शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

केळी पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर

By admin | Updated: April 15, 2016 00:18 IST

आंब्यासह केळी पिकविण्यासाठीही कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून कच्ची केळी मोठ्या प्रमाणात अमरावतीस विक्रीस येतात.

आरोग्य धोक्यात : अतिवापर धोकादायक, दोषींवर कारवाईची गरजसंदीप मानकर अमरावतीआंब्यासह केळी पिकविण्यासाठीही कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून कच्ची केळी मोठ्या प्रमाणात अमरावतीस विक्रीस येतात. याची महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परंतु केळी पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याने ते नागरिकांच्या आरोग्यास अतिशय हानीकारक आहे. वृध्दांसह लहान मुले केळी आनंदाने खातात. परंतु यापासून पोटात विष जातो, याची त्यांना काय माहिती? अन्न व सुरक्षा मानके कायद्यानुसार फळे पिकविताना कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणे गुन्हा आहे. परंतु नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या फळविक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने रोज नागरिकांना विष पाजले जात आहे. यामुळे घशाचे आजार होतात. तसेच कर्करोग, किडनी व लिव्हर निकामी होतात. मेंदूचे आजार, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, पोटाचे विकार आदी आजार अशा फळांच्या माध्यमातून होतात. सोमवारी 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी बाहेर तयार केलेल्या इथेलिन गॅसच्या स्प्रेचा वापर फळे पिकविण्यासाठी करण्यात येत आहे. कॅल्शियम कार्बाईडची पाण्यासोबत प्रक्रिया होऊन अ‍ॅसिटेलीन गॅस तयार होतो. त्यापासून कमी दिवसांत केळी पिकविली जातात. यामुळे आरेसनिक फॉस्फरस हायड्राईड तयार होते. यानंतर नॅचरली इथेलिन गॅस तयार होतो. या गॅसचे ३३ टक्केपेक्षा जास्त प्रमाण असेल तर ते आरोग्यासाठी घातक ठरते. हा गॅस आरटिफीशयली बाहेर तयार करून तो फळे पिकविण्यासाठी वापरता जातो. फळे विके्रत्यांकडे ठिकठिकाणी स्प्रेच्या बॉटल आढळतात. ते कॅमेराबंद झाले आहे. परंतु त्या बॉटलमध्ये पाणी असल्याचे उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. हा जीवघेणा प्रकार अंबानगरीत होत असताना अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी गप्प का, असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांमध्येही या संदर्भाची जनजागृती होत नाही. त्यामुळे एरवी फळांतून व्हिटॅमीन अ, ब, क स्तर मिळतात. त्यासाठी आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात विविध फळे व केळी नागरिक महागड्या दरात विकत घेतात. परंतु या चविष्ट केळीसोबत आपल्याला विष विकले जात असल्याची त्यांना कल्पनाही नसेल. फळे व केळी पिकविण्यासाठी करण्यात आलेल्या कार्बाईड व इथेलिनचा वापर अतिशय घातक असून ते मानवी आरोग्याला अपायकारक असल्याचे मत रसायनशास्त्रज्ज्ञ अमोल डोले यांनी व्यक्त केले. अन्न विभाग झोपेतच ! लोकांच्या आरोग्याच्या चिंधळ्या उडविले जात आहे. मात्र ज्या अन्न प्रशासन विभागाकडे कारवाई करण्याचा अधिकार आहे व त्यांच्यावर यासंदर्भाचे नियंत्रण आहे. तो विभाग गप्प का, असा सवाल अंबानगरीची जनता विचारत आहे. अन्न प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी झोपेतच असल्याची चर्चा आहे. त्यांनी फळे विक्रेत्यांचे परवाने तपासून धाडी टाकून केळी व इतर फळांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणे गरजेचे आहे. म्हणजे सर्व सत्य बाहेर निघेल.कॅल्शियम कार्बाईडचा वापर हा केळी पिकविण्यासाठी करणे अतिशय घातक आहे. तसेच इथेलीन गॅसचा वापर हा ३३ टक्क्यांपेक्षा अधिक होत असेल तर ते आरोग्यासाठी हानीकारक आहे. - अमोल डोले,रसायनशास्त्रज्ञ, दर्यापूरइथेलीन गॅसचा वापर करणाऱ्यावर बंदी नाही. पण ३३ टक्क्यांपेक्षा अधिक वापर होतो का, हे तपासावे लागेल. मात्र कार्बाईडचा फळे पिकविण्यासाठी वापर होत असेल तर अशा ठिकाणी धाडी टाकण्यात येतील. - मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त, अन्न व प्रशासन विभाग