शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

मुख्य मार्गावर बेशिस्त हातगाड्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:17 IST

वाहतुकीची कोंडी, अपघात नित्याचेच, पोलीस व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष चांदूर बाजार : शहरातील जयस्तंभ चौक ते बस स्टँड या ...

वाहतुकीची कोंडी, अपघात नित्याचेच, पोलीस व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदूर बाजार : शहरातील जयस्तंभ चौक ते बस स्टँड या मुख्य मार्गावर फळविक्रेत्यांची हातगाड्या रस्त्यावर उभे राहत असल्याने या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठी रांग लागलेली असते. याकडे पोलीस व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शहरातील व्यवसाय बंद अवस्थेत होते. केवळ भाजीपाला फळ व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होते. अशात रोजगार निर्मिती करण्यासाठी अनेकांनी आपला व्यवसाय बंद करून फळ, भाजीपाला विक्री सुरू केली. यामुळे शहरातील भाजीपाला व फळविक्रेत्यांची दुकानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. बाजारपेठ बंद असल्याने या हातगाड्या मनात येईल तिथे उभे करून व्यवसाय थाटू लागल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशात संपूर्ण बाजारपेठ पूर्वपदावर आली असताना या फळविक्रेत्यांच्या हातगाड्या अद्यापही कमी झालेल्या नाहीत. पूर्वी या हातगाड्या फुटपाथच्या कडेवर अथवा पालिकेचा फुटपाथवर उभ्या असायच्या. मात्र, आता या हातगाड्या फुटपाथला सोडून जवळजवळ दहा फूट पुढे रस्त्यावर उभे राहून व्यवसाय करीत आहेत. यामुळे दुचाकीचालकांना व पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वाहतुकीच्या कोंडीत भर

मार्गावर बँक, मोठे व्यापारी व लघु व्यापारी ग्राहकांकडून वाहने रस्त्यावर उभे केली जात आहेत. यामुळे वाहतूककोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातच शहरातील चौकात वाहतूक पोलीस कधीच तैनात नसतात, तर पालिकेचे कर्मचारीसुद्धा याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करतात. पालिकेला रिक्त जागांचे ग्रहण लागले असल्याने या दिवसेंदिवस वाढत असलेल्या अतिक्रमणावर व बेशिस्त भरणाऱ्या बाजारपेठेवर लक्ष ठेवणार कोण, असा प्रश्न सामान्य नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे. या मार्गावरून वाहतूक करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

--------------

अपघात नित्याचेच

आधीच हा रस्ता चौपदरी असतानाही एका वेळी केवळ एकच वाहन या रस्त्यावरून जाऊ शकते. त्यामुळे वाहनांची धडक व अपघात या मार्गावर नित्याचेच झाले असून वाहतुकीच्या कोंडीने स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे झाले आहे.