शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

‘आरटीआय’च्या वापराने भ्रष्टाचार थांबेल

By admin | Updated: January 25, 2016 00:20 IST

देशातील सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंतच्या सर्वच कामकाजाची, माहिती प्राप्त करुन घेण्याचा अधिकार मिळावा ...

राजेंद्र पांडे : कायद्याबाबत मार्गदर्शन शिबिरचांदूरबाजार : देशातील सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंतच्या सर्वच कामकाजाची, माहिती प्राप्त करुन घेण्याचा अधिकार मिळावा यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा संसदेने संमत केला. परंतु अजूनही या कायद्याचा वापर प्रामाणिकपणे होताना दिसत नाही. आर.टी.आय. कायद्याचा सकारात्मक वापर केला तर, विकासाला चालना मिळून भ्रष्टाचार थांबेल. एवढी शक्ती या कायद्यात आहे, असे प्रतिपादन राजेंद्र पांडे यांनी स्थानिक पंचायत समिती सभागृहात आयोजित मार्गदर्शन शिबिरात केले. यावेळी ठाणेदार सतीशसिंह राजपूत, ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार अजय आखरे व जाधव हे उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्शी पुणे यांच्यासाठी, सामाजिक न्याय विभाग अमरावती यांचेकडून घेण्यात आले होते. पांडे पुढे म्हणाले, १५ जून २००५ ला संसदेने हा कायदा संमत केला. १२ आॅक्टोबर २००५ ला लागू केला. याला नागरिकांसोबत शासकीय अधिकारी कर्मचारी ही जबाबदार आहेत. या कायद्याचे खरे महत्त्व समजून न घेता सर्वांनी त्याची अंमलबाजवणीत अडथळा निर्माण करून सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा गैरफायदाच घेतला व भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाचा प्रश्न कायमा ठेवला. खरे तर कायद्यान्वये समाजातील अपेक्षित घटकांना अधिकारी स्वरुप खूप मोठे शस्त्र प्राप्त झाले आहे. या शस्त्राचा उपयोग अन्यायाविरुध्द वापर होऊन भ्रष्टाचाराला कायम स्वरुपी मूठमाती मिळावी, असा शासनाचा मानस होता. या कायद्याचा वापर करुन भ्रष्टाचाराला थांबवून विकासाला चालना मिळण्यासाठी हा कायदा प्रत्येकांना समजून घ्यावा लागेल. या कायद्यात एकूण ३१ कलमे असून त्या कलमांमुळे आपण समाजहित व विकास कसा साधू शकतो हे नागरिकांनी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी शिकून घ्यावा लागेल. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर कायद्यासंदर्भात मार्गदर्शन शिबिर घेणे आवश्यक आहे. शिबिराचा लाभ पंचायत समिती कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतला. संचालन अर्चना सुंट, तर आभार स्मीता मोरे यांनी मानले. शिबिरासाठी गौरव अवचट, पूजा खांडेकर, पूजा गौतम यांनी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)