शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

अवकाळीचे नुकसान, २.९१ कोटींचे अनुदान मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST

अमरावती : ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हवामानबदल होऊन जिल्ह्यात १६ व १७ मे रोजी वादळी पाऊस झाला. यात काही तालुक्यात ...

अमरावती : ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हवामानबदल होऊन जिल्ह्यात १६ व १७ मे रोजी वादळी पाऊस झाला. यात काही तालुक्यात घरांच्या पडझडीसह फळपिकांचे नुकसान व गुरे दगावली होती. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी मदतनिधीची मागणी शासनाकडे केली होती. आता बुधवारी एसडीआरएफच्या अनुदानाचा शासनादेश काढण्यात आला. या नुकसानीसाठी जिल्ह्याला वाढीव दराने २ कोटी ९१ लाख २१ हजारांची मदत येत्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.

यामध्ये ५९६ घरांचे अंशत: नुकसान झाले. याकरिता प्रतिकुटुंब ५ हजार रुपये कपड्यांच्या मदतीसाठी व ५ हजार रुपये घरगुती भांडीकरिता मिळणार आहे. याकरिता ५९.६० लाख मंजूर करण्यात आले. पूर्णत: क्षतीग्रस्त झालेल्या ३३ घरांसाठी २.३० लाख, पूर्णत: पडझड झालेल्या ३३ घरांसाठी ४९.५१ लाखांचे अनुदान मिळणार आहे.

अमरावती तालुक्यात दोन व्यक्तींना दुखापत झाली यात २६ हजार, जिल्ह्यात १९४.७५ हेक्टरचे नुकसान झाले. यात जिरायती क्षेत्रात ११४ शेतकऱ्यांचे ८४.८२ हेक्टरकरिता १३,५०० रुपये, दोन हेक्टरच्या मर्यादेत ११.४६ लाख, बहुवार्षिक पिकांचे १०९ हेक्टरमध्ये २२९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यासाठी १८ हजार रुपये हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत १९.७८ लाख व एसडीआरएफचे ३५.१८ लाखांचे अनुदान देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास केली होती. त्यानुसार आता २.९१ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले.

बॉक्स

३३ निराधार कुटुंबांना १३.३९ लाख

या वादळामुळे वरूड व चांदूर बाजार तालुक्यातील ३३ कुटुंबे निराधार झालीत. या परिवारांना ३३० किलो गहू, ३३० किलो तांदूळ व ९.३४ कोटींचे अनुदान असे एकूण १३.३९ लाखांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली. यानुसार आता मदत देय राहणार आहे. साधारणत: पुढच्या आठवड्यात हा निधी विभागीय आयुक्तांना प्राप्त होईल. त्यानंतर जिल्ह्याला अनुदान वितरित करण्यात येईल.