शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायकारक कृषी कायदे, महागाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:13 IST

भारत बंदला पाठिंबा, इर्विन चौकात उपोषण अमरावती : केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कायदे शेतकऱ्यावर अन्यायकारक असून, वाढत्या महागाई ...

भारत बंदला पाठिंबा, इर्विन चौकात उपोषण

अमरावती : केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कायदे शेतकऱ्यावर अन्यायकारक असून, वाढत्या महागाई विरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या धोरणावर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला.

जिल्हा ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या समनार्थ राज्याचे कार्याध्यक्ष कृणाल पाटील, प्रवत्ते अतुल लोंढे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले आदीच्या उपस्थितीत एक दिवसीय उपोषण करण्यात आले.

केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या तीनही अन्यायकारक कृषी कायद्याने मोदी सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीतही प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. चार महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन सुरु आहे. मात्र, याची दखल न घेता मोदी सरकार मनमानी करीत असल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे. भाजप सरकारच्या शेतकरी व जनसामान्यां विरोधातील धोरणाचा यावेळी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक केला. दरम्यान, शेतकरी विरोधी कायदे तात्काळ रद्द करावे, वाढती महागाई रोखावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. आंदोलनात बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, सुरेश निमकर, मोहन सिंगवी, महेंद्र गैलवार, प्रमोद दाळू, सुरेश आडे, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, प्रकाश काळबांडे, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, प्रदीप देशमुख, राजाभाऊ टवलाकर, नितीन दगडकर, अभिजित देवके, भागवंत खांडे, बिटू मंगरोळे, संजय वानखडे, मिश्रीलाल झारखंडे, गणेश आरेकर, विनोद चौधरी, राजाभाऊ टवलारकर, किशोर किटुकले, प्रकाश काळबांडे, प्रशांत डवरे, निलिमा काळे, प्रदीप हिवसे, सलीम बेग, देवायनी कुर्वे, राजा बागडे, सागर देशमुख, निसार मन्सुरी, मतीन अहमद, गजानन राजगुरे, मनोज भेंले, श्रीकांत गावंडे, अभिनंदन पेंढारी, नितीन कनोजिया, श्रीकांत झोडपे, बबलू बोबडे, मुकद्दर पठाण, दीपक सवाई, संदीप रिठे, मनोज देशमुख, शिवाजी बंड, दिवाकर देशमुख सहभागी झाले होते.

बॉक्स

कायदे रद्द होईपर्यत आंदोलन सुरूच ठेवू

केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी व जनहित विरोधी धोरण राबवून उद्योगपतींचे पाठीराखे सरकार आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे लादून शेतकरी व शेती उद्ध्वस्त करू पाहत आहे. मात्र, भाजप सरकारचा हा खेळ काँग्रेस पक्ष कदापिही चालू देण्यार नाही, असा इशारा कुणाल पाटील, बबलू देशमुख, बबलू शेखावत, वीरेंद्र जगताप, बळवंत वानखडे, अतुल लोंढे आदी नेत्यांनी उपस्थिताना संबोधित करताना दिला.