शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन स्थगित

By admin | Updated: June 17, 2016 00:16 IST

गत सोळा दिवसांपासून सुरू असलेले विनाअनुदानित शिक्षकांचे उपोषण गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या मध्यस्थीने सुटले.

राज्यमंत्री रणजित पाटील यांची मध्यस्थी : १६ दिवसांपासूनचे आंदोलन मागेअमरावती : गत सोळा दिवसांपासून सुरू असलेले विनाअनुदानित शिक्षकांचे उपोषण गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या मध्यस्थीने सुटले. अघोषित शाळा घोषित करण्याची प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करू, अशी ग्वाही पाटील यांनी दिल्यानंतर राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीने हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा केली. यावेळी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांचीही उपस्थिती होती. गुरुवारी सकाळच्या सुमारास ना. पाटील यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय गाठून कृती समितीचे विभागीय अध्यक्ष एस. के. वाहुरवाघ यांच्यासह आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या नेत्यांशी चर्चा केली. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, शिक्षण संघर्ष समितीच्या संगीता शिंदे, राज्य संघटक पुंडलिक रहाटे यांचेशी चर्चा करत शिक्षकांच्या मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. अघोषित शाळांना घोषित करण्यासाठी ना. पाटील यांनी एक महिन्याचा अवधी मागून घेतला. यावेळी खोडके यांनी एक तास थांबवून निर्णय देण्याची सूचना केली. मात्र कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपोषण सोडण्याबाबत एकवाक्यता दिसून आली नाही. त्यावेळी ना. पाटील यांनी विना अनुदानित शाळा कृती समितीच्या जगदाळे यांच्याशी संपर्क साधून उपोषण सोडवण्यासाठी आपण उपोषणस्थळी आलो आहोत. सरकारनेही अनुदानाबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. अघोषित शाळांचा प्रश्न एक महिन्यात निकाली काढू, असे सांगितले. त्यावर जगदाळे यांनी विभागीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उपोषण थांबविण्याची सूचना केली. त्यानंतर निंबू शरबत पाजून उपोषण सोडण्यात आले. दरम्यान यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके आणि ना. पाटील यांच्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली. मात्र त्यानंतर वातावरण निवळले. (प्रतिनिधी)आंदोलनाचे विविध टप्पेविनाअनुदानित शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष सुरेश सिरसाट, संघटक बाळकृष्ण गावंडे, गोपाल चव्हाण, मनोज कडू, नितीन टाले, मोहन पांडे, दिलीप उगले यांच्यासह शिक्षकांच्या या आंदोलनाला विविध संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. संजय खोडके व शेखर भोयर हे पहिल्याच दिवसापासून या आंदोलनात सक्रिय होते. तेरवी, रास्ता रोको, मुंडन आदी टप्पानिहाय आंदोलन करून शिक्षकांनी शासनाचे लक्ष वेधले.एकवाक्यतेचा अभावकृती समितीतील काही पदाधिकारी उपोषण सुरूच ठेवण्याच्या मानसिकतेत होते तर काहींचा त्याला जोरकस विरोध होता. सर्वसामान्य शिक्षण उपोषण सुरूच ठेवणार, अशा भूमिकेत होते. त्यामुळे ना. पाटील यांच्या उपस्थितीत कृती समितीमधील पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. एकवाक्यतेचा अभाव प्रकर्षाने आंदोलनाच्या ठिकाणी दिसून आला.