शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

विद्यापीठाचे एप्रिलचे वीज देयक शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:13 IST

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीने तसेच प्राधिकारिणींच्या मान्यतेनुसार विद्यापीठात सौरऊर्जा ...

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीने तसेच प्राधिकारिणींच्या मान्यतेनुसार विद्यापीठात सौरऊर्जा प्रकल्प डिसेंबर २०१८ मध्ये स्थापन करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत २०१८ ते २०२१ या कालावधीत १८.८७ लक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्यामुळे या सौरऊर्जा प्रकल्पातून विद्यापीठाची १ कोटी रुपयांची बचत झाली आहे. एप्रिल २०२१ चे विद्यापीठाला वीज वितरण कंपनीकडून आलेले वीज देयक शून्य रुपये आहे. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा शून्य देयक आले असून, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या निर्णयामुळे विद्यापीठाच्या पैशाची बचत झाली आहे.

विद्यापीठात स्थापित झालेल्या सौर प्रकल्पाची क्षमता ५७६ केडब्ल्यूपी असून, विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्र, वनस्पतीशास्त्र, परीक्षा, बायोटेक्नॉलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व शिक्षण विभागाच्या मोठ्या इमारतींवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. विद्यापीठातील प्रशासकीय व शैक्षणिक विभागांना प्रतिवर्ष १४.३० लक्ष युनिट विजेची गरज असून, सौरऊर्जा प्रकल्पातून विद्यापीठाला प्रतिवर्ष ८.३५ लक्ष युनिट वीज प्राप्त होते. त्यामुळे विद्यापीठाच्या खर्चात ४८ लक्ष रुपयांची प्रतिवर्ष बचत झाली. सौर वीज वापरामुळे ६८५ टन कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन नियंत्रण झाले आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक असा हा प्रकल्प असून, प्रदूषण कमी करण्यासाठी व पैसे बचतीसाठी विद्यापीठाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आणि इतरांना अनुकरणीय ठरला आहे.

सौरऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यासाठी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व अन्य सदस्य असलेली समिती गठित करण्यात आली. त्या समितीच्या मार्गदर्शनात कार्य करण्यात आले. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाची योजना असून, या प्रकल्पाला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली (भारत सरकारचा उपक्रम) ने मान्यता दिली आहे. सौरऊर्जा प्रकल्पाचे आयुष्य २५ वर्षे असून विद्यापीठाची नेहमीकरिता वीज बचत होणार असल्याने पर्यावरण संवर्धनासह बचतीचा पैसा विद्यापीठाच्या व पर्यायाने विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता कामी लागणार आहे. विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाद्वारे प्रकल्प कार्यान्वित करण्यापासून ते त्याची देखभालीसाठी सातत्याने परिश्रम घेतले जात आहे.