शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बेभान कार चालकाने चार दुचाकींना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:13 IST

शहरात बेभान वाहतुकीने कळस गाठला असून, शुक्रवारी रात्री भरधाव कारने चार दुचाकींना धडक दिल्याने पाच जण जखमी झाले. ही घटना नवाथे चौकात घडली. गेल्या दोन दिवसांत शहरात दोन ठिकाणी अशाप्रकारच्या दोन घटना घडल्या.

ठळक मुद्देदोन दिवसात दुसरी घटना : अस्ताव्यस्त वाहतुकीमुळे वाढले अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात बेभान वाहतुकीने कळस गाठला असून, शुक्रवारी रात्री भरधाव कारने चार दुचाकींना धडक दिल्याने पाच जण जखमी झाले. ही घटना नवाथे चौकात घडली. गेल्या दोन दिवसांत शहरात दोन ठिकाणी अशाप्रकारच्या दोन घटना घडल्या.या अपघातातील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवाथे चौकात घडलेल्या अपघातात रोशन अळसपुरे (३०,रा.शशिनगर) व निकिता राजकुमार सहारे (२३) हे दोघेच राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचले, तर अन्य जखमी पोलिसांपर्यंत पोहोचले नाहीत. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी चालक योगेश ज्ञानेश्वर जवंजाळ (रा.रविनगर) याला ताब्यात घेतले. शहरातील अस्ताव्यस्त वाहतूक अपघाताला आमंत्रण देणारी ठरत आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्तीत वाहने चालवित असल्यामुळे अपघात वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी फे्रजरपुरा हद्दीतील वडाळी मार्गावर भरधाव ट्रकने चार दुचाकींना एका पाठोपाठ धडक दिली. या अपघातातही पाच जण जखमी झालेत. ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला. शुक्रवारी रात्री भरधाव कार क्रमांक एमएच ०३ एडब्ल्यू ०४३२ नवाथे रेल्वे पुलाकडून बडनेराकडे जाण्यासाठी वळत होती. दरम्यान बडनेरा रोडच्या कडेला उभ्या दुचाकींना कारने धडक देत समोर जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक दुचाकी व कार खाली आली होती. सुदैवाने प्राणहानी टळली. या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहने थांबली होती. नागरिक व जखमींनी कारचालकाला चोप दिला. त्याने पसार होऊन राजापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कार ताब्यात घेतली. वाहतूक सुरळीत केली. दोन दिवसांत ही दुसरी घटना शहरात घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांविरुद्ध द्वेषभावना भडकाविणाऱ्याविरुद्ध गुन्हावडाळी मार्गावर झालेल्या अपघातातील दुचाकी घटनासथळीच पडून होत्या. दरम्यान एका इसमाने जमिनीवर पडलेल्या दुचाकी पोलिसांना उचलू न देता जमावाला भडकविण्याचे प्रयत्न केला. लोकांमध्ये पोलिसांविरुद्ध द्वेषभावना भडकावित, शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात पोलिसांनी संजयसिंह कुवरसिंह ठाकूर (४७,रा.व्यकटेंश कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.