शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीआय’च्या वापराने भ्रष्टाचार थांबेल

By admin | Updated: January 25, 2016 00:20 IST

देशातील सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंतच्या सर्वच कामकाजाची, माहिती प्राप्त करुन घेण्याचा अधिकार मिळावा ...

राजेंद्र पांडे : कायद्याबाबत मार्गदर्शन शिबिरचांदूरबाजार : देशातील सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंतच्या सर्वच कामकाजाची, माहिती प्राप्त करुन घेण्याचा अधिकार मिळावा यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा संसदेने संमत केला. परंतु अजूनही या कायद्याचा वापर प्रामाणिकपणे होताना दिसत नाही. आर.टी.आय. कायद्याचा सकारात्मक वापर केला तर, विकासाला चालना मिळून भ्रष्टाचार थांबेल. एवढी शक्ती या कायद्यात आहे, असे प्रतिपादन राजेंद्र पांडे यांनी स्थानिक पंचायत समिती सभागृहात आयोजित मार्गदर्शन शिबिरात केले. यावेळी ठाणेदार सतीशसिंह राजपूत, ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार अजय आखरे व जाधव हे उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्शी पुणे यांच्यासाठी, सामाजिक न्याय विभाग अमरावती यांचेकडून घेण्यात आले होते. पांडे पुढे म्हणाले, १५ जून २००५ ला संसदेने हा कायदा संमत केला. १२ आॅक्टोबर २००५ ला लागू केला. याला नागरिकांसोबत शासकीय अधिकारी कर्मचारी ही जबाबदार आहेत. या कायद्याचे खरे महत्त्व समजून न घेता सर्वांनी त्याची अंमलबाजवणीत अडथळा निर्माण करून सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा गैरफायदाच घेतला व भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाचा प्रश्न कायमा ठेवला. खरे तर कायद्यान्वये समाजातील अपेक्षित घटकांना अधिकारी स्वरुप खूप मोठे शस्त्र प्राप्त झाले आहे. या शस्त्राचा उपयोग अन्यायाविरुध्द वापर होऊन भ्रष्टाचाराला कायम स्वरुपी मूठमाती मिळावी, असा शासनाचा मानस होता. या कायद्याचा वापर करुन भ्रष्टाचाराला थांबवून विकासाला चालना मिळण्यासाठी हा कायदा प्रत्येकांना समजून घ्यावा लागेल. या कायद्यात एकूण ३१ कलमे असून त्या कलमांमुळे आपण समाजहित व विकास कसा साधू शकतो हे नागरिकांनी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी शिकून घ्यावा लागेल. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर कायद्यासंदर्भात मार्गदर्शन शिबिर घेणे आवश्यक आहे. शिबिराचा लाभ पंचायत समिती कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतला. संचालन अर्चना सुंट, तर आभार स्मीता मोरे यांनी मानले. शिबिरासाठी गौरव अवचट, पूजा खांडेकर, पूजा गौतम यांनी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)