शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

‘आरटीआय’च्या वापराने भ्रष्टाचार थांबेल

By admin | Updated: January 25, 2016 00:20 IST

देशातील सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंतच्या सर्वच कामकाजाची, माहिती प्राप्त करुन घेण्याचा अधिकार मिळावा ...

राजेंद्र पांडे : कायद्याबाबत मार्गदर्शन शिबिरचांदूरबाजार : देशातील सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंतच्या सर्वच कामकाजाची, माहिती प्राप्त करुन घेण्याचा अधिकार मिळावा यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा संसदेने संमत केला. परंतु अजूनही या कायद्याचा वापर प्रामाणिकपणे होताना दिसत नाही. आर.टी.आय. कायद्याचा सकारात्मक वापर केला तर, विकासाला चालना मिळून भ्रष्टाचार थांबेल. एवढी शक्ती या कायद्यात आहे, असे प्रतिपादन राजेंद्र पांडे यांनी स्थानिक पंचायत समिती सभागृहात आयोजित मार्गदर्शन शिबिरात केले. यावेळी ठाणेदार सतीशसिंह राजपूत, ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार अजय आखरे व जाधव हे उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्शी पुणे यांच्यासाठी, सामाजिक न्याय विभाग अमरावती यांचेकडून घेण्यात आले होते. पांडे पुढे म्हणाले, १५ जून २००५ ला संसदेने हा कायदा संमत केला. १२ आॅक्टोबर २००५ ला लागू केला. याला नागरिकांसोबत शासकीय अधिकारी कर्मचारी ही जबाबदार आहेत. या कायद्याचे खरे महत्त्व समजून न घेता सर्वांनी त्याची अंमलबाजवणीत अडथळा निर्माण करून सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा गैरफायदाच घेतला व भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाचा प्रश्न कायमा ठेवला. खरे तर कायद्यान्वये समाजातील अपेक्षित घटकांना अधिकारी स्वरुप खूप मोठे शस्त्र प्राप्त झाले आहे. या शस्त्राचा उपयोग अन्यायाविरुध्द वापर होऊन भ्रष्टाचाराला कायम स्वरुपी मूठमाती मिळावी, असा शासनाचा मानस होता. या कायद्याचा वापर करुन भ्रष्टाचाराला थांबवून विकासाला चालना मिळण्यासाठी हा कायदा प्रत्येकांना समजून घ्यावा लागेल. या कायद्यात एकूण ३१ कलमे असून त्या कलमांमुळे आपण समाजहित व विकास कसा साधू शकतो हे नागरिकांनी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी शिकून घ्यावा लागेल. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर कायद्यासंदर्भात मार्गदर्शन शिबिर घेणे आवश्यक आहे. शिबिराचा लाभ पंचायत समिती कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतला. संचालन अर्चना सुंट, तर आभार स्मीता मोरे यांनी मानले. शिबिरासाठी गौरव अवचट, पूजा खांडेकर, पूजा गौतम यांनी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)