शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वरुड तालुक्यात मुसळधार

By admin | Updated: June 24, 2015 00:34 IST

गत २४ तासांपासून वरुड तालुक्यात संततधार पाऊस सुरु असल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले.

२४ तास बरसला : जमीन खरडली, पेरणी खोळंबली, पाणी घरात शिरले, वाहतूक विस्कळीतवरूड : गत २४ तासांपासून वरुड तालुक्यात संततधार पाऊस सुरु असल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. शेकडो हेक्टर जमीन पुरात खरडून गेली असूून बियाणे आणि खतेही वाहून गेलेत. मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ४८.५३ मी.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यातील प्रकल्पात ४० टक्के जलसाठा आहे. नदी-नाले एकरुप होऊन वाहू लागले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यात २१ जूनपासून संततधार पावसाला झाली. सात महसूली मंडळामध्ये वरुड ४३ मि.मी., बेनोडा ५० मि.मी., लोणी ९०.८० मि.मी., राजूराबाजार ४६.६० मि.मी., वाठोडा चांदस ५१.३० मि.मी., पुसला ३२ मि.मी., शेंदूरजनाघाट २६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी २२ जूनला केवळ ५३.१२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र, यावर्षी २२ जूनला १७७.४५ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला होता. काही शेतकऱ्यांनी पेरणीसुध्दा केली होती. पावसामुळे शेतात जाण्याचे मार्गही बंद झाले आहे. नदी-नाले एकरुप होऊन वाहू लागले आहेत.सावंगीत रेल्वे पुलाखाली पाणीसावंगी : सावंगी ते पुसला मार्गावर सावंगीहून १ किलामीटर अंतरावर अंतरावर नरखेड ते न्यू अमरावती हा रेल्वे मार्ग जातो. या रेल्वेमार्गावर सावंगीला ये-जा करण्यासाठी पूल उभारण्यात आला. परंतु त्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे पावसाचे पाणी त्या पुलाखाली साचून राहते. दरवर्षी पावसाळयात याठिकाणी पुराचे स्वरुप येत असल्याने वाहनचालकासह शेतकऱ्यांनासुध्दा मोठा त्रास सहन करावा लागतो.पेठ मांगरुळीत पाणी शिरले पेठ मांगरुळी : परिसरात पहिल्यांदा ५० वर्षात सततधार पावसाने कहर केलाअसून शेकडो हेक्टर शेतजमिनी खरडून नेल्या तर शेताचे बांध फुटल्याने शेतात पाण्याचे चर पडले. पेरणी सुरु असताना अनेकांचे पेरणीचे साहित्यसुध्दा वाहून गेले. गावातसुध्दा सावंगा नाल्याचे पाणी आल्याने अनेकांच्या घरात पाणी तुंबले होते. सततधार पावसामुळे अनेककाच्ंया पेरण्या रखडल्या. शेतात पाणी घुसल्याने शेतातील बांध फुटले, नुकतेच पेरणी झालेले शेत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहेत.झोलंबा येथील जमीन अतिवृष्टीत खरडली !झोंलबा : शेतशिवारामध्ये अतिवृष्टी झाल्याने नाल्याला आलेल्या आणि नालाखोलीकरणामुळे पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो हेक्टर जमीन खरडून गेल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. शेतात असलेले पी.व्ही.सी. पाईप आणि ठिबकच्या नळ्यासुध्दा वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी नुकतेच तहसीलदार यांना निवेदन देऊन मदतीची मागणी केली आहे. झोलंबा येथे हिवरखेडच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत.