शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

कुलगुंरूसोबत अभाविपची शाब्दिक वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:52 IST

विधी, फार्मसी व अभियांत्रिकीचे रखडलेले निकाल व एमबीए निकालात तृटीच्या कारणावरून बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संत गाडगेबाबा विद्यापीठात सायकल आंदोलन केले. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याशी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांची शाब्दिक वाद झाला.

ठळक मुद्देविद्यापीठात सायकल आंदोलन : विधी, फार्मसी, अभियांत्रिकी निकालावरून संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधी, फार्मसी व अभियांत्रिकीचे रखडलेले निकाल व एमबीए निकालात तृटीच्या कारणावरून बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संत गाडगेबाबा विद्यापीठात सायकल आंदोलन केले. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याशी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांची शाब्दिक वाद झाला.अभाविपचे विदर्भ प्रांत सहमंत्री ज्ञानेश्वर खुपसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तासभर कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचेशी अभाविपने विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी परीक्षा व मूल्यांकन विभागाचे हेमंत देशमुख, डी.टी. इंगोले, दिनेश सातंगे आदी उपस्थित होते. यावेळी यवतमाळ येथील जाजू महाविद्यालयातील एमबीए प्रथम वर्षांच्या ५० विद्यार्थ्यांपैकी ४९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले कसे? ही बाब अभाविपने कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. पेपरचे मूल्यांकन सुरळीत होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे एमबीए अभ्यासक्रमाचे पुनर्मूल्यांकनाची मागणी करण्यात आली. आॅक्टोबर ते डिसेंबर २०१८ दरम्यान झालेल्या परीक्षांचे निकाल त्वरित जाहीर करावे. विधी, अभियांत्रिकी आणि फार्मसी परीक्षांचे निकाल लावून विद्यार्थ्यांना न्याय प्रदान करावा. पुनर्मूल्यांकनात विद्यार्थी उत्तीर्ण झाला असेल तर त्याचे शुल्क परत करावे. विद्यापीठात सायकल स्टॅन्डवर शुल्क आकारू नये, वाचनालयात स्वत:चे पुस्तक नेण्याची परवानगी मिळावी, परीक्षा पद्धत व निकालातील घोळ सुधारावा आदी मागण्यांबाबत कुलगुरूंशी चर्चा केली. यावेळी दुर्गेश साठवणे, सौरभ लांडगे, श्रीराम उगले, शिवशंकर लाऊळकर, अजय इखार, रितेश बावनकर, अनिकेत इंगोले, शिवानी मोरे, दीक्षा बनसोड, सुमित राऊत, विलास शर्मा प्रज्ज्वल शेवतकर आदी अभाविपचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठ आहे. काही तांत्रिक कारणांमुळे निकालास विलंब होत असला तरी निकाल अचूक लावणे ही मोठी जबाबदारी आहे. येत्या १० दिवसांत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील. एमबीए विषयाचे प्राप्त अर्जानुसार पुनर्मूल्यांकन होईल.- मुरलीधर चांदेकर,कुलगुरू, संगाबाअ, विद्यापीठ