शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST

फोटो पी २३ अंजनगाव बारी अंजनगाव बारी : चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी पावसामुळे गहू, कांदा ही प्रमुख ...

फोटो पी २३ अंजनगाव बारी

अंजनगाव बारी : चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी पावसामुळे गहू, कांदा ही प्रमुख रबी पिके जमिनीशी समांतर झाल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे तसेच पालेभाज्या अवकाळी पावसामुळे सडल्या. वादळामुळे संत्रा, मोसंबी, लिंबू आदी झाडे कोसळून पडली आहेत.

अंजनगाव बारी परिसरात गारपीट झाल्याने कांदा, गहू हे पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यावर्षी ६० टक्के गहू शेतकऱ्यांच्या घरी आला. मात्र, ४० टक्के पीक अद्यापही शेतात पडून आहे. पावसाचे पाणी शिरून गव्हाच्या पेंड्या सडत आहेत. पपई, आंब्याची झाडे वादळाने झाडासह कोसळून पडली आहेत. शेतकरी उत्पन्न वाढविण्यासाठी फळपिकांकडे वळले असताना, आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, पेरू, लिंबू, डाळिंब ही फळपिके मातीमोल झाल्याने यंदा मुद्दल निघेल, याचीही शाश्वती नाही. परिसरात १० ते १५ गावांतील पार्डी (देवी), अडगाव (बु.), मांजरी म्हसला, उतखेड, टिमटाळा, मालखेड (रेल्वे), आमला (विश्वेश्वर), मांजरखेड (कसबा), बासलापूर येथेही वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे गहू, कांदा, संत्रा, हरभरा पिकांना फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.

३०० वीटभट्ट्यांचे नुकसान

अंजनगाव बारी परिसरात ३०० वीट कारखानदार आहेत. अवकाळी पावसामुळे तयार झालेला ७० ते ८० लाखांचा कच्चा माल वाया गेला आहे. लावलेल्या भट्टीतील प्रत्येक कारखानदाराचा एक ते दीड लाख एवढा माल निरुपयोगी झाला आहे. हा माल झाकलेला असतानाही उपलब्ध सामग्री फाटल्याने व उडाल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मजुरांची घरावरील टिनाची छपरे उडाल्याने संपूर्ण मजूर गावी निघून गेली. परिणामी वीटभट्ट्यांचा परिसर ओस पडला आहे.

बॉक्स

पोर्टलवर नोंदवा माहिती

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपले नाव व शेत सर्वे नंबर गावातील तलाठी किंवा कृषी सहायक यांच्याकडे द्यावे, असे आदेश कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत. नुुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत ही माहिती विमा कंपनीच्या पोर्टलवर नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.