शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अप्पर वर्धा ओव्हरफ्लो तीन दारे उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:53 IST

गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाची पातळी अत्यंत खालावली होती. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे सावट पसरले होते. परंतु धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी धरणात ९९ टक्के जलसंचय झाल्याची नोंद घेण्यात आली. तत्पूर्वी मोर्शी, चांदूर रेल्वे, तिवसा व आर्वी या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे तीन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देपर्यटकांची गर्दी : वर्धा नदीपात्रात पाणी सोडले

गोपाल डाहाके ।लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ९ सप्टेंबर रोजी अप्पर वर्धा धरणाने कमाल पातळी गाठल्याने पाटबंधारे विभागाने धरणाचे तीन दारे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे तीन दारे प्रत्येकी १० सेंटिमिटरने उघडण्यात आली. अप्पर वर्धा प्रकल्पात ९९.३८ टक्के जलसंचय झाल्यानंतर स्थानिकांसह पर्यटकांनाही धरणाची दारी उघडण्याची प्रतीक्षा होती. सोमवारी दारे उघडणार, अशी माहिती समाजमाध्यमांमध्ये 'व्हायरल' होताच अनेकांनी धरणस्थळ गाठून पांढऱ्या शुभ्र धबधब्यासमान पाण्याच्या मनसोक्त आनंद घेतला.गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाची पातळी अत्यंत खालावली होती. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे सावट पसरले होते. परंतु धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी धरणात ९९ टक्के जलसंचय झाल्याची नोंद घेण्यात आली. तत्पूर्वी मोर्शी, चांदूर रेल्वे, तिवसा व आर्वी या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे तीन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.सोमवारी सकाळी धरणातील जलसंचय ३४२.५० मीटर झाल्याने कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दारे उघडण्याचे आदेश दिले. अप्पर वर्धा धरणाला १३ वक्र दरवाजे असून पहिले, सातवे व तेरावे दार दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक म्हणजेच येवा १२५ क्युसेक असून तीन दारे प्रत्येकी १० सेमीने उघडल्याने ५० घन मीटर प्रतिसेकंदने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारी सकाळी धरणाची दारे उघडण्यासाठी कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे, उपविभागीय अभियंता पी.डी. सोळंके, एम. एल. शेंडे, शाखा अभियंता जी. व्ही. साने व पी. व्ही. कडू यांनी धरणातील पाण्याचे पूजन करून तीन दारे उघडली. पाण्याची आवक बघता ही स्थिती सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल उंबरकर, दत्तू फंदे, उमेश शिंदे हे अधिकारी, कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. धरणाचे उघडलेल्या दारांतून होत असलेला पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी व तुषारांनी चिंब होण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.जून-जुलैमध्ये अप्पर वर्धा प्रकल्पातील जलसाठा ११ टक्क्यांपर्यंत खाली आली होता. त्यामुळे कधीकाळी पाण्याखाली बुडालेली गावे प्रथमच उघडी पडली होती. मोर्शी तालुक्यात अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली होती. सिंचनाकरिता पाणी नसल्याने अनेक संत्राबागा सुकल्या होत्या. तालुक्यातील काही गावांत १५ ते २० दिवसांनी पाणीपुरवठा केला जात होता. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही अप्पर वर्धा धरणात केवळ ४० टक्केच पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, आॅगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे अप्पर वर्धा धरण क्षेत्रातील वर्धा, जाम, माडू, नळा, दमयंती नदींना महापूर आले. यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याच्या साठ्यात दररोज वाढ होत होती. ४ सप्टेंबर रोजी दमयंती व नळा नदीच्या आलेल्या महापुराने अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली होती.

टॅग्स :floodपूर