शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

केळी पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर

By admin | Updated: April 15, 2016 00:18 IST

आंब्यासह केळी पिकविण्यासाठीही कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून कच्ची केळी मोठ्या प्रमाणात अमरावतीस विक्रीस येतात.

आरोग्य धोक्यात : अतिवापर धोकादायक, दोषींवर कारवाईची गरजसंदीप मानकर अमरावतीआंब्यासह केळी पिकविण्यासाठीही कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून कच्ची केळी मोठ्या प्रमाणात अमरावतीस विक्रीस येतात. याची महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परंतु केळी पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याने ते नागरिकांच्या आरोग्यास अतिशय हानीकारक आहे. वृध्दांसह लहान मुले केळी आनंदाने खातात. परंतु यापासून पोटात विष जातो, याची त्यांना काय माहिती? अन्न व सुरक्षा मानके कायद्यानुसार फळे पिकविताना कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणे गुन्हा आहे. परंतु नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या फळविक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने रोज नागरिकांना विष पाजले जात आहे. यामुळे घशाचे आजार होतात. तसेच कर्करोग, किडनी व लिव्हर निकामी होतात. मेंदूचे आजार, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, पोटाचे विकार आदी आजार अशा फळांच्या माध्यमातून होतात. सोमवारी 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी बाहेर तयार केलेल्या इथेलिन गॅसच्या स्प्रेचा वापर फळे पिकविण्यासाठी करण्यात येत आहे. कॅल्शियम कार्बाईडची पाण्यासोबत प्रक्रिया होऊन अ‍ॅसिटेलीन गॅस तयार होतो. त्यापासून कमी दिवसांत केळी पिकविली जातात. यामुळे आरेसनिक फॉस्फरस हायड्राईड तयार होते. यानंतर नॅचरली इथेलिन गॅस तयार होतो. या गॅसचे ३३ टक्केपेक्षा जास्त प्रमाण असेल तर ते आरोग्यासाठी घातक ठरते. हा गॅस आरटिफीशयली बाहेर तयार करून तो फळे पिकविण्यासाठी वापरता जातो. फळे विके्रत्यांकडे ठिकठिकाणी स्प्रेच्या बॉटल आढळतात. ते कॅमेराबंद झाले आहे. परंतु त्या बॉटलमध्ये पाणी असल्याचे उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. हा जीवघेणा प्रकार अंबानगरीत होत असताना अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी गप्प का, असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांमध्येही या संदर्भाची जनजागृती होत नाही. त्यामुळे एरवी फळांतून व्हिटॅमीन अ, ब, क स्तर मिळतात. त्यासाठी आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात विविध फळे व केळी नागरिक महागड्या दरात विकत घेतात. परंतु या चविष्ट केळीसोबत आपल्याला विष विकले जात असल्याची त्यांना कल्पनाही नसेल. फळे व केळी पिकविण्यासाठी करण्यात आलेल्या कार्बाईड व इथेलिनचा वापर अतिशय घातक असून ते मानवी आरोग्याला अपायकारक असल्याचे मत रसायनशास्त्रज्ज्ञ अमोल डोले यांनी व्यक्त केले. अन्न विभाग झोपेतच ! लोकांच्या आरोग्याच्या चिंधळ्या उडविले जात आहे. मात्र ज्या अन्न प्रशासन विभागाकडे कारवाई करण्याचा अधिकार आहे व त्यांच्यावर यासंदर्भाचे नियंत्रण आहे. तो विभाग गप्प का, असा सवाल अंबानगरीची जनता विचारत आहे. अन्न प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी झोपेतच असल्याची चर्चा आहे. त्यांनी फळे विक्रेत्यांचे परवाने तपासून धाडी टाकून केळी व इतर फळांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणे गरजेचे आहे. म्हणजे सर्व सत्य बाहेर निघेल.कॅल्शियम कार्बाईडचा वापर हा केळी पिकविण्यासाठी करणे अतिशय घातक आहे. तसेच इथेलीन गॅसचा वापर हा ३३ टक्क्यांपेक्षा अधिक होत असेल तर ते आरोग्यासाठी हानीकारक आहे. - अमोल डोले,रसायनशास्त्रज्ञ, दर्यापूरइथेलीन गॅसचा वापर करणाऱ्यावर बंदी नाही. पण ३३ टक्क्यांपेक्षा अधिक वापर होतो का, हे तपासावे लागेल. मात्र कार्बाईडचा फळे पिकविण्यासाठी वापर होत असेल तर अशा ठिकाणी धाडी टाकण्यात येतील. - मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त, अन्न व प्रशासन विभाग