शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

- तर कायदेशीर कारवाईसाठी पोलीस बळाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:19 IST

येथील संजय गांधीनगर क्रमांक २ हे वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित वस्ती आहे. राखीव वनजमिनीवर असलेली नागरी वस्ती हटविण्यासाठी गुरुवारी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देआरएफओंची माहिती : वरिष्ठांना पाठविणार वस्तुनिष्ठ अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: येथील संजय गांधीनगर क्रमांक २ हे वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित वस्ती आहे. राखीव वनजमिनीवर असलेली नागरी वस्ती हटविण्यासाठी गुरुवारी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सात दिवसांत घरे हटविली नाही, तर पुन्हा दोन नोटीस बजावल्या जातील. त्यानंतरच कायदेशीर कारवाईसाठी पोलीस बळाचा वापर केला जाईल. वनविभागाने यासाठी तयारी चालविली आहे.सन १९८२ पासून वनजमिनीवर मौजा वनखंड क्रमांक जुना १८६ सर्व्हे नंबर ८४, ‘क’ वर्ग राखीव वनजमिनींवर अतिक्रमण करून घरे निर्माण केल्याचे वनविभागाने नोटीसद्वारे म्हटले आहे. भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ग, ई, फ, चा भंग केल्यामुळे संजय गांधीनगरात २७९ अतिक्रमितांविरुद्ध यापूर्वीच वनगुन्हे दाखल झाले आहेत. सात दिवसांत घरे हटविण्यात यावीत, अन्यथा शासकीय बळाचा वापर करून नियमानुसार अतिक्रमण हटविली जातील, असे नोटीसमध्ये नमूद आहे. भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१ए) (बी) प्राप्त अधिकारान्वये सरकारजमा करण्याची कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा ‘अल्टिमेटम’ अतिक्रमिकांना दिला आहे. सात दिवसांत नोटीसला प्रतिसाद मिळाला नाही, तर पुन्हा तीन दिवसांच्या अवधीची नोटीस बजावण्यात येतील. त्यानंतर अंतिम इशारा म्हणून तिसरी नोटीस बजावून एक दिवसाची मुदत दिली जाईल. हा सर्व प्रशासकीय सोपस्कार आटोपताच पोलीस बळाचा वापर करून घरे उद्ध्वस्त केली जातील, अशी तयारी वनविभागाने चालविली असल्याचे वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.विधिमंडळ लोकलेखा समितीच्या निर्देशानुसार वनजमिनीं-वरील अतिक्रमण हटविले जात आहे. कारवाई रोखण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला नाहीत. परंतु अतिक्रमणसंदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल वनविभागाकडून मागविला असून तो शासनाकडे पाठविला जाईल.- अभिजित बांगरजिल्हाधिकारी, अमरावती.संजय गांधीनगर हे राखीव वनजमिनीवर अतिक्रमित नागरी वस्ती आहे. २७९ घरे हे वनजमिनीवर असल्याबाबतची वनविभागाकडे नोंद आहे. त्यानुसार अतिक्रमित धारकांना नोटीसा बजावल्या आहेत. राखीव वनजमीन खाली केली नाही, तर कायदेशीर कारवाई केली जाईल.- हेमंत मिणाउपवनसंरक्षक, अमरावती