शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

गाळात रुतले अप्पर वर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:50 IST

जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेले अप्पर वर्धा धरण गाळात रुतून बसले आहे. या धरणातील उपयुक्त जलसाठा २२ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने भर उन्हाळ्यात हे धरण कोरडे पडण्याची दुश्चिन्हे आहेत.

ठळक मुद्देकेवळ २२ टक्के जलसाठा : धरण गाळमुक्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेले अप्पर वर्धा धरण गाळात रुतून बसले आहे. या धरणातील उपयुक्त जलसाठा २२ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने भर उन्हाळ्यात हे धरण कोरडे पडण्याची दुश्चिन्हे आहेत. त्यामुळे या धरणातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. धरणातील अल्प जलसाठ्यामुळे एकीकडे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असताना, तालुक्यातील अनेक गावांवर पाणीसंकट कोसळले आहे.अप्पर वर्धा प्रकल्पाची एकूण प्रकल्पीय क्षमता ६७८.२७ दशलक्ष घनमीटर असून, तूर्तास धरणात २३८.४६ दलघमी पाणी असले तरी त्यापैकी केवळ १२४.२४ ( २२ टक्के) जलसाठा पिण्यासाठी उपयुक्त आहे. उपयुक्त जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने गाळ काढण्याची व खोलीकरणाची मागणी समोर आली आहे. मोर्शी तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस कोसळल्याने पाण्याची पातळी खोल गेली. भूजलाचा बेसुमार उपसा झाल्याने भूगर्भाची चाळण झाली. विहिरी, बोअर आटल्या. त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या संत्राबागा टँकरच्या पाण्यावर जगवित आहेत. अप्पर वर्धा धरणातून ७० गावांना पाणीपुरवठा केला जातो. अमरावती व मोर्शीकरांची तहानसुद्धा याच धरणाच्या पाण्याने भागविली जाते. मात्र, गेल्या दोन महिन्यात अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे मोर्शी-अमरावतीकरांवर पाणी कपातीची वेळ येऊन ठेपणार आहे.धरणाच्या खोलीकरणाची कामे तातडीने व्हावीअप्पर वर्धा जलाशय हे मोर्शी व अमरावतीकरांची तृष्णा भागविण्यासाठी उपयुक्त आहे. इतरत्र पाणी टंचाई असताना या धरणाने मात्र कधीही धोका दिला नाही. यावर्षी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने सध्या अप्पर वर्धा धरणात केवळ २२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे गाळमुक्त धरण -गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत अप्पर वर्धा धरणातील गाळ काढण्यात येऊन पाणी साठवण्याच्या दृष्टीने धरणाचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी विदर्भ ग्राहक संरक्षण संघटनेचे अध्यक्ष डॉ. आनंद घोंगडे, सचिव प्रमोद राऊत व सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.