शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

अप्पर वर्धा ओव्हरफ्लो तीन दारे उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:53 IST

गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाची पातळी अत्यंत खालावली होती. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे सावट पसरले होते. परंतु धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी धरणात ९९ टक्के जलसंचय झाल्याची नोंद घेण्यात आली. तत्पूर्वी मोर्शी, चांदूर रेल्वे, तिवसा व आर्वी या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे तीन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देपर्यटकांची गर्दी : वर्धा नदीपात्रात पाणी सोडले

गोपाल डाहाके ।लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ९ सप्टेंबर रोजी अप्पर वर्धा धरणाने कमाल पातळी गाठल्याने पाटबंधारे विभागाने धरणाचे तीन दारे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे तीन दारे प्रत्येकी १० सेंटिमिटरने उघडण्यात आली. अप्पर वर्धा प्रकल्पात ९९.३८ टक्के जलसंचय झाल्यानंतर स्थानिकांसह पर्यटकांनाही धरणाची दारी उघडण्याची प्रतीक्षा होती. सोमवारी दारे उघडणार, अशी माहिती समाजमाध्यमांमध्ये 'व्हायरल' होताच अनेकांनी धरणस्थळ गाठून पांढऱ्या शुभ्र धबधब्यासमान पाण्याच्या मनसोक्त आनंद घेतला.गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाची पातळी अत्यंत खालावली होती. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे सावट पसरले होते. परंतु धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी धरणात ९९ टक्के जलसंचय झाल्याची नोंद घेण्यात आली. तत्पूर्वी मोर्शी, चांदूर रेल्वे, तिवसा व आर्वी या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे तीन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.सोमवारी सकाळी धरणातील जलसंचय ३४२.५० मीटर झाल्याने कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दारे उघडण्याचे आदेश दिले. अप्पर वर्धा धरणाला १३ वक्र दरवाजे असून पहिले, सातवे व तेरावे दार दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक म्हणजेच येवा १२५ क्युसेक असून तीन दारे प्रत्येकी १० सेमीने उघडल्याने ५० घन मीटर प्रतिसेकंदने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारी सकाळी धरणाची दारे उघडण्यासाठी कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे, उपविभागीय अभियंता पी.डी. सोळंके, एम. एल. शेंडे, शाखा अभियंता जी. व्ही. साने व पी. व्ही. कडू यांनी धरणातील पाण्याचे पूजन करून तीन दारे उघडली. पाण्याची आवक बघता ही स्थिती सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल उंबरकर, दत्तू फंदे, उमेश शिंदे हे अधिकारी, कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. धरणाचे उघडलेल्या दारांतून होत असलेला पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी व तुषारांनी चिंब होण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.जून-जुलैमध्ये अप्पर वर्धा प्रकल्पातील जलसाठा ११ टक्क्यांपर्यंत खाली आली होता. त्यामुळे कधीकाळी पाण्याखाली बुडालेली गावे प्रथमच उघडी पडली होती. मोर्शी तालुक्यात अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली होती. सिंचनाकरिता पाणी नसल्याने अनेक संत्राबागा सुकल्या होत्या. तालुक्यातील काही गावांत १५ ते २० दिवसांनी पाणीपुरवठा केला जात होता. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही अप्पर वर्धा धरणात केवळ ४० टक्केच पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, आॅगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे अप्पर वर्धा धरण क्षेत्रातील वर्धा, जाम, माडू, नळा, दमयंती नदींना महापूर आले. यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याच्या साठ्यात दररोज वाढ होत होती. ४ सप्टेंबर रोजी दमयंती व नळा नदीच्या आलेल्या महापुराने अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली होती.

टॅग्स :floodपूर