शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अन्यायकारक शासन निर्णयाची होळी

By admin | Updated: September 22, 2016 00:16 IST

विना अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा १९ सप्टेंबरच्या सुधारित शासन निर्णयाची बुधवारी होळी करण्यात आली.

शिक्षकांमध्ये संताप : शिक्षण उपसंचालकांना निवेदनअमरावती : विना अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा १९ सप्टेंबरच्या सुधारित शासन निर्णयाची बुधवारी होळी करण्यात आली. हा शासन निर्णय म्हणजे शिक्षकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडणारा असल्याची टिका शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केली आहे.येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात या शासन निर्णयाची होळी करुन शासनकर्त्यांच्या आश्वासनावर ताशेरे ओढण्यात आले. यावेळी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके यांच्या नेतृत्वात होळी करण्यात आली. या सुधारित शासन निर्णयामध्ये विना अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. या अन्यायकारक शासन निर्णयामध्ये सरसकट २० टक्के वेतनाची तरतूद आहे. मात्र अनुदान सुत्रानुसार पुढील टप्पा अनुदानाची तरतूद करण्यात आलेली नाही. अनुदान देण्यासाठी शाळेतील शेवटच्या वर्गातील पटसंख्या २० असली पाहिजे, असे नमूद आहे. जाचक अटी लादल्यामुळे हा शासन निर्णय शिक्षकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप करण्यात आला. ३० आॅगस्ट रोजी झालेल्या बैैठकीत महाराष्ट्रातील १,६२८ घोषित शाळांचा समावेश करुन त्यांना २० टक्के वेतन अनुदानाची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे गत १६ वर्षांपासून वेतनासाठी लढा देणाऱ्या शिक्षकांना आशेचा किरण जागला होता. मात्र नव्या ‘जीआर’मध्ये लादलेल्या अटी, शर्थीमुळे एकही शाळा आता १०० टक्के अनुदानास पात्र ठरणार नाही, असा आरोप शेखर भोयर यांनी केला आहे. दरम्यान अन्यायकारक शासन निर्णयाची होळी करुन शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके यांच्यासह दिलीप कडू, प्रदीप नानोटे, अशोक लहाने, गजेंद्र गावंडे, विजय नागपुरे, ललित चौधरी, राजीक पठाण, सुनील डहाके, संगीता शिंदे, सिद्धार्थ सिरसाट, विजय कळस्कर, राजेश काळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)