शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
7
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
8
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
9
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
10
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
11
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
12
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
13
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
14
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
15
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
16
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
17
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
18
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
19
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
20
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण

अन्यायकारक कृषी कायदे, महागाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:13 IST

भारत बंदला पाठिंबा, इर्विन चौकात उपोषण अमरावती : केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कायदे शेतकऱ्यावर अन्यायकारक असून, वाढत्या महागाई ...

भारत बंदला पाठिंबा, इर्विन चौकात उपोषण

अमरावती : केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कायदे शेतकऱ्यावर अन्यायकारक असून, वाढत्या महागाई विरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या धोरणावर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला.

जिल्हा ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या समनार्थ राज्याचे कार्याध्यक्ष कृणाल पाटील, प्रवत्ते अतुल लोंढे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले आदीच्या उपस्थितीत एक दिवसीय उपोषण करण्यात आले.

केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या तीनही अन्यायकारक कृषी कायद्याने मोदी सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीतही प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. चार महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन सुरु आहे. मात्र, याची दखल न घेता मोदी सरकार मनमानी करीत असल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे. भाजप सरकारच्या शेतकरी व जनसामान्यां विरोधातील धोरणाचा यावेळी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक केला. दरम्यान, शेतकरी विरोधी कायदे तात्काळ रद्द करावे, वाढती महागाई रोखावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. आंदोलनात बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, सुरेश निमकर, मोहन सिंगवी, महेंद्र गैलवार, प्रमोद दाळू, सुरेश आडे, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, प्रकाश काळबांडे, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, प्रदीप देशमुख, राजाभाऊ टवलाकर, नितीन दगडकर, अभिजित देवके, भागवंत खांडे, बिटू मंगरोळे, संजय वानखडे, मिश्रीलाल झारखंडे, गणेश आरेकर, विनोद चौधरी, राजाभाऊ टवलारकर, किशोर किटुकले, प्रकाश काळबांडे, प्रशांत डवरे, निलिमा काळे, प्रदीप हिवसे, सलीम बेग, देवायनी कुर्वे, राजा बागडे, सागर देशमुख, निसार मन्सुरी, मतीन अहमद, गजानन राजगुरे, मनोज भेंले, श्रीकांत गावंडे, अभिनंदन पेंढारी, नितीन कनोजिया, श्रीकांत झोडपे, बबलू बोबडे, मुकद्दर पठाण, दीपक सवाई, संदीप रिठे, मनोज देशमुख, शिवाजी बंड, दिवाकर देशमुख सहभागी झाले होते.

बॉक्स

कायदे रद्द होईपर्यत आंदोलन सुरूच ठेवू

केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी व जनहित विरोधी धोरण राबवून उद्योगपतींचे पाठीराखे सरकार आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे लादून शेतकरी व शेती उद्ध्वस्त करू पाहत आहे. मात्र, भाजप सरकारचा हा खेळ काँग्रेस पक्ष कदापिही चालू देण्यार नाही, असा इशारा कुणाल पाटील, बबलू देशमुख, बबलू शेखावत, वीरेंद्र जगताप, बळवंत वानखडे, अतुल लोंढे आदी नेत्यांनी उपस्थिताना संबोधित करताना दिला.