शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कुलगुंरूसोबत अभाविपची शाब्दिक वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:52 IST

विधी, फार्मसी व अभियांत्रिकीचे रखडलेले निकाल व एमबीए निकालात तृटीच्या कारणावरून बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संत गाडगेबाबा विद्यापीठात सायकल आंदोलन केले. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याशी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांची शाब्दिक वाद झाला.

ठळक मुद्देविद्यापीठात सायकल आंदोलन : विधी, फार्मसी, अभियांत्रिकी निकालावरून संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधी, फार्मसी व अभियांत्रिकीचे रखडलेले निकाल व एमबीए निकालात तृटीच्या कारणावरून बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संत गाडगेबाबा विद्यापीठात सायकल आंदोलन केले. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याशी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांची शाब्दिक वाद झाला.अभाविपचे विदर्भ प्रांत सहमंत्री ज्ञानेश्वर खुपसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तासभर कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचेशी अभाविपने विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी परीक्षा व मूल्यांकन विभागाचे हेमंत देशमुख, डी.टी. इंगोले, दिनेश सातंगे आदी उपस्थित होते. यावेळी यवतमाळ येथील जाजू महाविद्यालयातील एमबीए प्रथम वर्षांच्या ५० विद्यार्थ्यांपैकी ४९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले कसे? ही बाब अभाविपने कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. पेपरचे मूल्यांकन सुरळीत होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे एमबीए अभ्यासक्रमाचे पुनर्मूल्यांकनाची मागणी करण्यात आली. आॅक्टोबर ते डिसेंबर २०१८ दरम्यान झालेल्या परीक्षांचे निकाल त्वरित जाहीर करावे. विधी, अभियांत्रिकी आणि फार्मसी परीक्षांचे निकाल लावून विद्यार्थ्यांना न्याय प्रदान करावा. पुनर्मूल्यांकनात विद्यार्थी उत्तीर्ण झाला असेल तर त्याचे शुल्क परत करावे. विद्यापीठात सायकल स्टॅन्डवर शुल्क आकारू नये, वाचनालयात स्वत:चे पुस्तक नेण्याची परवानगी मिळावी, परीक्षा पद्धत व निकालातील घोळ सुधारावा आदी मागण्यांबाबत कुलगुरूंशी चर्चा केली. यावेळी दुर्गेश साठवणे, सौरभ लांडगे, श्रीराम उगले, शिवशंकर लाऊळकर, अजय इखार, रितेश बावनकर, अनिकेत इंगोले, शिवानी मोरे, दीक्षा बनसोड, सुमित राऊत, विलास शर्मा प्रज्ज्वल शेवतकर आदी अभाविपचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठ आहे. काही तांत्रिक कारणांमुळे निकालास विलंब होत असला तरी निकाल अचूक लावणे ही मोठी जबाबदारी आहे. येत्या १० दिवसांत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील. एमबीए विषयाचे प्राप्त अर्जानुसार पुनर्मूल्यांकन होईल.- मुरलीधर चांदेकर,कुलगुरू, संगाबाअ, विद्यापीठ