शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

अप्पर वर्धा ओव्हरफ्लो तीन दारे उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:53 IST

गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाची पातळी अत्यंत खालावली होती. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे सावट पसरले होते. परंतु धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी धरणात ९९ टक्के जलसंचय झाल्याची नोंद घेण्यात आली. तत्पूर्वी मोर्शी, चांदूर रेल्वे, तिवसा व आर्वी या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे तीन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देपर्यटकांची गर्दी : वर्धा नदीपात्रात पाणी सोडले

गोपाल डाहाके ।लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ९ सप्टेंबर रोजी अप्पर वर्धा धरणाने कमाल पातळी गाठल्याने पाटबंधारे विभागाने धरणाचे तीन दारे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे तीन दारे प्रत्येकी १० सेंटिमिटरने उघडण्यात आली. अप्पर वर्धा प्रकल्पात ९९.३८ टक्के जलसंचय झाल्यानंतर स्थानिकांसह पर्यटकांनाही धरणाची दारी उघडण्याची प्रतीक्षा होती. सोमवारी दारे उघडणार, अशी माहिती समाजमाध्यमांमध्ये 'व्हायरल' होताच अनेकांनी धरणस्थळ गाठून पांढऱ्या शुभ्र धबधब्यासमान पाण्याच्या मनसोक्त आनंद घेतला.गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाची पातळी अत्यंत खालावली होती. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे सावट पसरले होते. परंतु धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी धरणात ९९ टक्के जलसंचय झाल्याची नोंद घेण्यात आली. तत्पूर्वी मोर्शी, चांदूर रेल्वे, तिवसा व आर्वी या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे तीन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.सोमवारी सकाळी धरणातील जलसंचय ३४२.५० मीटर झाल्याने कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दारे उघडण्याचे आदेश दिले. अप्पर वर्धा धरणाला १३ वक्र दरवाजे असून पहिले, सातवे व तेरावे दार दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक म्हणजेच येवा १२५ क्युसेक असून तीन दारे प्रत्येकी १० सेमीने उघडल्याने ५० घन मीटर प्रतिसेकंदने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारी सकाळी धरणाची दारे उघडण्यासाठी कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे, उपविभागीय अभियंता पी.डी. सोळंके, एम. एल. शेंडे, शाखा अभियंता जी. व्ही. साने व पी. व्ही. कडू यांनी धरणातील पाण्याचे पूजन करून तीन दारे उघडली. पाण्याची आवक बघता ही स्थिती सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल उंबरकर, दत्तू फंदे, उमेश शिंदे हे अधिकारी, कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. धरणाचे उघडलेल्या दारांतून होत असलेला पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी व तुषारांनी चिंब होण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.जून-जुलैमध्ये अप्पर वर्धा प्रकल्पातील जलसाठा ११ टक्क्यांपर्यंत खाली आली होता. त्यामुळे कधीकाळी पाण्याखाली बुडालेली गावे प्रथमच उघडी पडली होती. मोर्शी तालुक्यात अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली होती. सिंचनाकरिता पाणी नसल्याने अनेक संत्राबागा सुकल्या होत्या. तालुक्यातील काही गावांत १५ ते २० दिवसांनी पाणीपुरवठा केला जात होता. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही अप्पर वर्धा धरणात केवळ ४० टक्केच पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, आॅगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे अप्पर वर्धा धरण क्षेत्रातील वर्धा, जाम, माडू, नळा, दमयंती नदींना महापूर आले. यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याच्या साठ्यात दररोज वाढ होत होती. ४ सप्टेंबर रोजी दमयंती व नळा नदीच्या आलेल्या महापुराने अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली होती.

टॅग्स :floodपूर