शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुंरूसोबत अभाविपची शाब्दिक वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:52 IST

विधी, फार्मसी व अभियांत्रिकीचे रखडलेले निकाल व एमबीए निकालात तृटीच्या कारणावरून बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संत गाडगेबाबा विद्यापीठात सायकल आंदोलन केले. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याशी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांची शाब्दिक वाद झाला.

ठळक मुद्देविद्यापीठात सायकल आंदोलन : विधी, फार्मसी, अभियांत्रिकी निकालावरून संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधी, फार्मसी व अभियांत्रिकीचे रखडलेले निकाल व एमबीए निकालात तृटीच्या कारणावरून बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संत गाडगेबाबा विद्यापीठात सायकल आंदोलन केले. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याशी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांची शाब्दिक वाद झाला.अभाविपचे विदर्भ प्रांत सहमंत्री ज्ञानेश्वर खुपसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तासभर कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचेशी अभाविपने विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी परीक्षा व मूल्यांकन विभागाचे हेमंत देशमुख, डी.टी. इंगोले, दिनेश सातंगे आदी उपस्थित होते. यावेळी यवतमाळ येथील जाजू महाविद्यालयातील एमबीए प्रथम वर्षांच्या ५० विद्यार्थ्यांपैकी ४९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले कसे? ही बाब अभाविपने कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. पेपरचे मूल्यांकन सुरळीत होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे एमबीए अभ्यासक्रमाचे पुनर्मूल्यांकनाची मागणी करण्यात आली. आॅक्टोबर ते डिसेंबर २०१८ दरम्यान झालेल्या परीक्षांचे निकाल त्वरित जाहीर करावे. विधी, अभियांत्रिकी आणि फार्मसी परीक्षांचे निकाल लावून विद्यार्थ्यांना न्याय प्रदान करावा. पुनर्मूल्यांकनात विद्यार्थी उत्तीर्ण झाला असेल तर त्याचे शुल्क परत करावे. विद्यापीठात सायकल स्टॅन्डवर शुल्क आकारू नये, वाचनालयात स्वत:चे पुस्तक नेण्याची परवानगी मिळावी, परीक्षा पद्धत व निकालातील घोळ सुधारावा आदी मागण्यांबाबत कुलगुरूंशी चर्चा केली. यावेळी दुर्गेश साठवणे, सौरभ लांडगे, श्रीराम उगले, शिवशंकर लाऊळकर, अजय इखार, रितेश बावनकर, अनिकेत इंगोले, शिवानी मोरे, दीक्षा बनसोड, सुमित राऊत, विलास शर्मा प्रज्ज्वल शेवतकर आदी अभाविपचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठ आहे. काही तांत्रिक कारणांमुळे निकालास विलंब होत असला तरी निकाल अचूक लावणे ही मोठी जबाबदारी आहे. येत्या १० दिवसांत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील. एमबीए विषयाचे प्राप्त अर्जानुसार पुनर्मूल्यांकन होईल.- मुरलीधर चांदेकर,कुलगुरू, संगाबाअ, विद्यापीठ