शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

कालव्याच्या कामावर रोहयोच्या मजुरांचा वापर

By admin | Updated: July 5, 2014 23:20 IST

तालुक्यातील कावरानाला सिंचन प्रकल्पाच्या टिटंबा येथील आदिवासी आश्रम शाळेसमोरील प्रलंबित कालव्याच्या खोदकाम, बांधकामाचा दीड कोटी रुपयांचा कंत्राट प्रिती बिल्डर या कंत्राटदाराच्या नावे आहे.

राजेश मालविय - धारणी तालुक्यातील कावरानाला सिंचन प्रकल्पाच्या टिटंबा येथील आदिवासी आश्रम शाळेसमोरील प्रलंबित कालव्याच्या खोदकाम, बांधकामाचा दीड कोटी रुपयांचा कंत्राट प्रिती बिल्डर या कंत्राटदाराच्या नावे आहे. मात्र, हे काम कंत्राटदाराकडून न करता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या टिटंबा येथील ३० आदिवासी मजुरांकडून एक महिन्यापासून केले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. यात कंत्राटदारासह येथील लहान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांनी पाटबंधारे खात्यालाच लाखो रुपयांचा चुना लावल्याची धक्कादायक माहिती आहे. धारणी तालुक्यातील ४० कोटी रुपयांच्या कावरा नाला सिंचन प्रकल्पाचे टिटंबा आदिवासी आश्रम शाळेसमोरील कालव्याचे खोदकाम, बांधकामाचा दीड कोटी रुपयांचा कंत्राट प्रीती बिल्डरला दोन वर्षांपूर्वी अमरावती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले. त्यांनी कालव्याचे काम अर्धवट साडून पलायन केले. तसेच दोन वर्षांपासून बंद असलेले कालव्याचे काम मागील एक महिन्यापासून टिटंबा येथीलच एमआरईजीएसच्या ३० आदिवासी, महिला पुरुषांकडून सुरु झाले. कंत्राटदाराला दिलेल्या कंत्राटी बांधकामावर कंत्राटदाराने स्वत: काम करायचे असते. तसेच शासकीय कामावर अकुशल मधून एमआरईजीएसच्या मजुरांकडून कामे करण्याचा नियम आहे. मात्र हे सर्व नियमांविरुध्द येथील लहान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता गिरी यांनी प्रिती बिल्डीर कंत्राटदाराशी हातमिळवणी करुन कालव्याची कामे एमआरईजीएसमध्ये करण्यासाठी योजना आखली. कालव्याची कामे होणार आहे हे दाखविण्यासाठी उपविभागीय अभियंत्याने लेखीपत्र काढून कामे एमआरईजीएसमध्ये करण्यासाठी आ. केवलराम काळे यांना पत्राव्दारे विनंती करण्यात आली.असा आहे नियम२५ लाख रुपयांपर्यंतच्या एमआरईजीएसच्या कामांना तहसीलदारांकडून तत्काळ मंजुरी मिळते. हीच बाब हेरुन दीड कोटींच्या कामामधून २५ लाख रुपयांचे कालव्याचे काम एमआरईजीएसमधून व्हावे यासाठी आ. केवलराम काळे यांना लेखी पत्र देऊन तहसीलदारांना शिफारशी करण्यासाठी साकडे घातले. आमदारांचे शिफारस पत्र देऊन तहसीलदारांना शिफारशीवर लवकर मंजुरी मिळते. हा उद्देश घेऊन चक्क प्रिती बिल्डरची कामे शासकीय निधीतून करण्याचा डाव उपअभियंत्याने केला आहे.याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता टिटंबा शाळेसमोरील कालव्यावर कामे करणाऱ्या मजुरांना दुसऱ्या ठिकाणच्या कालव्यातील गाळ काढणे, साफसफाई करणे या कामावर येथील पाटबंधारे विभागाच्या एमआरईजीएसच्या दफ्तरी नोंदी केल्या जात आहेत. पाटबंधारे खात्याला आदिवासी मजुरांच्या नावावर कामे करणाऱ्या अभियंता व कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.