शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य मार्गावर बेशिस्त हातगाड्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:17 IST

वाहतुकीची कोंडी, अपघात नित्याचेच, पोलीस व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष चांदूर बाजार : शहरातील जयस्तंभ चौक ते बस स्टँड या ...

वाहतुकीची कोंडी, अपघात नित्याचेच, पोलीस व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदूर बाजार : शहरातील जयस्तंभ चौक ते बस स्टँड या मुख्य मार्गावर फळविक्रेत्यांची हातगाड्या रस्त्यावर उभे राहत असल्याने या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठी रांग लागलेली असते. याकडे पोलीस व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शहरातील व्यवसाय बंद अवस्थेत होते. केवळ भाजीपाला फळ व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होते. अशात रोजगार निर्मिती करण्यासाठी अनेकांनी आपला व्यवसाय बंद करून फळ, भाजीपाला विक्री सुरू केली. यामुळे शहरातील भाजीपाला व फळविक्रेत्यांची दुकानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. बाजारपेठ बंद असल्याने या हातगाड्या मनात येईल तिथे उभे करून व्यवसाय थाटू लागल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशात संपूर्ण बाजारपेठ पूर्वपदावर आली असताना या फळविक्रेत्यांच्या हातगाड्या अद्यापही कमी झालेल्या नाहीत. पूर्वी या हातगाड्या फुटपाथच्या कडेवर अथवा पालिकेचा फुटपाथवर उभ्या असायच्या. मात्र, आता या हातगाड्या फुटपाथला सोडून जवळजवळ दहा फूट पुढे रस्त्यावर उभे राहून व्यवसाय करीत आहेत. यामुळे दुचाकीचालकांना व पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वाहतुकीच्या कोंडीत भर

मार्गावर बँक, मोठे व्यापारी व लघु व्यापारी ग्राहकांकडून वाहने रस्त्यावर उभे केली जात आहेत. यामुळे वाहतूककोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातच शहरातील चौकात वाहतूक पोलीस कधीच तैनात नसतात, तर पालिकेचे कर्मचारीसुद्धा याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करतात. पालिकेला रिक्त जागांचे ग्रहण लागले असल्याने या दिवसेंदिवस वाढत असलेल्या अतिक्रमणावर व बेशिस्त भरणाऱ्या बाजारपेठेवर लक्ष ठेवणार कोण, असा प्रश्न सामान्य नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे. या मार्गावरून वाहतूक करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

--------------

अपघात नित्याचेच

आधीच हा रस्ता चौपदरी असतानाही एका वेळी केवळ एकच वाहन या रस्त्यावरून जाऊ शकते. त्यामुळे वाहनांची धडक व अपघात या मार्गावर नित्याचेच झाले असून वाहतुकीच्या कोंडीने स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे झाले आहे.