबंदी कायदा लागू करण्यात आला असतानाही नागरिक जमावाने एकत्र आले, तर काहींनी वाहनाने शहरात अनावश्यक फेरफटका मारला. पोलिसांनी शहरातील मुख्य चौकांमध्ये अशा वाहनांची तपासणी केली. याशिवाय जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी करून ती पुढे सोडण्यात आली. नागरिकांनी जमावबंदी कायदा गुंडाळल्याचेच दिसून आले.सोमवारी अमरावती जिल्ह्यात कलम १४४ अन्वये जमावबंदी कायदा लागू करण्यात आला. कोराना विषाणूपासून वाचण्यासाठी शासन, प्रशासनाकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु, सोमवारी सकाळपासून जमावबंदी कायद्याची नागरिक सर्रास पालमल्ली करताना दिसून आले. अमरावती महानगरातील चौकाचौकांत पोलीस बंदोबस्तासाठी होते. तथापि, पोलिसांचे भय न बाळगता सुसाट वेगाने वाहने दामटली जात असल्याचे दिसून आले. जमावबंदी लागू झाली असताना आणि पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्याचे निदर्शनात येत असतानाही पोलिसांनी सौम्य भूमिका घेतल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान, राजकमल चौकात दुपारी १२ वाजतानंतर पोलिसांनी ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना थांबवून कोठे, कशाला जाताहेत, याबाबत चौकशी केली. मात्र, कलम १४४ अन्वये जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणाºयाविरुद्ध ठोस कारवाई केलेली नाही. जमावबंदी कायद्याचे उल्लंघन शहरभर करण्यात आल्याचे वास्तव आहे. नागरिक खासगी वाहनांनी मोकळ्या रस्त्यांची मौज लुटण्यासाठी फिरत असल्याचे चित्र होते.जमावबंदी कायद्याचे उल्लंघन होत असेल तर नाईलाजास्तव गुन्हे दाखल करावे लागतील. आयुक्तालयांतर्गत सर्वच ठाण्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत.- संजीवकुमार बावीस्कर, पोलीस आयुक्त,अमरावतीजीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूजिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले. सोमवारपासून पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत, असा हा जमावबंदी कायदा आहे. यात औषध दुकाने, किराणा, दूध, फळे व भाजीपाला या दैनंदिन गरजेच्या वस्तू वगळता, अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास पोलिसांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.सीमेवर वाहनांची तपासणीजिल्ह्याच्या सीमेवरून प्रवेश अथवा जिल्ह्याबाहेर जाणाºया वाहनांची पोलिसांनी तपासणी केली. रविवारी जनता कर्फ्यूदरम्यान सन्नाटा होता. मात्र, सोमवारपासून लागू झालेल्या जमावबंदी कायद्याचे गांभीर्य नागरिकांनी लक्षातच घेतले नाही. सीमेवरून जाणाऱ्या वाहनांमध्ये सहा ते सात प्रवाशांनी प्रवास केला. यात युवक आघाडीवर असल्याचे दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या