शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

गाळात रुतले अप्पर वर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:50 IST

जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेले अप्पर वर्धा धरण गाळात रुतून बसले आहे. या धरणातील उपयुक्त जलसाठा २२ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने भर उन्हाळ्यात हे धरण कोरडे पडण्याची दुश्चिन्हे आहेत.

ठळक मुद्देकेवळ २२ टक्के जलसाठा : धरण गाळमुक्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेले अप्पर वर्धा धरण गाळात रुतून बसले आहे. या धरणातील उपयुक्त जलसाठा २२ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने भर उन्हाळ्यात हे धरण कोरडे पडण्याची दुश्चिन्हे आहेत. त्यामुळे या धरणातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. धरणातील अल्प जलसाठ्यामुळे एकीकडे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असताना, तालुक्यातील अनेक गावांवर पाणीसंकट कोसळले आहे.अप्पर वर्धा प्रकल्पाची एकूण प्रकल्पीय क्षमता ६७८.२७ दशलक्ष घनमीटर असून, तूर्तास धरणात २३८.४६ दलघमी पाणी असले तरी त्यापैकी केवळ १२४.२४ ( २२ टक्के) जलसाठा पिण्यासाठी उपयुक्त आहे. उपयुक्त जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने गाळ काढण्याची व खोलीकरणाची मागणी समोर आली आहे. मोर्शी तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस कोसळल्याने पाण्याची पातळी खोल गेली. भूजलाचा बेसुमार उपसा झाल्याने भूगर्भाची चाळण झाली. विहिरी, बोअर आटल्या. त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या संत्राबागा टँकरच्या पाण्यावर जगवित आहेत. अप्पर वर्धा धरणातून ७० गावांना पाणीपुरवठा केला जातो. अमरावती व मोर्शीकरांची तहानसुद्धा याच धरणाच्या पाण्याने भागविली जाते. मात्र, गेल्या दोन महिन्यात अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे मोर्शी-अमरावतीकरांवर पाणी कपातीची वेळ येऊन ठेपणार आहे.धरणाच्या खोलीकरणाची कामे तातडीने व्हावीअप्पर वर्धा जलाशय हे मोर्शी व अमरावतीकरांची तृष्णा भागविण्यासाठी उपयुक्त आहे. इतरत्र पाणी टंचाई असताना या धरणाने मात्र कधीही धोका दिला नाही. यावर्षी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने सध्या अप्पर वर्धा धरणात केवळ २२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे गाळमुक्त धरण -गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत अप्पर वर्धा धरणातील गाळ काढण्यात येऊन पाणी साठवण्याच्या दृष्टीने धरणाचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी विदर्भ ग्राहक संरक्षण संघटनेचे अध्यक्ष डॉ. आनंद घोंगडे, सचिव प्रमोद राऊत व सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.