शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायकारक कृषी कायदे, महागाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:13 IST

भारत बंदला पाठिंबा, इर्विन चौकात उपोषण अमरावती : केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कायदे शेतकऱ्यावर अन्यायकारक असून, वाढत्या महागाई ...

भारत बंदला पाठिंबा, इर्विन चौकात उपोषण

अमरावती : केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कायदे शेतकऱ्यावर अन्यायकारक असून, वाढत्या महागाई विरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या धोरणावर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला.

जिल्हा ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या समनार्थ राज्याचे कार्याध्यक्ष कृणाल पाटील, प्रवत्ते अतुल लोंढे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले आदीच्या उपस्थितीत एक दिवसीय उपोषण करण्यात आले.

केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या तीनही अन्यायकारक कृषी कायद्याने मोदी सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीतही प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. चार महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन सुरु आहे. मात्र, याची दखल न घेता मोदी सरकार मनमानी करीत असल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे. भाजप सरकारच्या शेतकरी व जनसामान्यां विरोधातील धोरणाचा यावेळी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक केला. दरम्यान, शेतकरी विरोधी कायदे तात्काळ रद्द करावे, वाढती महागाई रोखावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. आंदोलनात बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, सुरेश निमकर, मोहन सिंगवी, महेंद्र गैलवार, प्रमोद दाळू, सुरेश आडे, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, प्रकाश काळबांडे, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, प्रदीप देशमुख, राजाभाऊ टवलाकर, नितीन दगडकर, अभिजित देवके, भागवंत खांडे, बिटू मंगरोळे, संजय वानखडे, मिश्रीलाल झारखंडे, गणेश आरेकर, विनोद चौधरी, राजाभाऊ टवलारकर, किशोर किटुकले, प्रकाश काळबांडे, प्रशांत डवरे, निलिमा काळे, प्रदीप हिवसे, सलीम बेग, देवायनी कुर्वे, राजा बागडे, सागर देशमुख, निसार मन्सुरी, मतीन अहमद, गजानन राजगुरे, मनोज भेंले, श्रीकांत गावंडे, अभिनंदन पेंढारी, नितीन कनोजिया, श्रीकांत झोडपे, बबलू बोबडे, मुकद्दर पठाण, दीपक सवाई, संदीप रिठे, मनोज देशमुख, शिवाजी बंड, दिवाकर देशमुख सहभागी झाले होते.

बॉक्स

कायदे रद्द होईपर्यत आंदोलन सुरूच ठेवू

केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी व जनहित विरोधी धोरण राबवून उद्योगपतींचे पाठीराखे सरकार आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे लादून शेतकरी व शेती उद्ध्वस्त करू पाहत आहे. मात्र, भाजप सरकारचा हा खेळ काँग्रेस पक्ष कदापिही चालू देण्यार नाही, असा इशारा कुणाल पाटील, बबलू देशमुख, बबलू शेखावत, वीरेंद्र जगताप, बळवंत वानखडे, अतुल लोंढे आदी नेत्यांनी उपस्थिताना संबोधित करताना दिला.