शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
2
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
3
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
4
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
5
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
6
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
8
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
9
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
10
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
11
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
12
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
13
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
14
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
15
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
16
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
17
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
18
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
19
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
20
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती

वरुड तालुक्यात मुसळधार

By admin | Updated: June 24, 2015 00:34 IST

गत २४ तासांपासून वरुड तालुक्यात संततधार पाऊस सुरु असल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले.

२४ तास बरसला : जमीन खरडली, पेरणी खोळंबली, पाणी घरात शिरले, वाहतूक विस्कळीतवरूड : गत २४ तासांपासून वरुड तालुक्यात संततधार पाऊस सुरु असल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. शेकडो हेक्टर जमीन पुरात खरडून गेली असूून बियाणे आणि खतेही वाहून गेलेत. मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ४८.५३ मी.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यातील प्रकल्पात ४० टक्के जलसाठा आहे. नदी-नाले एकरुप होऊन वाहू लागले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यात २१ जूनपासून संततधार पावसाला झाली. सात महसूली मंडळामध्ये वरुड ४३ मि.मी., बेनोडा ५० मि.मी., लोणी ९०.८० मि.मी., राजूराबाजार ४६.६० मि.मी., वाठोडा चांदस ५१.३० मि.मी., पुसला ३२ मि.मी., शेंदूरजनाघाट २६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी २२ जूनला केवळ ५३.१२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र, यावर्षी २२ जूनला १७७.४५ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला होता. काही शेतकऱ्यांनी पेरणीसुध्दा केली होती. पावसामुळे शेतात जाण्याचे मार्गही बंद झाले आहे. नदी-नाले एकरुप होऊन वाहू लागले आहेत.सावंगीत रेल्वे पुलाखाली पाणीसावंगी : सावंगी ते पुसला मार्गावर सावंगीहून १ किलामीटर अंतरावर अंतरावर नरखेड ते न्यू अमरावती हा रेल्वे मार्ग जातो. या रेल्वेमार्गावर सावंगीला ये-जा करण्यासाठी पूल उभारण्यात आला. परंतु त्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे पावसाचे पाणी त्या पुलाखाली साचून राहते. दरवर्षी पावसाळयात याठिकाणी पुराचे स्वरुप येत असल्याने वाहनचालकासह शेतकऱ्यांनासुध्दा मोठा त्रास सहन करावा लागतो.पेठ मांगरुळीत पाणी शिरले पेठ मांगरुळी : परिसरात पहिल्यांदा ५० वर्षात सततधार पावसाने कहर केलाअसून शेकडो हेक्टर शेतजमिनी खरडून नेल्या तर शेताचे बांध फुटल्याने शेतात पाण्याचे चर पडले. पेरणी सुरु असताना अनेकांचे पेरणीचे साहित्यसुध्दा वाहून गेले. गावातसुध्दा सावंगा नाल्याचे पाणी आल्याने अनेकांच्या घरात पाणी तुंबले होते. सततधार पावसामुळे अनेककाच्ंया पेरण्या रखडल्या. शेतात पाणी घुसल्याने शेतातील बांध फुटले, नुकतेच पेरणी झालेले शेत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहेत.झोलंबा येथील जमीन अतिवृष्टीत खरडली !झोंलबा : शेतशिवारामध्ये अतिवृष्टी झाल्याने नाल्याला आलेल्या आणि नालाखोलीकरणामुळे पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो हेक्टर जमीन खरडून गेल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. शेतात असलेले पी.व्ही.सी. पाईप आणि ठिबकच्या नळ्यासुध्दा वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी नुकतेच तहसीलदार यांना निवेदन देऊन मदतीची मागणी केली आहे. झोलंबा येथे हिवरखेडच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत.