शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

संचारबंदीत पुन्हा भाजीबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST

अंमलबजावणीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने नागपुरी गेट चौकात रविवारी सकाळी पुन्हा भाजीबाजार भरला. त्याकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या नागपुरी गेट ठाण्यातील एकाही कर्मचाºयाने ढुंकूनही पाहिले नाही. महापालिकेचे पथक या भागात फिरकलेच नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे त्या भागातील काही नागरिक, पोलीस व महापालिका प्रशासन किती पालन करतात, ही बाब आता उघड झाली आहे.

ठळक मुद्देनागपुरी गेट चौकात पायमल्ली : पोलीस, महापालिका, जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पुन्हा संचारबंदीत भाजीपाल्याचा लिलाव झाला. चहा-नाष्ट्याचे ठेल्यांवरून वितरण झाले. गुटखाही विकला गेला. हे घडले स्वातंत्र्यदिनी देशसेवेची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी. या ठिकाणी बाजार भरविला गेल्याचे गतवेळेप्रमाणे ना पोलीस-महापालिका प्रशासनाच्या गावी होते, ना जिल्हा प्रशासनाच्या.कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे जिल्ह्यात शनिवार व रविवारी संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले. अंमलबजावणीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने नागपुरी गेट चौकात रविवारी सकाळी पुन्हा भाजीबाजार भरला. त्याकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या नागपुरी गेट ठाण्यातील एकाही कर्मचाºयाने ढुंकूनही पाहिले नाही. महापालिकेचे पथक या भागात फिरकलेच नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे त्या भागातील काही नागरिक, पोलीस व महापालिका प्रशासन किती पालन करतात, ही बाब आता उघड झाली आहे.‘लोकमत’द्वारे संचारबंदी आदेशात नागपुरी गेट चौकात सुरू असलेल्या भाजीबाजाराचे सचित्र वास्तव ३ ऑगस्टला जनदरबारात मांडून प्रशासनाची पोलखोल केली होती. यावर महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी या झोनच्या सहायक आयुक्तांसह बाजार व परवाना तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुखांना शो कॉज नोटीस बजावण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले होते. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनीदेखील नागपुरीगेटचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे गत रविवारी या मैदानावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला, तर महापालिका पथकांनीही या ठिकाणी पाहणी केली.विद्यमान आठवड्यात येथे पुन्हा भाजीबाजार भरतो काय, याचे रिअ‍ॅलिटी चेक १६ आॅगस्टला पहाटे ‘लोकमत’द्वारा करण्यात आले असता, पुन्हा याच ठिकाणी यंत्रणेच्या नाकावर टिच्चून भाजीबाजार भरला.संचारबंदीत शिथिलता फक्त १५ ऑगस्टलाजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ६० तासांच्या संचारबंदीत स्वातंत्र्यदिन साजरा करता यावा, यासाठी शनिवारी सकाळी ६ ते ११.३० या वेळेत शिथिलता देण्यात आली. या संपूर्ण काळात सर्व भाजीबाजार, बाजार समितीमधील भाजीपाल्याचा लिलाव बंद होता. फक्त नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील भाजीबाजार सुरू राहिला. कायदा, नियमांची पायमल्ली रोखणार की नाही, असा अमरावतीकरांचा सवाल आहे.चहा, गुटखा, नाष्ट्याच्या गाड्याहीया ठिकाणी भाज्यांचा लिलाव झाला. फळे विक्रीला होती. हातगाड्यांवर चहा-नाष्टा विक्री सुरू होती. यावर ताण म्हणजे गुटखाविक्री करतांनादेखील काही जण दिसून आलेत. ही संचारबंदी आदेशाची पायमल्ली पोलीस व महापालिका प्रशासनाला आढळून येऊ नये, याबाबत आता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. संचारबंदीत विक्रेते व ग्राहक या ठिकाणी आले कुठून व भाजीबाजार भरला कसा, याला पाठिंबा कुणाचा, अशी विचारणा होत आहे.

टॅग्स :Marketबाजार